खरे बुध्द तत्त्वज्ञान

( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचार प्रणालीतुन )
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
बुद्ध हा एक विचारवंत होता.ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की , ” भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो ” नाग लोकांनी ” केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामधील लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनींनी त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास नागपूर म्हणजे ” नागांचे गाव ” असे म्हणतात
संदर्भ – मी पाहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक – भन्ते सुमेध. पृष्ठ. क्रं.94. पैरा – मधला.
तसेच ते पुढे म्हणतात -
येथून सुमारे 27 मैलावर नजीकच वाहणारी जी नदी आहे ती नागनदी आहे. हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण हे आहे. नागपूर यामुळेच निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजवण्याचा कोठेच प्रश्न नाही. तशी भावनाही नाही. ” आर. एस. एस. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा त्याचा कोणी अर्थ करून घेऊ नये
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.94. पैरा – शेवटचा.
जर आचार्य गोयंका आणि ओशो रजनीश हे जे बुध्दाचे भेसळयुक्त वचन मुलामा लावून आपणास सांगत असतील तर त्यांनी हिंदू धर्माला लाथाडून ह्यात असतांनी बौद्ध धर्माची दिक्षा का घेतली नाही ? हे आपण सुज्ञ बौद्ध उपासकांनी जाणून घेणे गरजेचे आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुध्दावर आरोप लावून काय म्हणतात ते पहा -
धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकी हे एक कारण आहे
या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.342.अनु. क्रं.12 आणि 13. प्रकरण – 1.
बौद्ध धम्म विलुप्त होण्याचे चौथे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे – ध्यान – साधना , समाधी वास्तविक ध्यानधारणा किंवा समाधी ही हिंदूंच्या वेदांतील एक भाग म्हणजे ज्ञान होय असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते पहा –
ज्ञान विश्वास आणि ध्यानधारणा, समाधी यांच्यासह जर यज्ञ केला तर तो अधिक प्रभावी होतो. या ग्रंथात स्पष्टपणे म्हटले आहे की, यज्ञकार्याचा एक भाग म्हणजे ज्ञान होय
संदर्भ – क्रांती – प्रतिक्रांती. पृष्ठ. क्रं.26 अनु. क्रं.4. यात यज्ञकार्य जर सोडले तर ध्यानधारणा ( समाधी ) ही हिंदू धर्मातील यज्ञकार्याचा एक भाग होय असे निश्चित म्हणता येईल.म्हणूनच आचार्य गोयंका आणि ओशो रजनीश ह्यांनी बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गातील शेवटचे सम्यक समाधीला नाकारून प्रज्ञा, शील आणि फक्त समाधीचा प्रचार – प्रसार केला आहे आणि त्यांची मानसिक पिलावळ त्याच मार्गाचा अवलंब करून डोळे मिटून, पोटातील आतड्यांना पीळ देऊन स्वतःचे मज्जातंतू ठिसूळ आणि क्षीण करीत आहेत
बुद्धांनी विपश्यना सांगितली का ? सदरचे पुस्तकात आद. एन. जी. कांबळे सर , नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेल्या धम्मा सहित समग्र क्रांतीच्या विरोधाबाबत काय म्हणतात ते पण पहा -
तेव्हा पासून तर आज पर्यंत ब्राह्मण पुरुषाच्या जीवासाठी, त्यांच्या सुख सोयीसाठी सर्वात जास्त काळजी घेत आले आहेत. अशाही विपरीत परिस्थितीत ते या प्रतिक्रांतीमध्ये विजयी राहिले. याला मूळ कारण म्हणजे ब्राह्मण मोठ्या शिताफिने " नागवंशीय बहुजनांना त्यांच्याच बहुजनांच्या तसेच बौद्ध धम्म, संस्कृती व लोकशाहीच्या विरोधात फितुरी करण्यासाठी त्यांचा बुद्धीभ्रश करण्यात यशस्वी झाले. त्यानुसार ब्राह्मणांनी फितूर बहुजनांकडूनच बहुजनांचे शिरकाण करून घेण्यात , त्यांच्याकडूनच त्यांचा बौद्ध धम्म, संस्कृती व लोकशाही नष्ट करून घेण्यात यशस्वीता प्राप्त केली. अशा स्वरूपाच्या घडलेल्या ऐतिहासिक प्रतिक्रांतीकारी नीतीची तंतोतंत पुनरावृत्ती त्यानंतर दोन हजार वर्षांनी ब्राह्मण वर्ग आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोयंकाचे विपश्यना केंद्र यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेल्या धम्मा सहित समग्र क्रांतीच्या विरोधात तिच्या उच्चाटनासाठी स्वतःला बौद्ध अथवा आंबेडकरी म्हणविणाऱ्या फितुरांकडूनच करून घेत आहे. हे ऐतिहासिक प्रतिक्रांतीचे प्रत्यक्षात आजचे वास्तव आहे
संदर्भ – बुद्धांनी विपश्यना सांगितली का ?लेखक – आद. एन. जी. कांबळे सर , नागपूर. पृष्ठ. क्रं.260 – 261. पैरा – शेवटचा आणि पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माणसाची उन्नती , मन आणि माणसाचे शरीर कसे निरोगी राहिले पाहिजे तसेच रेडा , बैल आणि माणूस ह्यात फरक कसा आहे याविषयी मौलिक असे मार्गदर्शन करताना म्हणतात -
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक बाब आहे. मला माहित आहे की , कार्ल - मार्क्सच्या वचनामुळे एक पंथ निघाला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट ( न्याहारी ) मिळाला , निवांत झोप मिळाली ही संपले. हे त्यांचे तत्त्वज्ञान. मी त्या मताचा नाही. " माझ्या इतके कस्टमर जीवन कोणीही काढले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हाव्यात पाहिजे.
पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसांनाही अन्न लागते. मात्र दोहोत हा फरक आहे की , रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचा विचार करावायाचा असतो. " मनाचा विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोकांना शिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात. त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जशी निरोगी पाहिजे तसें, शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जात उदयास आली असे म्हणता येणार नाही"
पुढे ते मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते? याविषयी म्हणतात –
त्याचे कारणे ही की , त्यास एक शारीरिक किडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्यूदयही नाही. हा उत्साह का राहत नाही ? त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की ,” त्याला वर येण्याची संधीच मिळत नाही अगर राहत नाही.त्यामुळे त्यास उत्साह कुठून असणार ? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो………… उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल , तो हिम्मतवान असेल , मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा आत्मविश्वास ज्यास वाटतो , त्याच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचा उत्कर्ष होतो
संदर्भ – मी पाहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक – भन्ते सुमेध. पृष्ठ. क्रं.97 – 98. पैरा – शेवटचा – पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरी धम्मक्रांती केली. बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. पिढीतांना - बहुजनांना नवे जीवन प्राप्त करून दिले. खरा बुद्ध तत्त्वज्ञानाला त्यांच्यामुळेच उजाळा मिळाला. हे नाकारता येणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत