महाराष्ट्रमुख्यपान

शासनानं एसटी कर्मचा-यांच्या मागण्या अखेर मान्य केल्यात.

राज्य सरकारने 2 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर गेले होते. सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संपाच्या पहिल्याच दिवशी आपल्या आर्थिक मागण्यांसंदर्भात उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.  या आंदोलनासंदर्भात सोमवारी दुपारी 12 वाजता शासनाच्यावतीने सह्याद्री अतिथिगृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्यताप्राप्त संघटनेसमवेत बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, घरभाडे मिळावं, वार्षिक वेतनवाढीची रक्कम फरकासह मिळावी, यासाठी आंदोलन केले जात होतं. सप्टेंबर पेड इन ॲाक्टोबरच्या वेतनापासून महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 42 टक्के देण्यात येईल. सर्व थकबाकी संदर्भात 15 दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, उद्योग मंत्री आणि एस टी कामगार संघटनेसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सण उचल 12,500 रुपये मुळ वेतनाची अट न घालता दिले जाईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!