मराठवाडा

६८५ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी संपवले जीवन.

मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणा-या मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा वेग प्रचंड वाढला असून, गेल्या आठ महिन्यांत तब्बल ८६५ शेतक-यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे.

म्हणजेच दिवसाकाठी २ ते ३ शेतकरी आत्महत्या होत आहेत. धक्कादायक म्हणजे हा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक समजला जात आहे. तर, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर सर्वांत आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. मात्र, आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच १ जानेवारीपासून ते ३१ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल ६८५ शेतक-यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. अंगावर शहारे आणणारा हा आकडा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक असल्याचे बोलले जात आहे.

आत्महत्यांचा वेग चिंताजनक
गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच १ जानेवारीपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल ६८५ शेतक-यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे. दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात मराठवाड्यात १ हजार २२ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. असे असताना यावर्षी आठ महिन्यांतच ६८५ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!