समाज सुधारणेचा मार्ग असंख्य अडचणीने भरलेला आहे.

🌻 (राजकीय, धार्मिक व सामाजिक) 🌻 ✍️ उमेश गजभिये.
बाबसाहेब आंबेडकर म्हणतात – “भारतात समाज सुधारणेच्या मार्गात (काल्पनिक ) स्वर्गाच्या मार्गाप्रमाणे असंख्य अडचणींनी भरलेला आहे. भारतात सामाजिक सुधारणेला मित्र कमी आणि टीकाकार च जास्त आहेत. हे टीकाकार दोन ठळक वर्गात मोडतात. यातील एक वर्ग राजकीय सुधारकांचा आणि दुसरा सामाजिक सुधारकांचा आहे.* ( संदर्भ : जातीचे निर्मूलन – बाबासाहेब आंबेडकर)।
ही दुभंगलेली स्थिती आज महाराष्ट्र व देशातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक एनजीओ मध्ये दिसून येत आहे. बहुजनवादी राजकीय पक्ष व बहुजनवादी संघठना, बाबसाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संघटना व राजकीय पक्ष सर्वांना सामान लागू आहे. आज बहुजनवादी नावाचा एक दलीत गट फक्त राजकीय फायदा झाला पाहिजे. याकरिता डोक्याला बाशिंग बांधून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले सर्व तत्वज्ञान सोडून कार्यरत आहे. यासोबतच रिपब्लिकन नावाचे कार्यरत राजकिय पक्ष हा ही त्याचीच री ओढून राहिलेला आहे. सत्तेत सहभाग करीत #8वले , #कवाडे, #गवई व इतr बाबासाहेब यांचे मूळ राजकीय व सामाजिक तत्व सोडून काहीही करण्यात धन्यता मानतात. तसेच रिपब्लिकन इतर गटांचे आहे. या सर्वांचे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक सुधारणे कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. “बाबासाहेब आंबेडकरांनी #नेता कसा असावा यासंदर्भतील नीतिमूल्ये सांगितलेली आहे.” संघटना व राजकीय पक्ष याची नीतिमूल्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेली आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे सर्व नीतिमूल्ये राजकीय, सामाजिक व धार्मिक नेते, कार्यकर्ते व दलीत, बौद्ध संघटना यांचे नेते पायदळी तुडवत आजपर्यंत आलेले आहेत.
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून 22 प्रतिज्ञा दिल्या. सप्टेंबर 2021 मध्ये Up बसप राजकिय नेता गणपती व त्रिशुळ ब्राह्मण समूहाकडून स्वीकार करतात. असेच बहुतांश प्रकार महाराष्ट्रातील स्वतःला वंशज म्हणणाऱ्या व आंबेडकरी म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी केलेला आहे. बसप व महाराष्ट्रातील आंबेडकरी नेत्यांना फक्त राजकीय सत्ता प्राप्ती ही महत्त्वाची आहे. दलित व बौद्ध लोकात समाज सुधारणा झाली पाहिजे. याविरोधात प्रस्तापित सरजामशाही सरकारने जे सामाजिक समस्या निर्माण केलेल्या आहेत.
रोजगार, शैक्षणिक, शिष्यवृत्ती, फी शिप, उच्च शिक्षण, परदेशी शिस्खन व दलितांवर होणारे अन्याय अत्याचार या सामाजिक जाणीव कुचलने यावर जास्त भर प्रस्तापित सरजामशाही सरकारने दिलेले आहे. वरील प्रश्न याबद्दल आवाज उचलणारे कार्यकर्ते यांना अर्बन नक्षल घोषित करण्याचे सरकारने कायदे बनवले आहे.
काही अपवाद सोडले तर आंबेडकरी म्हणवणाऱ्या राजकीय पक्ष याविरोधात कार्यरत दिसत नाही. त्यांचे योगदान दिसत नाहीत. सामाजिक बदल होणे म्हणजे शिक्षण, उच्च शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, नोकरी व दलितांचे हक्क अधिकार, अन्याय -अत्याचार, आया बहिणींची बेअब्रू , बलात्कार व बलात्कार करून हत्या केली जाते. याविरोधात काही अपवाद सोडल्यास बहुतांश आंबेडकरी राजकीय पक्ष व बहुसंख्य संघटना कार्यरत दिसत नाही. कारण सामाजिक कार्य करण्यापेक्षा पुतळे, मूर्ती बसवणे, समाज भवन बनवणे, विहार बनवणे व शहर, जिल्याचे नाव महापुरूषांच्या नावाने बदल करणे. यातच यांचे हितगुज गुंतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर या कार्याला “सामाजिक कार्य म्हणत होते काय? याचे चिंतन करणे यांच्या डोक्यात बसत नाही.असे केल्याने मनुष्याचा उत्कर्ष होत नाही. यामुळे मनुष्य दुःखमुक्ती प्राप्त करीत नाहीत. यातून गरिबांचे पोट भरत नाही. याचा यांना विसर पडलेला आहे. राजकीय सत्ता हेच यांचे स्वप्न झालेले आहे. त्याकरिता सर्व खटाटोप.
राजकीय, धार्मिक व सामाजिक संघटना मार्फत कार्यरत बहुजनवादी, दलीतवादी, बौद्धवादी व आंबेडकरवादी समूह बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज सुधारण्यासाठी कार्य व्हावे याकरिता कार्यरत दिसत नाही, यातील तीन टक्के कार्यरत असतील. अशी अपेक्षा आहे. परंतु तत्वाने कार्यरत कमी प्रमानात दिसतात. यातील बहुतांश कार्यकर्ते व समूह, राजकीय धार्मिक व सामाजिक समाज सुधारणा करिता कार्यारत तत्ववादी लोकांना अडथळे उत्पन्न करतात असेच भारतात दृश्य आहे.
कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले राजकीय, धार्मिक व सामाजिक तत्त्वज्ञान हे या नेत्या व कार्यकर्ते यांच्या महत्वकांक्षाला खतपाणी देत नाही. राजकीय तडजोड व स्वार्थ सिद्दी यात अडथळे निर्माण होतात. त्यामूळे निवडणुकीनंतर आंबेडकरी राजकीय पक्ष म्हणवणाऱ्या निवडणुकीत उभ्या झालेल्या व पराभूत उमेदवार याच्याकडे एकदम महाग कार कशी दिसणार? नवीन प्लॉट, फ्लॅट ही प्रॉपर्टी कशी जमणार?
त्यामुळे समाज सुधारणा करिता सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील कार्यरत लोकांनी या राजकिय लोकांच्या कृतीवर टीका केली. तर या राजकीय व सामाजिक संघटनेतील लोकांचे कार्यकर्ते हे सामाजिक जाणिवा ठेऊन कार्यरत व्यक्तीला शिव्या शाप देऊन, धमकी देतात. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुधारक याना मित्र कमी व शत्रू जास्त आहेत, अशीच आज परिस्थिती झालेली आहे. 80 ते 90 वर्षापूर्वी अशीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी “जातीचे निर्मूलन” या ग्रंथात घेतलेली आहे. ही भूमिका आजही एकविसाव्या शतकातील कालखंडात सत्य ठरत आहे. यावर आंबेडकरी जनतेने विचार करणे आवश्यक आहे. व यायुन मार्ग काढणे आवश्यक आहे. व बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला तात्विक मार्ग प्रशस्त करणे ही जबाबदारी आहे.
दिनांक : 9 सप्टेंबर 2021 (संशोधित : 9 सप्टेंबर 2022 व 22/07/2024)
✍️ उमेश गजभिये. 9326887326
जयभीम जयभारत
नमोबुद्धाय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत