महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी आणि विज्ञानवादी कल्याणकारी धम्म दिला : आयु. एस के भंडारे सर

 

 

मनुष्य म्हणून जगायचे असेल तर धर्माचा व नात्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

प्रत्येक यूवक व युवती कडे वैचारिक नेतृत्व , कर्तुत्व , वक्तृत्व असणे आजच्या काळाची गरज आहे . विज्ञानाच्या प्रगतीने मनुष्याचे भौतिक जीवन सुखी होते तथापि मनुष्याच्या अंतरंग समृद्धीसाठी मानवी नीती व मूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे , तरच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी होऊ शकेल .

नवभारताची उभारणी जातीच्या पायावर नसून समतावादी विज्ञानाच्या पायावर उभी केली आहे . प्रत्येक समाजामध्ये नात्यांचा आदर आणि सन्मान करणे , मानवाच्या मनातील धम्मा विषयी भावना विचार व्यक्त करणे एक मेकाच्या सहवासातील एक मेकांशी माणसे जोडली पाहिजेत कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक मानवाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानसिक सामर्थ्य दिले आहे , मानवी कणखरपणा दिलेला आहे , म्हणूनच तथागतांचा धम्म आचरणात आणायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये समाज मंदिरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चा लावा आणि बौद्ध संस्काराचे धडे गिरवायला काहीच हरकत नाही . आणि याच धम्मा मध्ये कल्याणचा मार्ग नक्कीच सापडेल यात शंका नाही असे परखड मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राज्याचे प्रमुख एस के भंडारे यांनी व्यक्त केले .

नुकताच लोहारा येथे लोक वाचनालयात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने महामानव विचार जयंती संविधान संरक्षण अभियाना अंतर्गत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते . यावेळी प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेच पुजन करून त्रिशरण पंचशिल देण्यात आले व समारोपा वेळी एस . के . भंडारे यांनी भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचून शपथ दिली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे लोहारा तालुका अध्यक्ष तानाजी माटे हे होते तर प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव दक्षिण विभाग जिल्हाध्यक्षा विजयमालाताई धावारे , सर चिटणीस विद्यानंद वाघमारे , कोषाध्यक्षा राजश्रीताई कदम , पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे , संस्कार सचिव कुमार ढेपे , कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे
अनिल सरतापे , दत्ता गायकवाड वैभव सिरसट , विठ्ठल सुरते , अनंता कांबळे , सुधाकर गायकवाड , रत्नदिप मस्के , सह समता सैनिक दलाच्या महिला सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .
भारतीय बौद्ध महासभेच्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!