महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

लोकशाही व भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची- एस के भंडारे

डॉ बाबासाहेब यांच्या उस्मानाबाद व सोलापूर येथील ऐतिहासिक ठिकाणास भेटी

प्रत्येक कार्यकर्त्याने पाच समविचारी लोकांचे धर्मांतर करण्याचा व संविधान विरोधकास मतदान न करण्याचा ठराव

सोलापूर : दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने महामानव विचार जयंती आणि संविधान संरक्षण अभियान अंतर्गत पदाधिकारी -कार्यकर्ता संवाद मेळावे संपूर्ण महाराष्ट्र व देशात सुरु असून त्याचाच भाग म्हणून दिनांक 27/4/2024 रोजी, सकाळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,मुंबई कार्यालय प्रमुख तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आनंद बुद्ध विहार, हडको, तुळजापूर येथे उस्मानाबाद दक्षिण शाखेच्या वतीने आणि दि 28/4/2024 रोजी दुपारी सोलापूर पूर्व जिल्हा शाखेच्यावतीने वेळूवन बुद्ध विहार, शिक्षक हौसिंग सोसायटी, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना एस के भंडारे सारांशाने म्हणाले की, समतावादी महामानवांच्या जयंती आणि स्मृतिदिन साजरे करत असताना जातीअंताचा लढा उभारणं अत्यंत गरजेचा असून त्यासाठी चलो बुद्ध की और अभियान करून प्रत्येकाने समविचारी समाजातील पाच जणांना धर्मांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्वजाना चातूरवर्णमुळे गुलामीत ठेवले कुत्र्या मांजरांना जो अधिकार होता तो सुद्धा नव्हता तसेच डॉ बाबासाहेबाना ही खूप विषमतेला सामोरे जावे लागले त्यामुळे वयाच्या 25-26 व्या वर्षीपासून संघर्ष करून शेवटी संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, स्वाभिमान, बंधूता दिली ती आता संविधानाचे विरोधक संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. धर्मावर आधारित संविधान पाहिजे म्हणत आहेत, अशा परिस्थितीत लोकशाही व भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची असून जर संविधान बदलले तर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर येऊ असा इशारा दिला.

भंडारे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती केली ती कशी मागे घेऊन चालले आहेत त्याची सविस्तर मांडणी करून ती गतिमान करण्यासाठीचे आठ गोल्डन मार्ग सांगितले.
तुळजापूरच्या संवाद मेळावा अध्यक्षस्थानी उस्मानाबाद दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा विजय मालाताई धावारे होत्या. राज्य संघटिका शारदाताई गजभिये,
उस्मानाबाद उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हनुमंत प्रतापे,
जिल्हा सरचिटणीस अँड.दिलीप निकाळजे, संतोष सुरवसे (उमरगा ता.),तानाजी माटे (लोहारा ता ), उमाजी गायकवाड (उस्मानाबाद ता ), लक्ष्मण धावरे (कळंब ता ), सुषमा निकाळजे (परांडा ता ), रामेश्वर चंदनशिवे (तुळजापूर ता ), गुणवंत सोनवणे (केंद्रीय शिक्षक ), यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीलाच एस के भंडारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन उस्मानाबाद दक्षिण जिल्हा समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात करण्यात आली. या संवाद मेळाव्यास जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे,
जिल्हा संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, जिल्हा हिशोब तपासणी देविदास कदम, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे, जिल्हा संघटिका मीनाताई लागडे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा संघटक विजय बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे यांनी केले आणि आभार जिल्ह्याच्या कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम यांनी मानले.

सोलापूर येथील संवाद मेळावा सोलापूर पूर्व जिल्हा अण्णासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी महाराष्ट्र महिला शाखा उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे, राज्य संघटक शारदाताई गजभिये,
सोलापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष हणमंत जगताप, महिला पूर्व जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई कांबळे, महिला पश्चिम जिल्हा अध्यक्ष विदयाताई काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस नागसेन माने,ऑडिटर दत्ता सिद्ध गणेश, मेजर जगताप, गौतम जगझाप इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा संस्कार उपाध्यक्ष धम्मपाल माने यांनी केले.

डॉ बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक ठिकाणास भेट

दोन्ही मेळाव्यानंतर एस के भंडारे व जिल्हा पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि 22-23 फेब्रुवारी 1941 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे येथे महार मांग परिषद घेतली त्यावेळी डॉ बाबासाहेब ज्या शाळेत निवास केले होते त्या जिल्हा परिषद शाळेच्या खोलीस भेट देऊन तेथे त्रिसरण पंचशील घेतले व डॉ बाबासाहेब बसलेली ऐतिहासिक बैलगाडी व उतरलेले कळंब रोड रेल्वे स्टेशनला भेट दिली.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर येथील रोजी गंगानिवास या इमारतीमधील निवास केलेल्या खोलीस व त्यावेळी त्यांनी वापरलेल्या वस्तूस आणि सद्याचे मिलिंदनगर, बुधवार पेठ येथे 26/27 नोव्हेंबर 1927 रोजी सोलापूर जिल्हा वातनदार महार परिषद मध्ये भाषण केले त्या ऐतिहासिक पंचाची चावडीस व तेथे आज उभारलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणा भूमीस भेट दिली.

मेळाव्यातील ठराव –
या दोन्ही संवाद मेळाव्यात एस के भंडारे यांनी आवाहन केल्याप्रमाणे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सन 2025 मध्ये करोडो धर्मांतरासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पाच समविचारी लोकांचे धर्मांतर करण्यासाठीचा ठराव करण्यात आला. तसेच संविधान विरोधकास मतदान न करण्याचाही ठराव करण्यात आला.
या दोन्ही संवाद मेळाव्यास पदाधिकारी, कार्यकर्ते, समता सैनिक दल मोठया संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!