महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
समाजबांधव समाजकंटक कसे?

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर
भारतातील कोणत्याही माणसाने साधा प्लॉट जरी घेतला किंवा कित्येक वर्षापासून शेतीवर त्या व्यक्तीचे नावाने 7/ 12 कुळाची किंवा पेरेपत्रकाची वहिती नुसार नोंद असेल तर योग्य , रीतसर कागदपत्राची छानबिन करून नोंद करण्यासाठी जीवाचे रान करून माझ्या पुढच्या पिढीला ती मालमत्ता मिळावी म्हणून कसोशिने प्रयत्नशील असतो.
माझ्या बापाने म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी तर माता रमाईच्या आग्रहाखातीर लाखो, करोडो बांधव नागभूमीच्या नगरीत एकसंघटित पणे बुध्दाच्या मूर्तीला नतमस्तक होण्यासाठी एकत्र येतील हाच दूरदृष्टीपणा ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी सन 1956 साली स्वतः, भन्तेगण आणी आपणा सर्वांचे बोट धरून पवित्र दीक्षाभूमीवर स्वतः धम्मदीक्षा घेऊन त्यांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली. त्यावेळेस आपल्या अज्ञानी बाप जाद्यासाठी आनंदाची पर्वणी तर होतीच आणी गुलामीच्या जबड्यातून मुक्त झालो होतो आणी आहे. काही महिन्यानंतर म्हणजे 6 डिसें 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणा सर्वाना सोडून गेलेत.
उपराजधानी नागपूर मध्ये स्थापित झालेल्या पवित्र दीक्षाभूमीची संपूर्ण जबाबदारी त्यावेळच्या रीतसर कमिटीवर आणी नंतर त्यांचे वारसदार ह्यांचे कडे हस्तांतरित करण्यात आली. ज्यांच्या खांद्यावर स्वाभिमानी समाजाने पवित्र दीक्षाभूमी सांभाळण्याची धुरा दिली ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी उच्च शिक्षणासाठी पाठविले होते विद्याविभूषित होऊन भारतात परत आले.त्यांना आणी त्यांच्या वारसदारांना एवढी सुद्धा जाण नव्हती की , आपल्या बापाने ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) आपल्या खांद्यावर " पवित्र दीक्षाभूमी " सांभाळायची आहे तर दीक्षाभूमीच्या जागेसंबंधीची योग्य कागदपत्रे गोळा करून शासन दरबारी नोंद रुजू करायची आहे. निव्वळ कमिटीमध्ये हेवेदावे करून पदाकरिता भुकेलेले होते काय ?
इतके वर्षाचा कालावधी लोटून ही दीक्षाभूमी नागपूरच्या नावाने गेल्या 70 वर्षापासून 7 /12 नावावर कां झाले नाही.? महसूल अधिकारी यांनी 2019 मध्ये दीक्षाभूमी नागपूरला झूडपी जंगल कां दाखविले? हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आजही स्वाभिमानी समाजाच्या मनात घर करून आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या ह्यातीत चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले होते की , तळे राखणारा हा पाणी पिणारच आहे यात काही शंका नाही. पण समाजाचेही कर्तव्य आहे की , तळे राखणाऱ्या वर लगाम लावायला पाहिजे हेच कर्तव्य म्हणून रविवार दि. 16 - 06 - 2024 रोजी समाजातील काही समाज बांधव चर्चे करिता दीक्षाभूमीवर आले आहेत. तसेच आद. विनोद कुमार खोब्रागडे सर हे सुद्धा काल - परवा दीक्षाभूमी नागपूर येथे जाऊन सौंदर्यकरणाचा ज्याला ठेका दिला आहे त्यांना फोन वर बोलून, समजून सांगून 24 तासाच्या आत मध्ये काम बंद करतो असे आश्वासन दिले. ते आपल्या अस्मितेचा तो प्रश्न आहे म्हणूनच ना!
दीक्षाभूमी नागपूरचे सचिव आद. राजेंद्र गवई सर ह्यांनी समाजाच्या सांत्वना करिता म्हणून स्वतः एक व्हिडीओ तयार केला असून त्यात त्यांनी दीक्षाभूमी जागेवर मेट्रो स्टेशन होणार नाही, भव्य दिव्य असे सौंदर्यकरण होणार आहे स्वतः व्हिडिओद्वारे समाजाला उद्देशून सांगितले. पुन्हा त्यात त्यांनी समाजावर रोष व्यक्त करून म्हटले की , समाजातील समाजकंटक विरोध दर्शवीत आहेत ह्यात त्यांनी क्रोधपणे , तिरस्कार युक्त समाजाला समाजकंटक असे संबोधल्यामुळे भारतातील समाज लोकांची मने दुखावल्या गेली असे त्यांना वाटत नाही काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या उपरोक्त संदर्भानुसार , आणि म्हणण्यानुसार जर स्वाभिमानी समाजधारकांनी आद. राजेंद्र गवई आणि कमिटीतील पदाधिकारी यांनी सदरचे संदर्भात चर्चा करून विचारणा केली असेल आणि त्यांनी कमिटीवर लगाम लावला असेल तर त्यात काय गैर आहे.? मग आपण त्यांना " समाजकंटक " कसे बोलू शकता ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत