धारावी विकास आंदोलनाचा सरकारला सवाल…


अदानीला भस्म्या रोग झालाय का?
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे एकूण क्षेत्र आहे, ५५० एकर जमिनीचे.
या प्रकल्पाकरिता अदानीची धारावी बाहेरील खालील प्रमाणे जमीन मागणी आहे.
१. रेल्वे : ४५ एकर
२. मुलुंड जकात नाका: १८ एकर
३. मुलुंड कचरापट्टी: (DUMPING GROUND) ४६ एकर
४. मिठागरे: २८३ एकर
५. मानखुर्द कचरापट्टी: (DUMPING GROUND) ८२३ एकर
६. G ब्लॉक BKC: १७ एकर
७. मदर डेअरी कुर्ला: २१ एकर
एकूण: १२५३ एकर
अदानीला झालेला या भस्म्या रोगाची भूक भागवण्याचे काम शिंदे-फडणवीस-अजित पवारांचे महायुतीचे सरकार बिनदिक्कत करीत असून, रोज नवनवीन आदेश काढून अदानीवर सवलतीची लयलूट करीत आहे.
जी जमीन सरकारची, ती जमीन अदानीची
हे सरकारचे धोरण झाले आहे.
मुंबईकरांनो आत्ता तरी आवाज उठवा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे आडून अदानी अख्खी मुंबईच गिळंकृत करायला पाहतोय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत