महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

राममंदिर आणि राजकारण

-लेखक: दत्ता तुमवाड. सत्यशोधक समाज नांदेड.
दि.13.जाने. 2024.फो:9420912209.

भारत देशात आधी जाती धर्म नव्हते. मुळनिवाशी भारतीयांना ईश्वर देव धर्म या गोष्टी माहीत नव्हत्या. इथे धर्म नव्हता फक्त संस्कृती निर्माण झाली होती. तिचे नाव सिंधु द्रविड असे दोनच होते. पण या संस्कृतीत वर्णभेद जातीभेद धर्म लिंगभेद शिवा शिव हे प्रकार नव्हते. हे सारे भारताबाहेरील लोक इथे आले आणि त्यांनी देव धर्म जाती वर्ण सोबत आणले आणि ह्या गोष्टी आपल्यावर लादल्या. त्या आपण स्विकार ल्या. कारण त्यांची आणि आपल्या पूर्वजां चि लढाई झाली. आपल्याकडील शस्त्र त्यांचे शस्त्रा पुढे टिकू शकले नाहीत. त्यामुळे आपण मूळ भारतीयांना लढाईत परकीयांनी हरवले. ते राजे होऊन बसले आणि मूळ भारतीयांना त्यांचा धर्म देव संस्कृती रुढी परंपरा चालीरीती, पूजा पाठ कर्मकांड, अंधश्रध्दा पाळण्यासाठी मजबूर केले. हजारो वर्ष हे सर्व पाळल्या मुळे ते सारे डोक्यात घर करून बसले. अंगवळणी पडले.

परकीयांनी भारतीयांना त्यांचा देव धर्म संस्कृती शिकवले. ते आपण शिकलो. आणि आपली मूळ संस्कृती विसरून गेलो. आपली संस्कृती म्हणजे दया क्षमा शांती. सत्य न्याय नीती, बंधुभाव सहिष्णुता सलोखा परोपकार उपकाराची फेड ही संस्कृती. पशू पक्षी प्राणी वृक्ष या मुक्या प्राण्यांना जीवदान देणारी, त्यांचे भरण पोषण पालन संरक्षण करणारी संस्कृती. सूर्य चंद्र आकाश पाऊस धरती यांचे उपकार मानून त्यांची पूजा करणारी संस्कृती ,आपली कृषी संस्कृती ,श्रम संस्कृती, फुकट खाणे ही संस्कृत नाही. दुसऱ्यावर वर्चस्व करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत नाही.

कुणाचे बळजबरीने घेण्याची आपली संस्कृती नाही. आपली मूळ संस्कृती ही त्यागाची आहे भोगाची नाही. भक्ती भावाची आहे. सक्तीची नाही. आपणास बिघडवले परकीयांनी. इथे राज्य करून. अजूनही बिघडव नेच चालू आहे. ते कसे ते राम मंदिराचे राजकारण समजून घेतले की कळेल, सत्य काय ते. रामायण हे पुराण आहे इतिहास नाही असे काही लोक म्हणतात. तर रामायण पुराण नव्हे तर इतिहास आहे, असे काहीजण म्हणतात. खरे काय खोटे काय त्यानाच माहीत. पण आपणास बुद्धी आहे. आपण विचार करू शकतो.

जर राम ही काल्पनिक गोष्ट आहे, याचा अर्थ राम जन्मास आलाच नाही. जर सत्य गोष्ट असेल तर तो जन्मास आला. एका राजघराण्यात. आणि तो राजा झाला. तो क्षत्रिय होता. ब्राह्मण नव्हता. त्याकाळी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार वर्ण होते. सर्वात वर ब्राह्मण होता. तो धर्माचा ठेकेदार होता. धर्मावर आधारित राज्य कारभार चाले. ब्राह्मण न्याय देण्याचे काम करी. सर्वोच्च न्यायालय म्हणजे धर्मपीठ होते. धर्माचे कायदे प्रमाणे राज्यकारभार चाले. याचा अर्थ राम राजा ब्राम्हण सांगेल त्यानुसार कारभार करायचा. जसे की rss प्रमुख भागवत सांगतात तसेच मोदींना करावे लागते.

याचा अर्थ बीजेपी मोदी सरकार संविधानाने चालत नाही, तर मनु स्मृती नुसार चालते. धर्माच्या आदेशानुसार चालते. इथे सामाजिक कायद्याचे राज्य नसून धार्मिक कायद्याचे राज्य आहे. सत्ता धर्माची बटीक आहे. अशी विषमतावादी व्यवस्था आर एस एस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना अभिप्रेत आहे. म्हणुन मंदिर मस्जिद चे राजकारण या धर्मनिरपेक्ष देशात चालू आहे. या दोन पक्षाचे विषमतावादी राजकारण हे स्वातंत्र्य पूर्व काळापासून चालू आहे. इंग्रजांचे काळात हे दोन पक्ष युती करून कोन्ग्रेस विरोधात इलेक्शन करत असत. हिंदुराष्ट्र मुस्लिम राष्ट्र अलग मागणी करणारे, भारताचे दोन तुकडे करणारे हेच महाभाग. भारत हा हिंदू राष्ट्र म्हणुन असावा. इतर धर्माचे लोक एक तर देश सोडून जावे, नाहीतर गुलाम म्हणुन राहावे, ही बीजेपी नीती आहे. हे साध्य करण्यासाठी राम मंदिर बांधल्या गेले. राम मंदिराचे राजकारण करून सत्तेवर येता आले. कारण याना माहीत आहे की, भारतीय जनता देवभोळी धार्मिक आहे.

राम यांच्या हृदयी आहे. यांच्या भावना सोबत खेळले तरच आपण सत्ता काबीज करू शकतो. आणि एकदा का सत्ता हाती आली की लोकशाहीचा गळा दाबता येतो. खरे तर हे देवाचे नाव घेऊन देवाला बदनाम करणे आहे. कारण रामाला लोक देव मानतात. ईश्वराला सर्व माणसे सारखीच. सारे त्याचेच पुत्र आहेत. मग ते कुणाही जाती धर्माचे असोत, त्याचेच सारे मुले. पण या विषमतावादीनी भेदभाव केला. अखिल मानव जातीचे तुकडे पाडले आणि त्यांचे मध्ये भांडणे लाऊन रक्तपात घडविला. घडवितात. केव्हढे हे महापाप देवाच्या नावाने. शाहीर दिगु गीत म्हणतात ” भोळ्या खुळ्या लोकाना देवून भूलथाप ,देवाच्या नावावर करतात पाप. ” हे जाती वादी धर्म वादी हे सारे विषमतावादी विष पेरणी करणारे हेच खरे देशाचे दुश्मन आहेत. हे आपले दुश्मन. मूळ भारतीयांचे दुश्मन. घरातच पैदा केले जात आहेत. हे त्यांचे राजकारण वेळीच आपण भारतीय लोक, sc st obc alpsankhyank यांनी ओळखले नाही तर, संविधान बदलणार. आरक्षण जाणार, खाजगीकरण होणार, भांडवलदार धर्मांध लोक हुकुमशाही करणार.

आपन मूळ भारतीय गुलाम म्हणुनच जगणार. सत्ता नाही, संपत्ती नाही शिक्षण नाही, फक्त सेवाच करीत राहू. फुकट रेशन फुकट सेवा हेच आपले पदरी. राममंदिर म्हणजे मांजर उंदराचा खेळ आहे. मांजरा सोबत खेळताना उंदराला लई मजा वाटते. उंदीर बिचारे निष्पाप असते. भोळे असते. पण त्याला माहीत नसते की या कपटी मांजराच्या पोटात पाप आहे. म्हणुन खेळण्याची मजा मांजर ही घेते. पण त्याला मारून खाण्याची मजा पण घेते. तसेच हा राममंदिर चा राजकारणी खेळ आहे. इकडे महागाईने नाकात दम भरलाय. बेरोजगारी ने कळस गाठला. भ्रष्टाचार बेईमानी धोके बाजी सत्ते चि परंपरा बनली. लोकशाहीचा गळा दाबल्या गेला. संविधान वर आघात होताहेत हे सारे विसरावे म्हणुन राममंदिर राजकारण चाललय.

शिवाय लोकसभा निवडणुका जवळ आलेत. प्रत्येक निवडणूक वेळी एक तर राम नाहीतर हनुमान, नाहीतर राष्ट्रवाद, नाहीतर मुस्लिम हिंदू वाद अशा भावनांचा वापर करून निवडणूक जिंकायचे, मते मिळवायचे असे नालायक राजकारण चालू आहे. राममंदिर अजून बांधुन पूर्णही झाले नाही तरी त्याचे उद्घाटन तेही महाराज शंकराचार्य राष्ट्रपती यांचे हस्ते ना करता, मोदींच्या हस्ते करणे हे एक राजकारण आहे. केवळ मत मिळवण्याचे.

खरे तर संविधान चे हे उल्लंघन आहे. देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेता हे सांविधानिक पदे आहेत. यांनी कोणत्याही धार्मिक कार्य कामास जायचे नसते. कारण सरकारला शासनाला धर्म नाही. ते धर्मनिरपेक्ष आहे. असे संविधान सांगते. पण संविधान मानायचे नाही. हे यांनी ठरविले आहे. कोन्ग्रेस वाले पण संविधानाची उल्लंघन करायचे पण मोडतोड करत नव्हते. बीजेपी तर आर एस एस चि राजकिय शाखा आहे. म्हणुन ते हे असे करणाराच .कारण त्यांना समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष संविधान तिरंगा झेंडा मान्यच नाही. ते रामाचे नावाने बदलणार .आणि रामाला पापाचा भागीदार बनवणार. यांचे कपट देवालाही सोडत नाही तर तुमची आमची काय बिशाद.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!