दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण लागू केले

.
@ २६ जुलै @

आज आरक्षणाचा ऐतिहासिक दिन. याच दिवशी २६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात नोकरी मध्ये बहूजनांना ५० टक्के आरक्षण देऊन जगातील एक नवा इतिहास लिहिला. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जयंती दिनी २६ जून रोजी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून घोषित केला आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली.

अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले. बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दृष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात २६ जुलै १९०२ रोजी सरकारी नोकऱ्यात ५० टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतिहासातील हा अभूतपूर्व पहिला जाहीरनामा काढणाऱ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा !

अवि पाटील
९१३०११८६१०
बुध्द धम्म अनुसरण संघ (रजि.)
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!