भावनिक लढायाच्या गदारोळात हरवलेलं भीषण वास्तव ,,,जागरूक (BANAE) द्वारा कळीच्या मुद्द्याला घातला हात ,,,,,!

ऍड अविनाश टी काले , अकलूज
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213
भारतीय समाज व्यवस्थेत हजारो वर्ष शापित म्हणून जन्माला आलेल्या एस सी, एस टी , ओबीसी , अल्पसंख्यांक वर्गाच्या दमना चे प्रयोग हर प्रकारे उच्च वर्णीय समाजा द्वारे केले जातात याचे कारणच मुळात येथील समाज व्यवस्था ही मानवता वादी , समता वादी , आणि लोकशाहीवादी ही नाही ,
अश्या भीषण स्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक प्रयासातून या उपेक्षित वर्गाच्या हक्काचे , मानवी मूल्यांचे संरक्षण व्हावे म्हणून घटनात्मक तरतुदी केल्या ,
त्याच प्रमाणे शिक्षण , प्रशासन , राजकीय सत्ता यात आरक्षण निर्मिती केली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीने आत्मभान आलेल्या समूहाने ” शासनकर्ती जमात बना” याचा मर्यादित अर्थ काढून इतक्या राजकीय पक्षांना जन्म दिला , की कोबडी चे पोटात अंड्याची माळ सापडावी तशी माळ च निर्माण केली ,
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा अपवाद वगळता या वर्गाच्या आर्थिक शैक्षणिक अश्या मूलभूत प्रश्नाकडे मात्र कोणत्याच पक्षाने लक्ष दिले नाही ,
प्रस्थापित राजकीय सत्तेचे एक वैशिष्ठ्य आहे , की ते प्रत्येक वेळेस नवीन नवीन भावनिक प्रश्न उभे करतात , आणि या प्रश्नाच्या सोडवणूकी साठी समाज एकत्रित येतो , आणि यातून एखादा नवीन नेता समाजात निर्माण होतो , आणि कालांतराने युद्ध जिंकल्याचा आभास समाजाला होतो ,,
जात गठ्ठा निर्मितीचे हे प्रयोग कित्येक दशके चालू आहेत , आणि निवडणुका आल्या की असे नवीन मुद्दे हमखास निर्माण होतात .
अलीकडे निर्माण झालेला ” दीक्षा भूमी ” पार्किंग निर्मितीचा प्रयास हा याच प्रकारातील आहे , असे माझे स्पष्ट मत आहे .शासनाने जाणीवपूर्वक ही कृत्रिम लढाई निर्माण केलेली आहे ज्यात आंबेडकरी समाज आपली ऊर्जा ओतत राहील , आणि याच प्रश्नांमुळे तो भावनिक बनून जात म्हणून एका गठ्ठ्यात परावर्तित होईल आणि असा गठ्ठा एक तर आपल्या बाजूला वळवता येईल किंवा त्यास दुसऱ्या बाजूने तटस्थ शक्ती म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल ,
आणि नेहमी प्रमाणे राजकीय सत्ता भागीदारी पासून आंबेडकरी समाज वंचित राहील .
दुसऱ्या बाजूने घटनात्मक तरतूद नसताना निरनिराळ्या जात समूहाचे आरक्षण लढे याच उद्देशाने निर्माण केले जात आहेत .
पण या सर्व भावनिक गदारोळात भीषण वास्तव नजरेआड झाले होते .
बहुतांश समाज निद्रिस्त असताना ही कांहीं व्यक्ती मात्र जागृत असतात , आणि त्यांच्या जागृत प्रयासाने च समाजाचे वास्तव प्रश्न शासन व्यवस्थे पुढे मांडले जातात .
त्यातील मुद्दे , आणि तर्कशुद्ध मांडणी , आणि त्या साठी आवश्यक असलेला डाटा ,, यांच्या साहाय्याने भोंगळ मागणी न करता ती ठोस स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न हा ही एक लोकशाहीतील सुसंस्कृत प्रयास आहे .
आणि हेच काम (BANE) या संस्थेने केले आहे या संस्थेचा लाँग फॉर्म
डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय इंजिनियर असोसिएशन असा आहे .
आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु नागसेन सोनारे हे आहेत , तर सरचिटणीस आयु संजय सगरे हे आहेत .
अंधेरी पश्चिम मध्ये संस्थेचे मुख्य कार्यालय आहे ,
या संस्थेच्या शिष्ट मंडळाने नुकतीच माननीय महा महीम राष्ट्रपती महोदय श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेऊन त्यांना 44 पानी निवेदन पत्रिका देऊन
एस सी/एस्टी/ ओबीसी/ अल्पसंख्यांक समूहाच्या अनेक प्रश्र्नाशी , बॅकलॉग शी , बेरोजगारी , ते स्कॉलरशिप , आणि नौकरी तील रिक्त जागा भरती या संबंधाने त्यांना भीषण वास्तव वादी परिस्थिती शी अवगत करून त्यांचे शी चर्चा केली आहे .
त्यांची पहिली बैठक 3फेब्रुवारी 2023ला झाली , आणि आत्ता 21/6/2024 ला दुसरी मीटिंग पार पडली.
या मीटिंग मध्ये त्यांनी महामहीम राष्ट्रपती यांना अवगत केले की
1,,,,एस सी , एस टी , ओबीसी , यांच्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असून केंद्र सरकार व केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील 60लाख जागा रिक्त असल्याने त्या तातडीने भरण्यात याव्यात .
या जागा रिक्त राहिल्या मुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या चांगले व शाश्वत जीवन जगण्याच्या आशा मावळून गेलेल्या आहेत .
2,,,आय आय टी, आय आय एम , क्षेत्रात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 4300जागेचा बॅकलॉग हा भरलेलाच नाही , या साठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात यावी , आणि या भरती प्रक्रियेवर सुपर व्हिजन राष्ट्रपती भवन द्वारे टीम नेमून करण्यात यावे .
3,,,,10वी नंतर उक्त वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्कॉलरशिप ही कामगार आयोगाने सुचवलेल्या महागाई निर्देशांक नुसार देण्यात यावी .
4,,,, आय आय टी व आय आय एम मधील एस सी /एस टी मुलांच्या झालेल्या आत्महत्या संदर्भात केंद्र शासन जी आर क्रमांक 6~302005अन्वये (6डिसेंबर 2006) संस्थेमधील संचालक मंडळावर कार्यवाही करावी
5,,,भारतीय राज्य घटनेच्या संरक्षणात्मक तरतुदी नुसार केंद्रीय संस्थांच्या धोरणाचा आढावा घ्यावा
6,,,, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना केंद्र स्तरावर 125 पारितोषिक दिली जातात यात वाढ करून या अवार्ड ची संख्या 500 करावी
7 विमान प्रशिक्षणार्थी यांना स्कॉलरशिप द्यावी आणि सी पी एल परवाना सुधारित 2018 ची स्कीम राबवावी
8,,, पोस्ट , विमानतळ , कोळसा खाण , रेल्वे , इत्यादी विभागातील नौकरी खाजगीकरण याने धोक्यात आलेल्या आहेत एस सी , एस टी , ओबीसी , व अल्पसंख्यांक यांना न्याय देण्यासाठी अमेरिकन शासनाने जसे कृष्ण वर्णीय धोरण राबवले असे धोरण व कार्यक्रम भारत सरकारने राबवणे आवश्यक झाले आहे .
9,,,,,
National Commission for SC
आणि
National Commission for ST
यांचे चेअरमन पदी राजकीय व्यक्तीला बसवल्याने एस सी / एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणाऱ्या ऍट्रॉसिटी वर ॲक्शन होत नाहीत.
म्हणून निवृत्त न्यायाधीश चेअरमन बनवून संचालक मंडळात IAS/IPS/Director of PUS अशी सदस्य म्हणून घ्यावीत व ॲट्रॉसिटी च्या विरोधात कडक ॲक्शन घ्यावी
10,,,,,एस सी /एस टी विरोधातील ॲट्रॉसिटीच्या केसेस 2लाख प्रलंबित असून विविध राज्य सरकार यांना जलद ट्रायल घेण्याच्या आदेश द्यावा ,
त्याच प्रमाणे सर्व राज्य मुख्यमंत्र्यांची वर्षातून 2वेळा या प्रश्नावर बैठक घेऊन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन रुल 1995प्रमाणे निष्काळजी व दोषी अधिकाऱ्यांची जबाब देही स्पष्ट करून अश्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी .
11,,,, युनायटेड नेशन द्वारे मानवीय अधिकार म्हणून शिक्षण अधिकाराची घोषणा केली असून यास सर्व देशांनी मान्यता दिलेली आहे
राईट टू एज्युकेशन मान्य करून के जी ते पी जी पर्यंत चे शिक्षण शासनाने देणे आवश्यक आहे , व अश्या प्रकारे सर्वांना मोफत शिक्षण मिळाल्यास एस सी /एस टी/ओबीसी/ ओपन असे भेद नष्ट होतील व समाज व्यवस्थेत बंधुभाव वाढेल .
1996साली युनायटेड नेशन चे जाती वर्ण विद्वेष विरोधी कमिटी ने ह्युमन राईट टू एज्युकेशन हे तत्व मान्य करून सर्वांना शिक्षण देण्याची शिफारस केली आहे .
12,,,, विविध कंपन्या व कार्पोरेट संस्था यांचा CSR फंड हा दुर्बलातील दुर्बल व्यक्ती समूहाच्या साठी असतो
परंतु याचा क्वचित लाभ भारतातील गरीब वर्गाला मिळतो . याचे कारण या गरीब समुहा कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्व ग्रह दूषित असल्याने या फंडा वर देखरेख राष्ट्रपती भवन कार्यालयाची असावी .
13 ,,,, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पिचं अँड रायटिंग हे खंड इंग्रजी व हिंदी भाषेत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत , त्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पना , विचार , आणि तत्वज्ञान सर्व सामान्य व्यक्ती पर्यंत सुलभतेने पोहचत नाही , स्थानिक मान्यता प्राप्त भाषेत ते प्रकाशित झाल्यास या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार सर्व दूर पर्यंत होईल व त्याचा फायदा जनतेला होईल .
14,,,, निवासी नवोदय विद्यालयाची संख्या व या विद्यालयाचे अनुदानात वाढ करणे आवश्यक आहे ते भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल .
15,,, भारतात केंद्रीय विद्यापीठ संख्या 45असून यात एस सी /एस टी प्रवर्गा चे 12 उप कुलगुरू नियमाने असले पाहिजेत , परंतु सद्यस्थितीत ते फक्त 2च आहेत , त्यांची तत्काळ भरती करून कोटा पूर्ण करावा.
या सह दिलेल्या 44 पानी निवेदन पत्रिकेत संपर्ण विज्ञान आधारित , व शासन मान्य सर्व्हे नुसार केलेल्या डाटा नुसार वास्तवाची मांडणी करण्यात आली आहे ,
जागतिक पातळीवरील भुकेचा निर्देशांक ठरवण्यात आलेला असून यात भारताचा क्रमांक 125देशात 111 वा आहे .
58% चे पुढे महिला ॲनिमिया ग्रस्त आहेत , (रक्तातील हिमोग्लोबिन पातळी कमी असणे) जंगल , जमीन , पाणी , याची हजारो वर्षा पासून ची विषम वाटणी आणि अलीकडे 90 चे दशकात स्वीकारलेल्या मुक्त भांडवली अर्थ व्यवस्था , उदारी करण, याने शोषण प्रचंड वाढलेले असून शासनाने कल्याणकारी राज्य या संकल्पनेतून अंग काढून घेतल्याने शिक्षण व आरोग्य व्यवस्थेवर केला जाणारा खर्च हा अत्यंत कमी टक्केवारीचा आहे ,
या साठी आमूलाग्र बदल स्वीकारण्याची आवश्यकता आहे , आणि त्या साठी जनमताचा रेटा ही असणे आवश्यक आहे
परंतु याचे गांभीर्य शोषित जनतेला नाही , आणि ते वेगवेगळ्या लढाया लढण्यात दंग झालेले आहेत ,
या बहुजन वर्गाला केंव्हा जाग येणार?
आज अस्तित्वात असलेला मध्यम वर्गीय नौकरदार वर्ग ही शेवटची आहे , त्या नंतर भरती झाल्या नाहीत तर अकुशल , कंत्राटी , कमी वेतन वरील काम , सफाई कामगार असेच जीवन जगावे लागेल , .
पुढच्या पिढीच्या आयुष्याचा कोळसा हातात येण्या पूर्वी जागे व्हा ,, हा संदेश ते देत आहेत .
एस सी /एस टी/ओबीसी/अल्पसंख्यांक समूहाने तातडीने एकत्रित येण्याची गरज आहे ,, असे आवाहन आम्ही करत आहोत ,
व या मूळ प्रश्नाला हात घातला व थेट महा महीम राष्ट्रपती महोदय यांचे समवेत चर्चा करून त्यांचे लक्ष वेधून घेतले म्हणून आम्ही BANE अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर राष्ट्रीय असोसिएशन चे आभार व्यक्त करतो ,, त्यांनी त्यांचे कर्तव्य केले आता जनतेचे उत्तर दाईत्व आहे
निर्णय त्यांनी घ्यायचा आहे .
भ्रामक भावनिक आंदोलन आणि सत्ता प्राप्ती ची लढाई यात वेळ पैसा शक्ती खर्ची घालायची की , मूळ मुद्द्याला हात घालणारी लढाई उद्याच्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी लढायची ,,
जय भीम ,,,,, ????????????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत