आंबेडकरी चळवळीचा निस्वार्थ सेनापति माजी महापौर रामरतन जानोरकर

विनायकराव जामगडे
ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवावे सर्वांचे लक्ष आपल्या कडे आकर्षित करावे. त्याच प्रमाणे एका सफाई कामगारांच्या घरी जन्म घेऊन आपल्या कार्य कर्तृत्वाने गरीब शोषित समाजाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घालून समाजात जन जागृतीची लाट पसरवून समाजाला जागृत करून आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केले.
त्यांचा जन्म ठक्कर ग्राम वस्ती पाचपावली नागपूर येथे8/8/1931ला झाले.
लहान असतानाच आई वडिलांचे छत्र हरपले.काका मुननीलाल जानोरकर यांनी त्यांचे पालनपोषण केले.अगदी लहान असतानाच हातात झाडू आला.शहर स्वच्छ करीत असताना शिक्षणाची गोडी निर्माण झाली.एम ए ची पदवी घेतली.
पाचपावली लागूनच असल्यामुळे तेथील आंबेडकरी चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरी चळवळीत प्रवेश घेतला. वकृत्व कला अवगत असल्यामुळे ते संघटनेचे प्रमुख झाले.सतत संघर्ष करून अन्याय अत्याचार विरूद्ध आंदोलन केले.पिडीताना न्याय मिळवून दिला.आबेडकरी तत्वज्ञानावर अढळ निष्ठा .
धर्मांतर
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे जाहिर केले.तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी गठीत संघटनेचा सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.सोबत सफाई कामगारांना सोबत धम्म दीक्षा दिली.
17/3/1957ला लष्करी बाग नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित करून हिन्दू धर्म सोडून बौद्ध धम्माचा अवलंब करणार्या सोबत महानगरपालिका सदस्यांना दीक्षा दिली. अनेक बौद्ध धम्म दीक्षेचे कार्यक्रम आयोजित करून हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
बिडी मजूर खाणकामगाराची संघटना तयार करून कामगारांना न्याय मिळवून दिला.
रिपब्लिकन पक्षात नेते म्हणून त्यांची गणना होत होती.
रिपब्लिकन पक्षाला दुरूस्त करण्यासाठी निर्माण झालेल्या दुरुस्त रिपब्लिकन पक्षात पदाधिकारी होते.
1975ला नागपूर महानगर पालिका निवडणूक झाली.ते रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले.1976ला नागपूर नगरीचे महापौर झाले. ज्या महानगर पालिका मध्ये सफाई कामगार म्हणून काम केले त्याच महानगर पालिकाचे महापौर झाले.अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या.सफाई कामगार लोकांचे निवासस्थान मालकीचे घोषित केले.महिलाना जमादार पदांवर नियुक्ती करण्यात आली.
1975ला देशात आणिबाणी घोषित करण्यात आली विरोधीपक्ष नेते व कार्यकर्ते यांना तुरुंगात टाकले.देशात भितीचे वातावरण होते.नागपूर महानगरपालिकाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा महानगर पालिकेने ठराव पास केला. त्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत करावे असा आग्रह काँग्रेस पक्षाच्या नगर सेवकांचा होता. परंतु महापौर रामरतन जानोरकर यांचा विरोध होता. आणिबाणी च्या काळात सत्ताधारी पक्षाला नाराज करणे म्हणजे तुरूंगात जाणे होय.परतु ते धाडस रामरतन जानोरकर यांनी केले.
इंदिरा गांधी नागपूरच्या विमानतळावर येणार होत्या.शकरराव चव्हाण मुख्यमंत्री यांनी नागपूरचे महापौर रामरतन जानोरकर यांची भेट पंतप्रधान इंदिरा गांधी सोबत व्हावी म्हणून शिष्टाई केली.व नागपूर विमानतळावर भेट घडवून आणली. पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या की मला नागपूर महानगर पालिका सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास का बोलवित नाही. तेव्हा रामरतन जानोरकर महापौर म्हणाले की आधीच महानगर पालीकेने राष्ट्रपतींना निमंत्रीत करण्याचा ठराव पास केला आहे म्हणून आपणांस निमंत्रीत करू.शकत नाही.असे बाणेदार उत्तर दिले.इदिरा गांधींनी विचारले की तुम्ही कोणत्या पक्षाचे तेव्हा ते म्हणाले मी रिपब्लिकन पक्षाचा व भेट संपली.
एकदा महापौर पद भूसविल्यानंतर नागपूर महानगरपालिका ची निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली.व पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी जागा मोकळी केली.
विदर्भ वेगळा व्हावा म्हणून आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सामील झाले.आदोलनाचे नेतृत्व केले.ते आजन्म विदर्भवादी व रिपब्लिकन पक्षाचे एक निष्ठ नेते होते.
त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण देण्यात
आले.विधान परिषदेच्या सदस्य व मंत्री करण्याचे प्रलोभन दिले.परतु त्यांनी नकार दिला.रिपबलिकन पक्षात कायम राहिले.
विनायकराव जामगडे
9372456389
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत