संघ स्वयंसेवकाचे आत्मिक समाधान ?

ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
कालच तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकी साठी मतदानाची प्रक्रिया पार पडली ,
या निवडणुकीत भाजप कडून उभे राहिलेले अनेक उमेदवार हे मूलतः संघ परिवारातील किंवा जनसंघा चे मुशीतून तयार झालेले नव्हते ,
भाजपा ने विकसित केलेल्या हिंदुत्व वादी विचारधारेचा आणि त्या तत्वज्ञानाचा अभ्यास केलेल्या वर्गातील अनुयायी ही ते नव्हते .
त्या पैकी अनेक जण हे काँग्रेस किंवा स्थानिक प्रादेशिक पक्षातून आलेले होते ,
शुद्ध , विशुद्ध चारित्र्य संपन्नता हा त्यांचा गुण विशेष नव्हता , पण ते आर्थिक दृष्ट्या दांडगे होते , आणि समाज व्यवस्थेत ही ते दंबंग च होते .
मी ज्या माढा लोकसभा परिक्षेत्रात राहतो , तेथील लोकसभेचे उमेदवार भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर हे होते .
त्यांचे सहकारी माण चे आमदार जयकुमार गोरे हे होते , तसेच सांगोला चे आमदार शहाजी बापू पाटील , करमाळा चे आ संजय मामा शिंदे , आ प्रशांत परिचारक अशी मंडळी होती
यातील प्रशांत परिचारक वगळता क्रिमिनल रेकॉर्ड चां मागोवा घेतला तर अनेक भानगडी , खोटी कागदपत्रे बनवणे , महिला विनय भंग करणे ,
ॲट्रॉसिटी कायद्यास पात्र ठरतील असे गुन्हे असलेली ही मंडळी आहेत ,
एखादी व्यक्ती राजकारणात कशी येते ? आणि कशी मोठी होते याचे उत्तम उदाहरण आ जयकुमार गोरे यांचे आहे ,
अतिशय बे मुर्वतखोर बनून त्यांनी अनेक गुन्हे आणि दादा गिरी केली , अगदी 420सारखे गुन्हे अंगावर घेऊन , जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करून बोगस मालक उभा करून जमिनीच्या खरेदी केल्याचे गुन्हे आहेत ,
गौण खनिज संपत्ती तर यांच्याच घरची ,,
खोट्या चलनी नोटांच्या गुन्ह्याची झळ इथपर्यंत पोहचली नाही याचे कारण ते पतंगराव कदम यांचे भाचे जावई असल्या मुळेच ,
पुढे भाजपचे आश्रयाला गेले की सगळे गुन्हे माफ होतात आणि प्रत्येक गुन्ह्यातून अलगदपणे सुटका होती असे म्हणतात
जसे कमळाचे फुल चिखलात असते पण त्याचा दांडा इतका उंच असतो की चिखल त्यास लागत च नाही
तसे हे आहे
कविवर्य सुरेश भट यांच्या गझल मधील या ओळी प्रमाणे
“रंगात रंगूनी रंग माझा वेगळा”
गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा”
तसे कोणता ही गुन्हा यांचे कांहीं बिघडवू शकत नाही ,
खा रणजितसिंह निंबाळकर यांचे दोन गुन्हे तर इतके गाजले की , नंदू ननवरे व त्यांच्या पत्नी ने आत्महत्या केली ती या माणसाच्या दादा गिरी मुळे , आणि या माणसाला मी मोदी जी मुळे भारावून जाऊन भाजपला मतदान केले .याचा पश्चाताप म्हणून ज्या बोटाने मी कमळापुढील बटन दाबले ते बोट तोडून टाकतो असे म्हणून नंदू ननवरे यांचे बंधू धनंजय ननवरे यांनी त्यांचे बोट कोयत्याने स्वतः एका घावात देहा वेगळे करून घेतले .
दुसरी केस ही अशीच आहे , दिगंबर आगवणे यांची , या माणसाचा रणजितसिंह निंबाळकर यांच्या वर इतका पराकोटीचा विश्वास होता की विचारता सोय नाही ,
आम्ही एकदा त्यांना भेटायला गेलो होतो , फलटण मधून आम्हाला वृत्तपत्राची प्रिंटिंग मशीन घ्यायची होती , तेंव्हा यांची भेट झाली होती दोन टर्म मध्ये विधानसभा साठी ते उमेदवार म्हणून उभे केले गेले होते ,
या अगदी जवळच्या मित्राला विश्वासात घेऊन त्यांचे नावे कोट्यवधी रुपये बँके कडून उचलण्यास सांगितले , ते स्वतः वापरले , त्यांनी काढलेल्या पत संस्थेतील रक्कम ही स्वतः साठी वापरली ,
आपला विश्वासघात झाला आहे हे त्यांना तेंव्हा कळले जेंव्हा या कर्जाशी माझा सबंध काय? म्हणून त्यांनी हात वर केले .
बँक केस आणि पतसंस्था ठेवीदार यांच्या केसेस मध्ये दिगंबर आगवणे आत गेले , त्यांचे पाठोपाठ त्यांची पत्नी ही आरोपी बनवली गेली , घर आणि फॅक्टरी ही गेली , दोन मुली आज नातेवाइकांच्या आश्रयाने जीवन जगत आहेत , इतकी शोकांतिका दिंगबर आगवणे यांच्या वाट्याला आली .
आ शहाजी बापू पाटील यांच्या वर अश्या किती तरी केसेस होत्या , अगदी खंडणी सारखी केस त्यांचे विरोधात झालेली होती
सांगोला येथील श्रीकांत देशमुख , भाजप चे हे नेते होते , राजकारणात सहानुभूती मिळवण्या साठी या नेत्याने स्वतः स्वतःचे गाडीवर गोळीबार केला होता ,
मुंबई येथील एका असाह्य महिलेला सहानुभूतीच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दर्शवून माझी पहिली पत्नी आजारी असते इत्यादी बहाणे बनवून शाररिक सबंध स्थापित करून ही हा नेता बनवला गेला .
माढा तालुक्यातील शिंदे बंधू यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे कायदेशीर रित्या निघालेले आहेत , मागास वर्गीयांची जंगदंबा सह सुत गिरणी बेकायदेशीर खरेदी प्रकरण असो
किंवा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्ज काढून स्वतः साठी वापरणे असो , ज्या मुळे अनेकांची सी बिल रेकॉर्ड खराब झाले , इतके गुन्हे करून ही हे लोक भाजप चे आश्रयाने सुखी व समृद्ध आहेत
याच लोकांना सत्तेची ऊब मिळणार , लोकसभा असो किंवा विधान सभा याच्या उमेदवारी ही याच लोकांना मिळणार
आणि काँग्रेस मुक्त भारत , भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणून याच लोकांच्या पालख्या संघ स्वयंसेवक आपल्या खांद्यावरून वाहवून नेणार ?
तत्व निष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचे भवितव्य खरोखर या व्यवस्थेत आहे काय? असा मला प्रश्न पडलेला आहे .
6 तारखेला मी माझी किडलेली अक्कल दाढ काढून टाकली , त्या दाढेवर एक काळा ठिपका दिसत होता .
मी प्रचंड असा जिज्ञासा वृत्तीचा माणूस आहे , ही किड नेमकी कशी असते म्हणून मी त्या दाढेला घरी आणले आणि त्यावर हायड्रोजन पेरॉक्साईड टाकून स्वच्छ केले , सुई वापरून तो भाग स्वच्छ करताना मला आढळले , माझ्या दाताचा वरचा भाग टणक होता , पण आतून तो पोकळ झालेला होता त्याचा मऊ गाभा त्या किटाणू किंवा विषाणू यांनी खाऊन टाकला होता , ही पोकळी थेट जबड्याच्या हाडा पर्यंत पोहचली होती .
आज भारतीय घटनात्मक लोकशाही राज्याची अवस्था अशीच झाली आहे , जनतेच्या सर्वांगीण शोषणाचे (धन आणि अब्रू सह ) शोषणकर्ते राज्यकर्ते बनून देशाची साधन संपत्ती , खनिज संपत्ती , लुटून गब्बर गंड होत आहेत ,
आणि अश्या लोकांना निवडून देण्याचे काम विचाराचे वाहक बनून सर्व सामान्य स्वंय सेवकांना करावे लागत आहे ,
हेच का त्यांचे राम राज्य ? ज्याचे अधिपती अजित दादा , आणि एकनाथ शिंदे होत आहेत ?
यात तुम्ही कुठे आहात ? सत्तेच्या लंके पर्यंत जाणारा राम सेतू बांधताना याच भ्रष्टाचारी माणसांना सुखरूप पोहचता यावे म्हणून कठोर परिश्रम घेणारे खारू ताई बनून कुठे तरी पत्रके वाटत फिरत असतील ,,,
सत्ता प्राप्ती नंतर पंच तारांकित हॉटेल मध्ये वाईन चां आस्वाद घेत ते राज्यकर्ते
“नमस्ते सदा वास्तले मातृभूमी” म्हणत म्हणत मातृभूमी चे वंदन करत असतील,,,,,
गो रक्षणाचे हाकारे देत असताना , अदानी चे बंदरा वरून हजारो कंटेनर मधून आखाती देशात कत्तली साठी जाणाऱ्या गाई चे अरण्य रुदन न ऐकता डोळे मिटून घेत राहतील .
संस्कृती रक्षण आणि इतिहासा तील स्त्रियांच्या लैंगिक शोषणा प्रति
क्रोधमान होऊन वर्तमानात सूड उगवू पाहणारे हात आणि डोळे
प्रज्वल रेवन्ना द्वारे 3400महिलांच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओ पाहून असाह्य होतील किंवा कृत कृत्य होतील ,,,,
मणिपूर मधील महिलांची नग्न धिंड त्यांच्या डोळ्यात आसवे आणू शकले नाहीत कारण ती आदिवासी होती .
आंतर राष्ट्रीय महिला कुस्तीपटू फोगट असो किंवा या 3400महिला यातील हिंदू किती ? याचा शोध त्यांनी घ्यायचा आहे ,
यातून तरी त्यांचे आत्मसमाधान झाले तर ठीक ,, नाही तर अजून या अत्याचाराचा कळस गाठा तो पर्यंत जो वर तुम्हाला तुमच्या माणूस असण्याची किळस वाटत नाही तोवर,,,,,!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत