2014 पासून संविधान मोडकळीस आणण्याच्या प्रयत्न

2014 पासून संविधान मोडकळीस आणण्याच्या प्रयत्नाला वेगाला तर परंतु कोणताच पारंपारिक पक्ष संविधानाच्या रक्षणार्थ रस्त्यावर आला नाही स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणणारा काँग्रेस तर अजिबात नाही संविधान बचावासाठी मोर्चे आंदोलने केली असतील ती एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने
या देशांमधील आंबेडकरी विचारांचे बहुजनवादी विचारवंत डॉक्टर प्राध्यापक वकील अभ्यासक यांनी विचारवंत काँग्रेस किंवा इतर पक्षांनी संविधानासाठी काय प्रयत्न केले आतापर्यंत सर्व पारंपारिक पक्षामुळे संविधान अडचणीत आले आहे अचानकपणे वंचितचा संविधानाचा मुद्दा घेऊन देश्यामध्ये प्रचार करून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु इथला शिक्षित बहुजन समाज आंबेडकरी विचाराचा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरला.
वंचित ला जर पाच जागा दिल्या असत्या तर एक-दोन जागा निवडून आल्या असत्या आणि वंचित चे निवडून आलेले खासदार ही महाविकास आघाडीवर राहिले असते बाळासाहेबांना सत्तेत जायचेच असेल तर त्यांना कुठल्याही पक्षात गेलास किंवा कुठल्याही पक्षाच्या अटीवर पाठिंबा दिला तर त्यांना देशामध्ये कॅबिनेट मंत्री होता येणार नाही का?
त्यांच्या एक-दोन तुकड्यावर चळवळ रिकामी असे वाटते त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे
कांग्रेस राष्ट्रवादीच्या सालगड्यांना माहिती नसताना नाही त्या गोष्टीत शहाणपणा दाखवू नये इथल्या पारंपारिक पक्षांना राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर रुजावा असे अजिबात वाटत नाही माने सरोदे कसबे मुणगेकर वागळे परदेस्थ पाटील सारख्यांना आम्ही पारंपारिक पक्षाचे सालगडी म्हणून राहावे असे वाटते
वंचित इतके दिवस आम्हाला बरोबर घ्या म्हणून काँग्रेसच्या मागे लागली होती वंचितने काँग्रेस सात ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देण्याबद्दल सुतोवाच्य केले होते
काँग्रेस व राष्ट्रवादीवाले फक्त फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा राजकारणासाठी कांदे पोह्यातून कढीपत्ता काढून सत्तेचे चवदार पोहे खात असतात शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्र मध्ये आंबेडकरी विचारधारेचा पाडाव केलेला आहे
2024 मध्ये देखील राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी पवारांच्या कन्येसाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला
परंतु शरद पवार सारख्या जाणता राजा सर्वच पक्षात दरारा ठेवून आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे
काँग्रेस पक्षात तर त्यांचा शब्द अंतिम असल्यासारखे आहे परंतु अकोल्या साठी काँग्रेसला उमेदवार न देण्याबद्दल काँग्रेसला ठणकावून सांगु शकले असते त्यांनी तसे केले नाही कारण त्यांना या राज्यांमध्ये फुले शाहू आंबेडकरवाद अजिबात रुजून द्यायचा नाही हे स्पष्ट आहे.
हे फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेला धोकादायक नाही का? सुशिक्षित आंबेडकर वाद्यांनी जर रोज अर्धा तास तरी सोशल मीडियाच्या व इतर गोष्टींनी 100-200 लोकांशी संपर्क करून आंबेडकरी राजकारणाला हातभार लावला तर भविष्यात फार मोठे काम आपल्या हातून होणार आहे https://youtu.be/vFMH6DcuDi0?si=lsRo9_AODn33xZta
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत