भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भगवान बुद्धाची विचारधारा….

सुरेश भवर नाशिक


बोधिसत्वाचे जीवन बोधिसत्वाचे जीवन अमूल्य असते आणि ते जीवन सुरू राहावे म्हणून आपण शरीर धर्माला अनुसरून खाणे पिणे झोपणे अधिक्रिया करीत असतो. आपण अन्नग्रहण करताना सुद्धा आपले शरीर बोधिसत्वाचे असल्याने ते जिवंत राहावे हाच उद्देश असतो त्यामुळे आपण ग्रहण करत असलेल्या प्रत्येकासावा एक विशिष्ट गुणवत्ता प्राप्त होते.
बुद्धत्वा ला पोहोचण्याआधी बोधिसत्वाच्या ज्या दहा अवस्था पार कराव्या लागतात त्यासाठी आपण विवेक बुद्धी आणि ध्यानाच्या पद्धती यावर भर देत असतो. बोधी चित्त अवस्था प्राप्त झाली की आपण शून्य त्वाचे स्वरूप जाणून घेतो. आपल्या ‘ स्व’ मधले शून्य एकदा आपल्याला प्रतीत झाले की आपली आत्म लोलूप प्रवृत्ती आणि संसारातील मोहमाया यापासून आपण विभक्त होतो. आपल्याला सर्वच घटनांमध्ये शून्यत्व जाणू लागते आणि आपल्याला जगातील सर्वच गोष्टीचे मोहमयी स्वरूप सगळीकडे जाणू लागते.
जेव्हा एखादा जादूगार आपल्यासमोर हात चलाखीने किंवा नजरबंदीने एखादे चित्र किंवा घटना उभी करतो, तेव्हा प्रेक्षकांना ती खरोखर अस्तित्वात आहे असे वाटते. खरंतर जे इतर प्रेक्षक बघत असतात, तेच तो जादूगर ही पहात असतो. फरक एवढाच असतो की त्याची समज वेगळी असते. जेव्हा तो एखादी सुंदर स्री अवतरीत करीत असतो, तेव्हा प्रेक्षकांमधील पुरुषांच्या मना त वासना उत्पन्न होते. जेव्हा तो एखादे हिंस्र पशु अवतरीत करीत असतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात भीती दाटून येते. जादूगार देखील सुंदर स्री आणि हिंस्र पशु, दोन्हींनाही प्रेक्षकाप्रमाणे बघत असतो, पण त्याला माहिती असते की, हे असत्य आहे. ते केवळ एक शून्य आहे ज्यात त्याने यांचे अस्तित्व दर्शविली आहे. त्यांचे सत्य स्वरूप ते जसे दिसतात त्यापेक्षा निराळे आहे.
त्याचप्रमाणे बोधिसत्व हे सुद्धा ज्यामुळे आपण संसारी क मोहोपाशा अडकून पडतो अशा जगातील प्रत्येक गोष्टी मागचे भ्रमित स्वरूप जाणू लागतात आणि त्यांच्या ठाई या गोष्टीबाबत की तिरस्कार निर्माण होतो.
भगवान बुद्ध म्हणतात
जगण्याच्या नेमक्या पद्धती आणि विवेक बुद्धी यांची सुयोग्य सांगड घालून बोधिसत्व बुद्धत्वाच्या वाटेवर असलेल्याच्या रूप काय म्हणजे शारीरिक स्वरूप आणि धम्म काया म्हणजे मानसिक स्वरूप या दोन वर परिणाम करतात.
त्यांची अत्यंतिक उच्च कोटीची गुणवत्ता असलेली ऊर्जा आणि विवेक बुद्धी त्यांना बोधिसत्वाच्या पहिल्या अवस्थेला घेऊन जाते, जिथे त्यांना शून्यत्वाची प्रचिती येते आणि ते मुक्तीच्या मार्गातले सर्वच अडथळे पार करत सत्याचे स्वरूप जाणतात. एकदा का हे सत्य स्वरूप समजले की, मग बोधिसत्वाच्या दहा पातळ्या ते पार करतात आणि सर्व सर्व ज्ञतेच्या मार्गातले सर्व अडथळे हळूहळू दूर करतात किंवा होत जातात.
सर्वप्रथम ते अगदी खालच्या पातळीवर असलेले आपले अज्ञान दूर करतात आणि नंतर ध्यानाच्या नेमक्या पद्धती आणि विवेक बुद्धीच्या साहाय्याने परम ज्ञानप्राप्तीच्या परिपूर्णतेला उपलब्ध होतात.
भगवान बुद्धांची विचारधारा
प्रसारित :- सुरेश भवर नाशिक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!