भारतातील राज्य निर्मिती – सुभाष मोरे

===≈=============
1)1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे भाषेच्या आधारावर विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना करण्यात आली.
2) 1 डिसेंबर 1963 रोजी आसाम राज्याचे विभाजन करून नागालॅंड हे राज्य स्थापन करण्यात आले.
3) 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब राज्याचे विभाजन करून भाषेचा आधारावर हरियाणा राज्य स्थापन करण्यात आले.
4) 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेश ह्या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
5) 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूर,त्रिपुरा व मेघालय या तीन राज्याची स्थापना करण्यात आली.
6) 16 मे 1975 रोजी सिक्कीम भारताचे 22 वे राज्य घोषित करण्यात आले.
7) 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांची स्थापना झाली.
8) 30 मे 1987 रोजी गोवा ह्या केंद्रशासित प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
9) 1 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेश राज्यातून छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली.
10) 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेशातून उत्तराखंड राज्य स्थापन झाले.
11) 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारमधून झारखंड राज्याची निर्मिती झाली.
12) 2 जून 2024 रोजी आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.
13) 31 ऑक्टोबर 2019 रोजी 370,कलम रद्द करण्यात आले. सोबत जम्मू आणि काश्मीरला असलेला पूर्ण राजाचा दर्जा काढून त्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले. एक भाग जम्मू आणि काश्मीर आणि दुसरा भाग लडाख असा करून ह्या दोन्ही भागांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
14) 26 जानेवारी 2020 रोजी दादरा-नगर-हवेली व दिव – दमण ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले.
वरील सर्व घडामोडीमुळे सध्या भारतात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
सुभाष मोरे
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत