महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

रमाईंना अनेक संकटाना सामोरे जावे लागले.

डॉ.बाबासाहेब दुसऱ्यांदा १९२० मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले, त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रमाबाईंवर पडली. डॉ.आंबेडकर दाम्पत्याला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले. जाण्यापूर्वी काही रोख रक्कम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईंना दिली , परंतु ती लवकरच संपुष्टात आली. त्यावेळी  मोठ्या कष्टाने ८-१० आणेच कमवून अाणत होत्या. या तुटपुंज्या पैशातच त्यांनी घरातील सदस्यांची पोटे भरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. तो काळ त्यांच्यासाठी फार कठीण होता. या कठीण काळात अनेकदा त्यांना उपाशी पोटी झोपावे लागले. रमाबाई भारतात कुटुंबासाठी दिवसातून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धडपडत असताना, डॉ. आंबेडकरही दूर लंडनमध्ये काही चांगल्या परिस्थितीत नव्हते.

डॉ. आंबेडकरांनी परदेशात शिक्षण घेत असताना रमाबाईंनी त्यांच्या आयुष्यातील दीर्घकाळ घर चालवण्याची जबाबदारी घेतली. ते परत आल्यानंतरही ते समाजकार्यात इतके मग्न झाले की त्यांना दिवसातून अर्धा तास रमाबाईंसाठी क्वचितच मिळत असे. त्यानंतरही रमाबाईंना कुटुंब एकट्यानेच सांभाळावे लागले. फरक एवढाच होता की तेव्हा बाबासाहेब त्यांना घर चालवण्यासाठी पैसे पुरवू शकत होते.रमाबाई आणि डॉ आंबेडकर यांना एकापाठोपाठ एक क्रूर आघात सहन करावे लागले, जेव्हा त्यांनी त्यांची तीन मुले आणि एक मुलगी गमावली. त्यांचा मुलगा गंगाधर डॉ. आंबेडकर अमेरिकेत शिकत असताना मरण पावला. पुढे यशवंत, रमेश, इंदू आणि राजरत्न यांचा जन्म झाला. नंतरच्या तिघांचेही निधन झाले. त्यांच्या चार मुलांचा मृत्यू झाल्यामुळे रमाबाई आणि आंबेडकर यांचे मन दु:खी झाले. त्यांच्या दुःखाला सीमा उरली नव्हती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!