देव नावाची भेजात घातलेली चिप निघता निघत नाही…

गरीब असो की श्रीमंत, राजा असो की रंक… प्रत्येकाच्या डोक्यातील भेजात देव नावाची चिप लहानपणी आई वडील, नातेवाईक,धर्माचे ठेकेदार, यांनी बसवलेली असते ती निघता निघत नाही. लहानपनी प्लेन असलेल्या भेजात घुसल्यावर ती मेल्या शिवाय जात नाही. एव्हडी प्रचंड भीती डोक्यात भरलेली असते.करोना काळात माणसाची एव्हडी सुजवली/जीरवली तरी माणूस देव देवळे सोडत नाही.(सर्वच धर्माचे)
केडीएमसीचा कर्मचारी प्रशांत गायकवाड अंगा पिंडाने मजबूत असलेला तरुण तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी लाईन लावतो लाईन मध्ये एव्हडी गर्दी असते की आत घुसलेला भक्त पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. प्रशांत आत घुसला आणि त्याचा दम घुसमटला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. बाहेर पडणे मुश्किल झाले आणि तेथेच त्याचा अंत झाला.असे अनेक मंदिर आहेत तेथे प्रचंड गर्दी होते. चेंगराचेंगरी होते. व्यवस्थापन योग्य व्यवस्था करीत नाही. त्या मुळे अनेकांना आपले प्राण मुकावे लागतात.
तिरुपतीने प्रशांत यांना वाचवले नाही. आपल्या कडे प्रथा आहे असे म्हणण्याची की वाचवले तर देवाने… गेला तर माणसाच्या त्याच्या चुकीने…
अनेकांच्या कार मध्ये देवाचे फोटो असतात तरीही अपघात होतातच.तेथे देवाची भक्ताला वाचवण्याची जबाबदारी नाही.
पेपरात आताच काही दिवसा पूर्वी वाचले होते की तिरुपतीला जातांना गाडीत असलेला शिवाजी महाराज यांची प्रतिमा चालत नाही. तेथे मराठी माणसाचा द्वेष करतात. तरी लोक तिरुपतीला जायचे काही थांबत नाही.
असे म्हणतात की तिरुपती संस्थान दक्षिणी हॉटेल मालकांना 2% व्याजाने धंद्याला पैसा देते. लोकांच्या केसांचा लिलाव केला जातो. देशातील सर्वात जास्त दान तिरुपती मंदिरात जमा होते.देशातील मंदिरातील जमा होणारे दान हे लोकांचे आहे तर हा सर्व पैसा जनतेची गरिबी दूर करण्यासाठी का वापरला जात नाही. देवळाच्या बाहेर भिकारी का??
असा प्रश्न लोकांना का पडत नाही.
कारण लहानपणी भेजात टाकलेली देव नावाची चिप…
मानसोपचार तज्ञ म्हणतात लहानपणी दाखवलेली देवाची आणि भुताची भीती मरे पर्यंत जात नाही.
बघा पटतंय का…?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत