देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत दिलेली माहिती.

आनंद शितोळे

२०१४-२०१९ या पाच वर्षात ८१४०४७ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्विकारलेले आहे ,

२०१९-२०२३ या कालावधीत ५६१२७२ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे. पैकी जवळपास निम्मे अमेरिकेचे नागरिक झालेत.

रोज साधारण ३८४ लोकांनी भारताला रामराम ठोकला असा याचा अर्थ.

अमेरिकेत नागरिकत्व मागणाऱ्या भारतीय लोकांची यादी पूर्ण करायला १४५ वर्षे लागतील अशीही बातमी आलेली आहे.

देश सोडून जाणारे लोक तेवढे श्रीमंत असतील किंवा त्यांच्याकडे पुरेशी साधन असतील, कागदपत्रे असतील म्हणूनच इतर देशांनी त्यांना नागरिकत्व दिलेलं आहे. वर्क परमिट किंवा पर्यटक व्हिसा मिळवायला यातायात होते तिथे नागरिकत्व म्हणजे मोठ काम.

यात अमेरिकेत किंवा इतर देशात लहान मुल जन्मल्यास त्याला आपोआप मिळणारे नागरिकत्व समाविष्ट नाहीये.

म्हणजे श्रीमंत ,सक्षम लोकांनी देश सोडलाय.
या देश सोडणाऱ्या लोकांची माहिती सरकारकडे असेलच, आकडेवारी आहे म्हटल्यावर. नेमक कोण कोण भारताला वणक्कम म्हणून निघून गेलेलं आहे हे कळायला हव.

एकीकडे लोकांनी मंदिर मशीद खेळत डोकी फोडावीत अस सांगणारे जर देश सोडून पळून गेले असतील तर आपण नेमक कशावर लक्ष द्यायला हव आणि काय महत्वाच आहे हे निदान आतातरी इथ उरलेल्या लोकांना समजायला हव.

रोजगार देऊ शकणारे व्यवसायिक देश सोडून गेले असतील आणि त्यांनी व्यवसाय सुद्धा बाहेरच्या देशात नेले असतील तर त्याचा साधा अर्थ भारतात अजून रोजगार कमी होणे आणि सोबतच भारत सरकारला वेगवेगळ्या करांनी मिळणारा महसूल बुडणे.

१४० कोटी लोकसंख्येच्या मानाने १४ लाख म्हणजे किरकोळ आकडा वाटत असेल तर याचा आर्थिक परिणाम समजून घ्या.

१४ लाख लोक देश सोडून गेले म्हणजे त्यांच्यावर किमान पाच माणस अवलंबून असतील अस गृहीत धरल तर ७० लाख कुटुंब.
७० लाख कुटुंबात किमान चार माणस धरली तर ३५० लाख लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न उभे राहिले अस समजा.
३५० लाख माणस म्हणजे १७-२० खासदारांचे मतदारसंघ झाले.
१४ लाख लोक म्हणजे माणशी फक्त एक कोटी रुपयांची संपत्ती देशाबाहेर गेली अस समजल तर तो आकडा होतोय १४ लाख कोटी रुपये.

एवढे पैसे देशाबाहेर गेलेले आहेत आणि तेही परकीय चलनात.

विश्वगुरु होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाखाली प्रगतीची आणि विकासाची घोडदौड करत असलेल्या आणि महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाला आपल्या देशात जन्माने मिळालेलं नागरिकत्व सोडून लोक दुसऱ्या देशात जाताहेत हि लाजिरवाणी बाब आहे.

याचा साधा सोपा अर्थ आहे.

तुमच्या देशातल्या लोकांना तुमचा देश जगायला सुरक्षित आणि चांगला वाटत नाहीये , इथ आपल्याला रोजगार मिळणार नाही, प्रगती होणार नाही याची त्यांना खात्री पटलेली आहे.

आनंद शितोळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!