राजकीय

“भाजपाची लाट नाही, त्सुनामी येणार”, राजस्थानच्या अजमेरमध्ये देवेंद्र फडणवीसांचे जोरदार भाषण.

काल (१४ सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थान दौऱ्यावर होते. भाजपाच्या ‘परिवर्तन संकल्प यात्रा-३ अंतर्गत त्यांनी राजस्थानातील विविध जिल्ह्यांत जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी, अजमेरमध्ये त्यांची जनसभा सुरू असताना अचानक पावसाने एन्ट्री घेतली. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतरही फडणवीसांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर छत होतं, परंतु, त्यांच्यासमोर बसलेले नागरिक भरपावसात सभा ऐकत होते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं भरपावसात भाषण गाजलं होतं. त्यानंतर, आता देवेंद्र फडणवीसांनीही पावसात भाषण सुरू ठेवल्याने या भाषणाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मोदींच्या इंजिनसह राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं इंजिन मागे लागलं तर राजस्थानची रेल्वे किती वेगाने पळत जाईल की राजस्थानला कोणी थांबवू शकणार नाही”, असं भाषण देवेंद्र फडणवीसांनी केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!