
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर
व्हिडीओ प्रमाणे वायरल होतं असलेले जर शेगावचे गजानन महाराज ह्यांचे मंदिर आणि परिसर अंडरग्राउंड होत नसेल तर नागपूर उपराजधानी मधील पवित्र दिक्षाभूमी सौंदर्यीकरणच्या नावाखाली अंडरग्राउंडच कां ? आणि आपल्या समाजातील कमेटीवाले भामटे त्याला अंडरग्राउंडची परवानगी कशी देत आहेत…. ब्राम्हण सत्ताधारी संघाचे पुढारी ह्यांनी नेमके पवित्र दीक्षाभूमीचीच अंडरग्राउंड पार्किंग म्हणून लक्ष कां म्हणून केंद्रित केले.?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी सन 1956 साली जशी त्यांनी स्वतः आणि आपणा सर्वाना बुद्धाच्या धम्माचे बोट धरून दीक्षाभूमीवर येऊन हिंदू धर्माला लाथ मारून ज्यात माझ्या ठिकाणी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता असा म्हणणारा आपल्या सर्वांच्या बापानी आपल्या बुद्धी चातुर्याच्या भरोशावर बौद्ध धर्मात धर्मांतर केले. ही काही साधी गोष्ट नव्हती. हीच नेमकी बात आजही ब्राम्हणग्रस्त पुढारी आणि हिंदू धर्मातील लोकांना त्यांच्या मनात सल धरून खटकत आहे.हे आपल्या स्वाभिमानी बौद्ध जनतेनी ध्यानात घ्यायला हवे.
जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातुन निघून गेलेत तसे नाण्याच्या दोन्ही बाजू असणाऱ्या ब्राम्हणी संघांनी आणि काँग्रेसने आपल्या समाजातील लाळ चाटणारे भाडोत्री पुढारी आणि त्यांचे अनुयायी ह्यांना आपलेसे केले. आता 100 वर्षानंतर ब्राह्मणी संघ सत्तेवर आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची विचारप्रणाली कशी खतम करता येईल आणि पवित्र दीक्षाभूमीची सरकारी दप्तरी झुडपी जंगल दाखवून त्यात घोळ कसा करता येईल आणि येणाऱ्या नव्या पिढीला ह्याची चुणूक ही लागू नये हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी " पूर्वीचे कमिटीवाले आणि त्यांचे विकृत बुद्धीचे वारसदार " ह्यांना हाताशी धरून कुबुद्धीने धूर्तपणे सौंदर्यकरणाच्या अंडरग्राउंड नावाखाली खेळखंडोबा करून फार मोठे षडयंत्र रचले होते. पण वेळीच सावध होऊन सर्व स्वाभिमानी भीमसैनिकांनी त्यांच्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन जोरकस हल्लाबोल करून दीक्षाभूमी बचाव आंदोलनाचा जणू काय एल्गारच पुकारला होता हेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले एकजुटीचे संघटन आणि संघर्ष स्वाभिमानी भीमसैनिकाच्या पदरी फळास आले. आणि विकृत बुद्धीचे बौद्ध समाजातील वंशपरंपरागत असलेली कमिटीवाली पिलावळ यांचेवर लगाम लावला , चारही मुंड्या चित करून नाड्या आवळल्या. आजपर्यंत कमिटी वाल्यांच्या बापजाद्यांनी बौद्ध समाजातील लोकांना अज्ञानात ( माहिती न होता ) ठेवून राजरोषपणे आपल्या बापाने निर्माण केलेल्या पवित्र दीक्षाभूमीच्या नावावर स्वतः मालदार बनलेत तिच परंपरा कायम ठेवून त्यांच्या पिलावाळानी दीक्षाभूमीला सौंदर्य करण्यासाठी परवानगी दिली होती. पण जसं जशी खरी माहिती भारतभर आणि महाराष्ट्रभर कट्टर स्वाभिमानी भीमसैनिकांनी आपापल्या परीने व्हाट्सअपच्या , फेसबुकच्या माध्यमातून बौद्ध जनतेच्या कर्णपटलावर वाऱ्यासारखी आदळत गेली तस तसे भिमाचे सच्चे अनुयायी आमच्या बापदाद्यांच्या अज्ञानपणामुळे " गया " ही ब्राह्मणांच्या हाताखाली गेली तशी आता तरी " पवित्र दीक्षाभूमी " जाऊ नये म्हणून खेडोपाडी , शहरोशहरी मजबूत संघटन बनवून छातीला माती लावून एकजुटीने लोंढेच्या लोंढे वाहत, मनगटात ताकद आवळून दीक्षाभूमी बचावचा नारा देऊन जोरदार असा दीक्षाभूमी परिसरात हल्लाबोल केला.....
जरी कमिटीवाले सदस्य यांनी तेवढी वेळ मारून नेण्यापुरते लेखी स्वरुपात लिहून दिले की , स्वाभिमानी बौद्ध जनतेनी येथे अंडरग्राउंड पार्किंग नको ही त्यांची भावना लक्षात घेऊन सौंदर्यकरणाचे काम थांबवीत आहो असे जरी लिहून दिले असले तरी भाडखाउ कमिटीवाले ह्यांचेवर आपली आजही करडी नजर ठेवून राहणे गरजेचे आहे......
तूर्तास एवढेच !
दि. 22 जुलै 24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत