आंबेडकरी विचार; बौध्दांचे नेतृत्व करतोय ! – ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम


ते नागपुरातील अभियंतांनी पुढाकार घेतलेल्या ‘बानाई सहकारी पतसंस्थे’च्या बेझणबाग पहिल्या शाखेचे उदघाटन करतांना बोलत होते. महाराष्ट्रातील बौद्धांच्या जीवनात, निर्णयाच्या या कठिणतम काळात आंबेडकरी विचाराने निर्णयाचे सारथ्य केले, असेही ते म्हणाले.
तसेही आर्थिक विषमतेकडे आंबेडकरवाद्यांचे खूप दुर्लक्ष झाले आहे. आजच्या निमित्ताने ती मोठी तूट भरून काढण्याकडे जोरदार पाऊल असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अत्यंत प्रसन्नतेत उदघाटनाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंत राजेंद्र घाटे, सिध्दार्थ गायकवाड, डॉ शंकर खोब्रागडे, हरिभाऊ किरपाणे, डॉ सूचीत बागडे, पुष्पा बौध्द, इ मो नारनवरे, मनोहर मेश्राम, के जे चव्हाण, अनुप सांगोडे, राहुल हनुवते तसेच बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम ह्यांची समयोचित भाषणे झाली.
या प्रसन्न कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील डी एम आटे,जयंत इंगळे, डॉ अशोक उरकुडे, अमित गडपायले, अशोक कोल्हटकर, राजेंद्र थुल, सच्चिदानंद दारुंडे, भीमराव गेडाम, मिलिंद बहादुरे, के एच वाघमारे, अशोक शंभरकर, डॉ पूजा नाखले, प्रदीप नगरारे, भास्कर खोब्रागडे, श्याम चव्हाण, अनिता मसराम, गोपाल वासनिक, विठ्ठल नारनवरे, विक्रम बोरकर, अश्विन कापसे, जीवन गेडाम, एड निकोसे, संजय लोखंडे, सतीश ओरके, विवेक निकोसे ह्या मान्यवरांसह मोठी उपस्थिती होती.
उदघाटन सोहळ्याचे संचलन नरेश सवाईथुल व आभार प्रदर्शन अभियंता राजू भिवगडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत