निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्रातील लोकसभा 2024 चा तिसरा टप्पा संमिश्र घटनांनी ठरला रंगतदार.

लोकसभा 2024 निवडणुकीत काल राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कालचा दिवस अनेक महत्त्वाच्या, आरोप प्रत्यारोपाच्या तसेच evm संदर्भात कुठे पूजा तर कुठे जाळपोळ या घडामोडींची भरलेला होता. तिसरा टप्पा हा हाणामारीच्या अनेक घटनांनी सुध्धा गाजला. तर या टप्प्यात एका ठिकाणी चक्क ईव्हीएम जाळल्याची घटनाही घडली. सांगोला तालुक्यातील महुद या ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर evm मशीन ला आग लागल्याची घटना समोर आली. बऱ्याच प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली परंतु त्यामुळे मतदान प्रक्रियेत जवळपास 2 तास अडथळा निर्माण झाला. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखलही झाला.

काल अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात 11 जागांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. लोकसभा मतदारसंघा च्या रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी मतदान पार पडले. नेते मंडळी मध्ये शरद पवार, अजित पवार, ओमराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भासले यांनी मतदानाचा हक्क बजावला.

काल रोहित पवार यांनी एक द्वीट करत अजित पवार गटावर मध्यरात्री बारामतीतील मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटले, असा गंभीर आरोप केला. यासोबत त्यांनी काही व्हिडीओही पोस्ट केले. ज्यावरून आज दिवसभर दोन्ही गटाकडून एकमेंकानावर आरोपांच्या फैरी सुरु होत्या. राजकीय नेते आज एकीकडे आरोप-प्रत्यारोप करत असताना कार्यकर्ते थेट हाणामारीवर उतरले होते. अनेक ठिकाणी मतदानादरम्यान राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये धाराशिव, हातकणंगलेत येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्या. तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात राडा झाला.

मतदान यंत्रात बिघाड
सांगली सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पलूस कडेगांव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक 250 मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. मतदान यंत्र बंद पडले. तर रायगड जिल्ह्यातील धाटाव येथील मतदान केंद्रातील मशिनमध्येही बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं.

या व अशा अनेक घटनांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा भलताच रंगतदार ठरला. परंतु उन्हाच्या तडाख्या मुळे बहुतेक मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली व काल देशात झालेल्या मतदानात राज्यात सर्वात कमी म्हणजे 53% मतदान झाले आणि दिग्गज नेत्यांचे भवितव्य EVM मशीन मध्ये कैद झाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!