दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

दिनविशेष – शनिवार दिनांक 11 मे 2024

आज दि. ११ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सनिवारो, वेसाख मासो, शनिवार, वैशाख माहे.

११ मे १८८८ – रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) या समारंभामध्ये जनतेच्या वतीने थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले (गोऱ्हे) यांना रावबहादर बडेकर यांनी “महात्मा” ही पदवी दिली.

११ मे १९३८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज सकाळी ८ वांजता नागपुरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्ये केली पाहिजेत, समाजाची सेवा केली पाहिजे.” सकाळी १० ते सायंकाळी ४:३० पर्यंत ते कार्यालयात गेले. ते संध्याकाळी ६ वाजता कामठीला निघाले. तेथे मुक्कामी श्री. हरदास एल. एन. यांच्याबरोबर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर स्वागत करण्यात आले.

११ मे १९४१ – रोजी आर. एम. भट हायस्कूल, परळ, मुंबई येथे झालेल्या मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन (तिसरे) प्रिन्सिपॉल दादासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विश्र्वानवृत्ती (कुत्र्याच्या) नव्हे तर मनुष्याच्या मानसिकतेचे अनुसरण करा.”

११ मे १९५२ – रोजी हैद्राबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सरकारने आर्थिक बोझा सहन करून धान्याच्या किमती माफक ठेवाव्यात.”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!