निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

संविधान संरक्षण एस.सी., एस.टी., ओबीसी अल्पसंख्यांक आरक्षण सर्वांना स्वाभिमानाने निर्भय जीवन जगण्याकरीता 2024 लोकसभा निवडणूकीत अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात एकत्रित येण्याची आवश्यकता

1) बुध्द काळापासून एका बाजुला श्रमन संस्कृती तर दुसर्‍या बाजुला ब्राह्मण संस्कृती, एका बाजुला ईश्वर तर दुसर्‍या बाजुला निरईश्वर, एका बाजुला आत्मा तर दुसर्‍या बाजुला अनात्मा असे मुख्यत: दोन प्रवाह पूर्वी पासून चालत आलेले आहेत. बुध्दा नंतर राजे सम्राट अशोकाने आपल्या राज्य कारभारात 10 नियम तयार करुन जनतेच्या सुखी जीवनाकरीता जनतेच्या सुख-दु:खाचा कारभार पाहण्याकरीता विविध अधिकार्‍यांच्या नेमणूका करुन आपल्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेवून संकट समयी जनतेला संपूर्ण सहकार्याची भावना ठेवून संपूर्ण जंबुदीपात सर्वत्र बहुजन हिताय बहुजन सुखाय कारभार चालू ठेवला. पुढे संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, संत गाडगे बाबा आदींनी बुध्द विचारांचा प्रचार प्रसार केला व जनतेत परिवर्तन केले.

2) नंतरच्या काळात आर्य ब्राह्मण भारतात पोट भरण्यासाठी घुसून कपट नितीने देशावर वर्चस्व निर्माण केले आणि जनतेला अन्यायाचे चटके सहन करावे लागले. म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या काळात गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ नये म्हणून कायदे केले. 1830 नर बळी कायदा बंद, देवदाशी पुजा प्रथा बंद, चरक पुजा बंद, बांधकामात अस्पृश्यांना बळी देणे 1863 च्या कायद्याने बंद केली. अस्पृश्यांच्या पहिल्या धष्टपुष्ट मुलास गंगा दान करणे (गंगेत बुडून मारणे) प्रथा 1835 च्या कायद्याने बंद, अस्पृश्याना खुर्ची अधिकार 1835 च्या कायद्यानुसार बहाल केला. एसस्सी, एसटी, ओबीसी यांना शिक्षणाचा अधिकार बहाल केला. शासकीय सेवा, नोकर्‍या कायदा बहाल केला. शुद्रांना 1795 च्या कायद्यानुसार संपत्ती कमविण्याचा अधिकार बहाल केला. ब्राह्मण न्यायाधिशांना न्यायधिश म्हणून नेमण्याचा अधिकारी 1919 च्या कायद्यानुसार बंदी केली. कारण ब्राह्मण न्यायिक भावनेने न्याय देवू शकत नाही. नवविवाहित स्त्री शुध्दीकरण कायदा 1819 नुसार बंद.
पूर्वी शुद्रांचे लग्न झाले की, लग्नानंतर वरांना त्याचे घरी पाठवून विवाहित वधूस तीन दिवस ब्राह्मणासोबत शरिर सुखाकरिता ठेवून तीन दिवसानंतर पतीकडे पाठवले जायचे ही आमानुष प्रथा इंग्रज सरकारने वरील कायद्यानुसार बंद केली.

3) अन्याय, अत्याचाराची मालिका खंडीत होऊनही मुकी बहिरी झाली ही वांझ व्यवस्था आक्रोश सत्ता व्यवस्थेत दिसत नाही. गर्व भारतीय असल्याचा आम्ही करावा, जातीचा सैतान कुठे नेवून पुरावा. म्हणून या पुढे

4) भगवेकरण थांबवा. धर्माच्या नावावर सोडूनी अफवा स्वार्थासाठी आपुल्या मागवती जोगवा, देवून फतवा करुन देश भगवा.. मार्ग नाही दुसरा, देवू नका थारा… जणू नाशिकात वारा आणि फिरती दारोदारा…धर्मवाद्यांना आता मिटवा रे मिटवा… करुनी वायदा घेवूनी फायदा..दिशाभुल करुनी तुडविला कायदा… म्हणून विद्रोहाची मशाल पेटवा…एकसंघ होऊनी मनुवादी हटवा…मनुवादी हटवा.

5) अफसोस इस बात का नही की धर्म का धंदा हो रहा है। अफसोस इस बात का है। की पढा लिखा आदमी भी अंधा हो रहा है। संगीत सुनकर ज्ञान नही होता. मंदीर जाकर भगवान नही मिलता। पथ्थर तो इसिलीए पुजे है। क्योंकी विश्वास लायक कोई इंन्सान नही मिलता। म्हणून…

6) अंधश्रध्दा थांबवा- अज्ञान, अंधश्रध्दा, भेदा-भेद या तीन व्याधी निपटून काढण्या खेरीज प्रज्ञेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत.

7) बेईमान राजा और सोयी होई प्रजा दोन देश के लिये घातक है।

8) देशात दलित महिला एसस्सी, एसटी, ओबीसीवर वाढते अन्याय थांबवणे आवश्यक आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दिवसा ढवळ्या दलितांची खुणे केली जातात. त्यांची घरे जाळली जातात. महिलांवर दिवसा ढवळ्या बलात्कार केला जातो. उदा.बिल्कीस बानो प्रकरण, भाजप कार्यकर्त्यांनी 28 फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरात दंगलीमध्ये बलात्कार करुन तीच्या कुटूंबीयातील 7 सदस्यांची हत्त्या केली. तरीही भाजपे 15 ऑगस्ट रोजी त्यांची शिक्षा माफ करुन सोडून दिले. अन् त्या लोकांचा भाजपने जाहीर सत्कार केला. त्यावरुन सुप्रिम कोर्टाचे मुख्य न्यायामूर्ती चंद्रचुड साहेबांनी गुजरात कोर्टाचा निर्णय रद्द करुन सुप्रिम कोर्ट म्हणून जसे डॉक्टर रुग्णांना बरे करण्यासाठी कडू जालिम औषध देतील. त्या प्रमाणे गुन्हेगारांना उपचार म्हणून दंड, शिक्षा करण्याचा सिध्दांत आहे. तरीही भाजपचे मंत्री निर्लज्जपणाने वर्तन करायचे थांबवत नाहीत. आरएसएसचे तीन गुंडे मोदी-शाह-भागवत यांनी गुजरात दंगलीत बेसुमार लोकांचे जीव घेतले.

9) दर वर्षी 2 कोटी नोकर्‍या 2014 मध्ये जनतेला आश्वासन देवून बोलवले. दरवर्षी 2 कोटी बेकारांना नोकर्‍या प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये, महागाई कमी करणार, भ्रष्टाचार मुक्तभारत, कालधन परत आणणार, पण कालेधनवाले आकडे मोजता येत नाहीत अशी रक्कम, भाजपवाल्याचीच आहेत. विजय मल्याने देश सोडून जाण्यापूर्वी 35 करोड रुपयांचा चेक बीजेपेच्या नावे ऍक्सीस बँकेत दि.8/11/2016 रोजी सादर केला.

10) सर्व घोटाळेबाज भाजपवालेच. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारमधून 20 कोटीची नवी करंन्सी पकडली गेली.

11) भारतीयांवर कर्जाचा डोंगर, भाजपने एकुण 128 लाख कोटीचा कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. प्रत्येक नागरीकाच्या डोक्यावर 98 हजार 776 रुपयांचा बोजा आहे.

12) नऊ वर्षातील आश्वासनापैकी काय पूर्ण केले? ना शिवस्मारक झाले, ना विश्वगुरु झाले. ना 15 लाख मिळाले. ना काळेधन परत आणले. ना मल्यास फरकटत आणले. ना रोजगार मिळाले. ना गंगा स्वच्छ झाली. ना स्त्रीयावरील अत्याचार थांबले. ना स्मार्ट सिटी झाल्या. ना बुलेट ट्रेन धावली. ना दहशतवाद थांबला ना महागाई स्वस्त झाली. ना पेट्रोल स्वस्त झाले. ना शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला. उलट शेतकरी आंदोलनात 750 शेतकर्‍यांचा बळी घेतला. ना आच्छे दिन आले. ना बाबासाहेबांचे स्मारक झाले. ना भिडेवाडा स्मारक झाले.

13) उलट जनतेला आडचणीत आणले. आधार कार्ड बनवा, बँक खात्याला लिंक करा, मोबाईलला लिंक करा, एलजीपी गॅस क्रमांक आधारला लिंक करा, जुलैच्या अखेर रिटर्न भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटाचा हिशोब द्या, गॅस सबसिडी सरैंडर करा, एटीएममधून जास्त वेळा पैसा काढू नका, नाहीतर दंड भरा, खात्यातील पैसे कोठून आले, त्याचा हिशोब द्या.
14) वायफळ खर्च- गरज नसेल तिथे खर्च केला, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 800 रेल्वे स्टेशनवर वायफाय त्यासाठी गुगलसोबत 4 लाख 50 हजार कोटीचा करार केला. अन शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी 86 हजार कोटी देता आले नाहीत. लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजे वायफाय नाही.

15) राजकारण्यांची मुले नोकरी धंदा न करता कोट्याधीशचे मालक कसे? रावसाहेब दानवेंचा मुलगा 25 कोटीचा मालक, पार्थ पवार 71 कोटी, आदित्य ठाकरे 116 कोटी, रोहित पवार 27 कोटी, अमित शहांचा मुलगा 207 कोटी, सुशील कुमार शिंदेंची मुलगी 93 कोटी, शरद पवारांची मुलगी 105, एकनाथ शिंदेंचा मुलगा 123 कोटी, फडणवीसांची मुलगी 105 कोटी हे पैसे कोठून येतात?

16) नको तिथे खर्च केल्या जातो. सांस्कृतिक कार्यक्रमावर 6 अब्ज 11 कोटी 94 लाख 60 हजार 763 रुपये खर्च केले. त्या ऐवजी शिक्षण, आरोग्य, कुपोषण, कर्जमाफी या समस्यांसाठी खर्च करायला पाहिजेत.

17) पुजार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा- अन सरकारी कर्मचार्‍यांना घरी बसवा हे धोरण चालू आहे. या विषयी सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना का आवाज उठवत नाहीत.

18) पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने संघांच्या शाळांना टाळे ठोकले. असे धाडसी निर्णय इतर मुख्यमंत्र्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

19) मोदी बीजेपीने कमावले 6 हजार 564 कोटी- 2018 ला 210 कोटी, 2019- 1450 कोटी, 2020 ला 2555 कोटी, 2020-21 या साली 1033 कोटी, 2023 ला 1 हजार 294 कोटी ही किती लुट आहे.

20) आब्जाधिश 50 कर्ज बुडव्याचे 68 हजार कोटी केले माफ- माहिती अधिकारात आरबीआयची धक्कादायक माहिती. देशातील 50 अब्जाधिश उद्योगपतींचे 68 हजार 607 कोटीचे कर्ज बँकांनी तांत्रिक दृष्ट्या माफ केल्याची माहिती माहिती अधिकाराच्या अर्जाच्या उत्तरात उघड केले आहे. कर्ज माफ झालेल्या बड्या आणि बुडव्या उद्योगपतीच्या यादीत अनेक बँकांना गंडवून फरार झालेल्या मेऊल चॉक्सी, विजय मल्या, रामदेव बाबा त्यांचे सहकारी बाळकृष्ण निरव मोदी किती सावळा गोंधळ उघड्या डोळ्याने देश पहात आहे.

21) बसन गौडा पाटील, भाजप आमदार यांची मोदींना धमकी जर मला पक्षातून काढले तर मी कोविड काळात 1 राज्याचा 40 हजार करोड घोटाळा झाला. बाकी राज्याचा किती असेल अशी धमकी मोदींना देण्यात आली.

22) चंदीगढ महापौराच्या निवडणूकीत आपचा महापौर निवडून आला तरी त्याला पराजीत घोषीत केले गेले आणि लोकशाहीची हत्त्या केली. शेवटी सर्वोेच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि न्याय दिला. आपचा महापौर केला.

23) ईडीच्या भितीने ब्लॅकमेल करुन भ्रष्टाचार करणार्‍यांना भाजपात घेवून निर्दोष घोषित करुन त्यांना मंत्रीपदे दिली. त्यांचे खटले मागे घेतले. छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा, अजित पवार सिंचन घोटाळा अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, पंकजा मुंडे 206 कोटी चिक्की घोटाळा, 7200 कोटी टीएचआर घोटाळा, देवेंद्र फडणवीस 1700 कोटी सिडको खारघर घोटाळा, मुंबई डी.पी.घोटाळा, मुंबई ई-परिक्षा पोर्टल घोटाळा, प्रकाश मेहता एम.पी.मील कंपाऊंड एफ.एस.आय. घोटाळा-1200 कोटी, सुभाष देशमुख तुर भरडई- 2 हजार कोटी घोटाळा, लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा, जयकुमार रावळ तोरणमाळ हिल रिसॉट घोटाळा 49 कोटी, जय प्रकाश रावळ यांची रावळ बँक 369 कोटी घोटाळा, जयकुमार रावळ गड किल्ले, हॉटेल्स, बार विक्री घोटाळा, विनोद तावडे अग्निशमन यंत्र खरेदी 191 कोटी घोटाळा, विनोद तावडे राष्ट्रपुरुष फोटो व अर्ली रिडर्स बुक खरेदी 114 कोटी घोटाळा, विष्णु सावरा आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा, गिरीष बापट तुरडाळ घोटाळा, अंगणवाडी मोबाईल खरेदी, सॅनेटरी नॅपकीन घोटाळा, बीएमसी रस्ते घोटाळा, नाले सफाई घोटाळा, धर्मराज पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दौंडाईचा भू-संपादन घोटाळा, चंद्रकांत पाटील पुणे जमीन घोटाळा, देवेंद्र फडणवीस-चंद्रकात पाटील 80 कोटी शिवस्मारक घोटाळा, पंकाजताई चेअरमन असलेल्या वैद्यनाथ कारखाना 900 कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण थकीत या लोकांना ईडी लावली जात नाही.

24) मोदी कुटूंबीयांचा प्रगती- सोनाभाई मोदी 75 वर्षे- सेवा निवृत्त आरोग्य अधिकारी सध्या गुजरात रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष, अमितभाई मोदी 72 वर्षे पूर्वी खाजगी कंपनीत होते आज अहमदाबाद गांधीनगर मधील सर्वात मोठे उद्योपगती, प्रल्हाद मोदी 64 वर्षे यांचे रेषण दुकान होते सध्या अहमदाबाद-वडोदरा येथे ह्युंदाई मारोती आणि होंडाचे फोर व्हिरलचे शोरुम मालक, पंकज मोदी 58 वर्षे पुर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी आज रेक्रुट मंडळाचे उपाध्यक्ष, भोगीलाल मोदी 67 वर्षे किराणा दुकान होते आज अहमदाबाद-वडोदरा रिलायन्स मॉलचे मालक, अरविंद मोदी 64 वर्षे भंगार व्यापारी आज मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार, भारत मोदी 55 वर्षे पेट्रोल पंपावर काम करत होते आज अहमदाबादमध्ये अनेक पेट्रोल पंपाचे मालक, अशोक मोदी 51 वर्षे यांचे पतंग आणि किराणा दुकान आज रिलायन्समध्ये भागीदार, चंद्रकांत मोदी 48 वर्षे गोशाळेत कार्यरत आज अहमदाबाद गांधीनगरमध्ये 9 दुध उत्पादन केंद्राचे मालक, रमेश मोदी 57 वर्षे शिक्षक आज त्यांच्याकडे 5 शाळा, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमीओपॅथी फिजीओ थेरपी, आणि वैद्यकीय महाविद्यालय असा कारभार आहे. शिकवणी केंद्रात कार्यरत अलेले मार्गव मोदी वर्ष 44 रमेश मोदी यांच्या संस्थेत भागीदार, बीपीन मोदी 42 लायब्रीमन आज पुस्तक पुरवठा करणार्‍या कंपनीचे मालक.

25) युपीचे सीएम आदित्यनाथ योगी राष्ट्रीय संत मुख्यमंत्री यांच्या विरोधातील गुन्हे 147,148,295, 297,153,307,506,302, 427,504, 149, 307, 336, 427, 147, 148, 133, 285, 297, 295, 297, 506 यांनी सर्व गुन्हे माफ करुन घेतले.

26) ईव्हीएमद्वारे निवडणूक निकाल बदलणे शक्य- तरी ईव्हीएम बनवणार्‍या कंपन्यांच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते देशातील अनेक निवडणूकीत ईव्हीएमद्वारे निवडणूकीत फेरफार करता येतो. त्यावर देशात जनतेने प्रखर आंदोलने केली. प्रयोगाद्वारे सिध्द करुन दाखवणे, ईव्हीएम ओटींग मशीनचे उत्पादन आणि वितरण भारत इलेक्ट्रॉनिक्स ही सरकारी कंपनी करते, ही कंपनी ईव्हीएम मशीनमध्ये असणार्‍या चिफ मध्ये लागणारा गुप्त कोडही तयार करते. तरी या कंपनीच्या संचालक मंडळावर भाजपाच्या चार नेत्यांची नेमणूक केली जाते आणि त्यावर देश शांतपणे पहातो आणि निवडणूक आयोग देखील मुग गिळून गप्प राहतो.
26) देशाला संपविणार्‍या शक्ती आपल्या बोकांडीवर बसते तरी देशातील विरोधी पक्ष आणि विरोधी राज्यात सत्ता असलेले नेतेही गप्प आहेत. जर हे थांबावचे असेल तर आपापसातील भेद, अहमपणा स्वार्थ बाजुला ठेवून सर्व जनतेने देशाच्या बोकांडीवर बसलेले आरएसएस भाजपचे भूत उतरवणे गरजेचे आहे.

27) धर्माचा अतिरेक केला तर केवळ विनाशच होणार नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे. अशी भिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या पूर्ण कामकाजाच्या दरम्यान युक्तीवाद केला. यातील दोन भाषणे प्रमुख आहेत.
जवाहरलाल नेहरु यांचे 13 डिसेंबर 1946 रोजीचे भाषण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजीचे भाषण लक्ष्यात घ्या. संविधानाची उद्देशिका सादर करतांना नेहरुंनी भारताची दिशा काय असावी हे स्पष्ट केले. तर बाबासाहेबांनी या दिशेने जातांनाचे धोके शेवटच्या भाषणात सांगितले. हे भाषण स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील सावधानतेचा इशारा देणारे आहे. ते चार मुद्दे पुढील प्रमाणे-
1) संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवले कसे जाते हे त्यातून अधिक महत्वाचे आहे.
2) जात किंवा धर्माला राष्ट्रावरुन अधिक महत्व देणे घातक ठरेल.
3) विभूती पूजा हा हुकूमशाहीकडे नेणारा रस्ता आहे. आयरिश देशभक्त डॅनियल ओकावेल यांचा दाखला देत बाबासाहेब म्हणतात- आपल्या प्रतिष्ठेचा बळी देऊन कोणाला व्यक्तीला सर्वस्व वाहून देण्याची आवश्यकता नाही. त्या प्रमाणे देशाचे स्वातंत्र्य गहान ठेवून आपला विवेक एका व्यक्तीच्या चरणी अर्पण करता कामा नये.

4) सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे खडतर आवाहन भारतासमोर आहे. जिथे लोकशाही असेल मात्र सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल आणि सर्वांना समान प्रतिष्ठा नाही, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे तेंव्हा लोकशाही सर्व अंगाने सजवण्याचे आवाहन देशासमोर आहे. संविधान स्विकारण्याच्या पूर्व संध्येला बाबासाहेबांनी दिलेला सावधानतेचा इशारा समजून घेवून प्रत्येकाने कृती केली तर होऊ घातलेला अनर्थ टळू शकतो आणि संविधानाच्या प्रकाशाने प्रत्येकाचा विकास होऊ शकतो.

28) वंचितला मत देण्याचे फायदे 2019 मध्ये तिसरी आघाडी होती म्हणून 9.5 टक्के म्हणजेच 45 लाख मते पडली. तरी राज्यपक्ष म्हणून मान्यता मिळाली नाही. परंतु या वेळेस स्वबळावर निवडणूकीस उभे आहोत. या वेळेस जास्त मते मिळाली तर आपण राजकीय पक्ष बनू शकतो. राज्य पक्ष बनण्यासाठी किमान 6 टक्केच्यावर मते असावी लागतात. स्वत:चे पक्ष चिन्ह मिळते. निवडणूक आयोगात आपले प्रतिनिधी पाठवू शकतो. आंबेडकरी विचाराचे पक्ष म्हणून स्वत:ची लोकशाही सैवंधानिक विचारधारा प्रस्थापित करता येते. ग्रामपंचायत ते राज्यापर्यंत पक्ष वाढविण्यासाठी मदत होते. इतर समाजाचे प्रतिनिधी आमदार, खासदार निवडून आणण्यास मदत होते. संविधान प्रखरतेने आमलात आणता येते. आंबेडकरी विचारानुसार देशाची आर्थ व्यवस्था सुधारता येते आणि त्या-त्या मागासलेल्यांचा विकास फंड त्यांना देण्यास मदत होते. आंबेडकरी विचारानुसार गरीबी निर्मुलन, स्त्री सन्मान व अधिकार, युवा बेरोजगार व जेष्ठ नागरीक योजना राबवता येतात. शिक्षण, आरोग्य जन-जीवनाचा समतोल ठेवता येतो.

29) नांदेड-परभणीत प्रचार सभेत मोदी म्हणतात काँग्रेस पक्ष गरीब, वंचित, दलित आणि शेतकर्‍यांच्या विकासात अडथळा बनला. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास रोखण्याचे काम काँग्रेसने केले. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे आठवण व कौतुक केले. या उलट काँग्रेसच्या काळात गरीब, वंचित, दलित शेतकरी दोन घास सुखाने व आनंदात खात होते. मोदींनी ते सुध्दा बंद केले. नुसतीच भंपकबाजी आणि मोदी की गॅरंटी एवढेच ते काय मिळते. अन् शंकरराव चव्हाणांच्या काळात मोदी कोठे होते? हे कोण सांगेल का? किती रेटून खोटे बोलायचे याची सीमा असली पाहिजे. आता आपला अंत:काळ जवळ आला आहे. सत्तेचे स्वप्न पहाणे थांबवा. होते ते सुध्दा कारखाने बंद करुन लाखो कर्मचारी भिकाला लावलेत 2025 पर्यंत देश टीबी मुक्त करायचा होता. छत्तीसगढमध्ये औषधाचा तुटवडा असून आणखी कोणते विकास चालू आहेत. बीजेपी आणि मोदीच्या खोट्या आश्वासनामुळे 17 लाख कुटूंबीय देश सोडून गेले. ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत कवटे महाकाळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त नागरीकांनी नदीत तातडीने पाणी सोडा नसता आम्हाला कर्नाटक राज्यात जाण्यास परवानगी द्या अशी मागणी केली. असा कसा विकास पाहिजे. मोदींची पत्नी म्हणते ‘सात फेरो की गॅरंटी तो मुझे भी दिये थी। पर गॅरंटी पुरी हुई क्या’ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे दरवाजे मोदी सरकारने बंद केले. मुंबई टाटा इन्स्टिट्युट सोशल सायन्सेस येथे बोलतांना चालु शैक्षणिक वर्षापासून आपल्या संस्थेत उच्च शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, भोजन व निवासाचा खर्च वसुल करण्याचा निर्णय घेतला.

30) वंचित पक्षाला आलेल्या संधीचे सोने करा- प्रचार करणार्‍यांना सूचना बौध्द वस्तीपेक्षा इतर समाजातील लोकवस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करा. लोकसभेच्या 2024 मधील निवडणूकीत मतदान करणार्‍यांना सर्व स्त्री-पुरुष आणि तरुणांना विनंती आहे की, मतदान करतांना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहोत ते बटन तीन सेंकदामध्ये दाबायचे. केलेले मतदान त्या पक्षाची चिठ्ठी आपल्या व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे. ती चिठ्ठी आपोआप कट होवून खाली पडणार आहे. चिठ्ठी खाली पडे पर्यंत आपण तेथून हाटायचे नाही. चिठ्ठी खाली पडल्या बरोबर आपल्याकडे घेवून निवडणूक निकालापर्यंत ती चिठ्ठी सांभाळून ठेवणे जर चिठ्ठी खाली पडली नाही तर आपण ऑब्जेक्शन घ्यायचे. आपण ज्यांना मतदान केले. त्याच पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह आपल्या व्हिव्हीपॅटमध्ये दिसते का? आणि ती व्हीव्हीपॅटची टीप (पावती) तुटून कापून खाली पडली आहे की नाही? हे प्रचार करणार्‍या प्रचारकाने प्रचार करतेवेळी मतदारांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. ही काळजी प्रचारकाने आणि मतदान करणार्‍याने घेणे अत्यंत आवश्यक आहे. 19 एप्रिल रोजी ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदान पेट्यातून मत पत्रिका चोरण्याचे (काढून घेण्याचे) व्हीडीओ व्हायरल झाले आहेत.

31) देशातील कायरे ग्रामपंचायत तालुका पेठ जि.नाशिक यांनी देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतांना या पुढे ईव्हीएम यंत्राचा वापर न करता बॅलेट पेपरवरच या पुढील निवडणूका घेण्याचा ठराव पास करुन आयोगाला पाठवला. परंतू आयोगाला त्या ठरावाची किंमत कळाली नाही.

32) अमेरिकेने हॅक केले भारताचे ईव्हीएम मशिन- निवडणूक निकाल बदलता येतो असा मिशीगनच्या शास्त्रज्ञाचा दावा. नवी दिल्ली – ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करता येत नाही असा दावा करणार्‍या निवडणूक आयोगाला या प्रकरणी सनसणीत चपराक बसली. अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भारतातील ईव्हीएम हॅक करुन दाखवले आणि आता तर मायक्रो प्रोसेसने निवडणूक निकालही बदलता येतो हे सिध्द केले आहे. तरीही निवडणूक आयोगाचा ईव्हीएमद्वारेच निवडणूक घेण्याचा हट्ट का धरावा. आणि देशातील जनतेने कशासाठी ईव्हीएम निवडणूका स्विकाराव्यात, केवळ भाजप सत्तेत रहावे म्हणूनच का?

33) देशातील पहिल्या टर्म मधील लोकसभेच्या निवडणूका 19 एप्रिल 2024 ला घेण्यात आलेल्या आहेत. परंतू या पुढील टप्प्यातील निवडणूका या बॅलेट पेपरनुसारच घेण्यात येवून फरकाचा अनुभव घ्यायला पाहिजे.

34) आरएसएस प्रमुख मोहन भागवत एका ठिकाणी खुर्चीवर बसलेले असून एका बाजुला अमित शहा आणि दुसर्‍या बाजुला राजस्थानचे जगन्नाथ उभे आहेत. किती भयानक चित्र आहे भारतीय लोकशाहीचे.

35) काळ्या पैशाच्या यादीमध्ये मोहन भागवत 56,800,000,000,000/-, य.दु.युरप्पा 780,000,000,000/-, मुकेश अंबानी 15,800,000,000,000/-, अमित शहा 8,200,000,000,000/- अशा 24 नेत्यांच्या अनलिमीट काळ्या धनाची यादी आहे. हे काळे धन आतापर्यंत का आणले गेले नाहीत.

36) यु.पी.एस.सी.ला डावलून असशिक्षीत भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्त्या. भाजप केंद्र शासनाने कायद्याला बगल देवून मागील दोन वर्षात अनेक विभागाचे उप सचिव, सचिव, संचालक अशा महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर असशिक्षीत खाजगी क्षेत्रातील भाजपाच्या लोकांची निवड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तीन टप्प्यात राबवला. अशा नियुक्त्या मे 2023 मध्ये 80 पदावर सचिव आणि समकक्ष पदावर खाजगी क्षेत्रातील व्यक्तींची अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. युपीएससी सारख्या एका आवघड आणि दर्जेदार परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेेवेत अधिकारीपदी रुजू होतात. प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवा केल्यानंतर सचिव आणि समकक्ष जी पदे आहेत अशा महत्वाच्या पदावर प्रशासकीय अधिकार्‍यांना बढती मिळते व त्यांची नियुक्ती केली जाते. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रातून कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला एवढी महत्वाची जबाबदारी सोपवून आपल्या (आरएसएस-भाजप) मर्जीतील व्यक्तीला या ठिकाणी उच्च पदावर बसवण्यामागे शासनाचा हेतू काय? आणि कायद्याच्या बाहेर असे निर्णय घेता येतात का? याचाही विचार भारतीय सुज्ञ नागरीकांनी करणे गरजेचे असून अशा कायद्याला संविधानाला न माणणार्‍यांना पुन्हा मतदान करणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘ज्ञान-विज्ञान-इमान दिया है मैने पथ्थर छोडके इंन्सान दिया है मैने। मैने गरीबोमें तरक्की के वास्ते दीक्षा भूमीसे भारत का संविधान दिया है मैने’ त्या संविधानाचे रक्षण करण्याकरीताच वंचितला मतदान करा. एवढ्या मोठ्या परिकष्टाने तयार केलेली ही पवित्र राज्य घटना चालवणारे जर नालायक निघाले तर ही राज्यघटना कुचकामी होईल असा इशारा 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना बहाल करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिलेला आहे.
जिल्हा चलाने के लिये आयएएस की तयारी करणी पडती है। और देश चलाने के लिये अनपढोंको चुन लेते हो तो कहाँसे होगा देश का विकास, गॅरंटी फ्री में राशन दे सकते हो तो शिक्षा क्यों नही दे सकते हो। मैने आप सब को, संघटीत होने के लिये कहाँ था, संगठन बना के लिये नही कहाँ था. आप लोग जितने ज्यादा संगठन बनाओगे उतनेही ज्यादा कमजोर होते जाओंगे इसिलेये विचारधारा के साथ इकठ्ठा होने का प्रयास करो, राज उनका ही होगा जिनका समाज संगठीत होगा। और ओ टाईम आपको आज आ गया है। इसिलेये आदरणीय अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर उनके नेतृत्व में सबने संगठीत होना चाहिये।
37) पंकजाताई आपण इतके दिवस कधीच जमीनीवर पाय ठेवला नाही, हावेतच फिरत होता आणि आता म्हणता मी विकास करुन दाखवते. आलेल्यांची जात न विचारता कामे केली जातात. सदरील कामाची आणि नावाची यादी एक वेळा जाहीर करुन दाखवा. तुम्ही तर संविधाना मार्फत मिळणार्‍या सर्व सवलती लाटल्या आणि आता म्हणता डॉ.बाबासाहेबांचे संविधान बदलण्यासाठी मला संसदेत पाठवा, तुम्हाला कोन मतदान करणार आहे. शिवाय मोदींना तिसर्‍यांदा पीएम करायचे. मोदींनी तर संपूर्ण देशातील जनतेच्या विरोधात निर्णय घेतले आणि आता मोदींना कोण पंतप्रधान करणार?

38) सर्वच क्षेत्रातील अधिकारी, सत्ताधारी यांचा मोठ्या प्रमाणातील होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतील लोकांना लोकसभा, विधानसभासह सर्वच निवडणूकीत मतदान करा आणि आपला स्वाभिमान आपले हित साध्य करा. मोदी सरकार मार्फत झोपडपट्टीतील रहिवाशांच्या घरावर बुलडोजर फिरवणार्‍या आरएसएस भाजपाला गाडून टाका हीच मतदारांना महत्वाची आणि शेवटची संधी आहे. संविधान वाचवणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे तसेच विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव करणे हाच वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे. करीता सर्व समविचारी पक्षाने भाजप विरोधात एकजुटीने लढले पाहिजे.
‘अगर देश की तरक्की चहाते हो तो चौकीदार को गेटपर भेज दो। साधु-साधवी को जंगल में और भक्तों को पागलखाने में और पढे लिखे संसद में भेज दो। तभी देश तरक्की करेगा।’

39) सर्वच प्रस्थापीत पक्षांना बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या ताकतीची भिती असल्याने सर्वांनी युती करण्याचे टाळले. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा खच्चीकरण करण्याचा चंग बांधलेला आहे. खरतर शरद पवारांनी संपूर्ण आंबेडकरी चळवळीला नेस्तानाबुत करण्याचे काम केले. देशाला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार, सुप्रीया सुळे, पार्थ पवार, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण ही प्रस्थापितांची पिढी चालते ज्यांनी या देशासाठी आणि जनतेसाठी काहीही केलेले नाही त्यांचा उदो-उदो करण्यात आयुष्य घालवणार्‍यांना आता अ‍ॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत संधी मिळालेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला. शिक्षण, नोकर्‍या आरक्षण दिले. यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांनी मार्ग दाखवला आणि आज 45 वर्षापासून आदरणी अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर एससी,एसटी,ओबीसी अल्पसंख्यांकांच्या उध्दारासाठी लढत आहेत. अकोला पॅटर्न निर्माण करुन ज्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल की मी सरपंच, पंचायत समिती सभापती, जि.प. अध्यक्ष, महानगर पालिका मेअर, आमदार, खासदार मंत्री होईल अशा लोकांना सत्तेत बसवले. आणि आमचे एससी,एसटी,ओबीसी अल्पसंख्यांकवाले नेते प्रस्तापितांचे जोडे उचलण्याचे बॅनर लावून उदो-उदो करण्यातच त्यांच्या कित्तेक पिढ्या बरबाद होऊ लागल्या आहेत. आजच्या 2024 च्या लोकसभेत तरी दाखवावा एखादा एससी,एसटी,ओबीसी अल्पसंख्यांक मुस्लिम उमेदवार प्रस्तापितांच्या यादीत आहे का? मग आम्ही अल्पसंख्यांकानी प्रस्तापितांचा उदो-उदो करणे बंद करावे. या पुढील जीवन स्वाभिमानाने जगावयाचे असेल तर संविधान संरक्षण आणि हक्काचे आरक्षण सत्ता हवी हक्काची भिक नको सत्तेची’ या बॅनरखाली एकत्र येवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि सत्ता आपल्या हातात घ्या. आणि आपला आवाज उठवणार्‍यांनाच सत्तेत संधी द्या. आजचे चित्र बदलण्यासाठी आलेला मोका आणि सत्ताधारी होण्याचा पर्याय आपण सोडता कामा नये.

40) राज्यातील 15 मतदार संघ असे आहे की, केवळ बौध्दांच्या मतामध्ये तेथील खासदार निवडून येवू शकतात. 1) नागपूर 35 लाखा पैकी 12 लाख, अमरावती 20 लाखापैकी 8 लाख, वर्धा 15 लाखा पैकी 5.5 लाख, अकोला 20 लाखा पैकी 8 लाख, सोलापूर 19 लाखापैकी 8 लाख, औरंगाबाद 20 लाखा पैकी 6 लाख, अहमदनगर 22 लाखा पैकी 7 लाख, नाशिक 35 लाखा पैकी 9 लाख, सातारा 22 लाखापैकी 8 लाख, वाशिम 15 लाखा पैकी 8 लाख, बुलडाणा 15 लाखा पैकी 7 लाख, चेंबुर 5 लाख, डोंबीवली-कल्याण 20 लाखा पैकी 7 लाख बौध्द मते आहेत. यामध्ये एससी,एसटी,ओबीसी अल्पसंख्यांक मुस्लिमांची मते मिळाली तर 14 खासदार स्वबळावर निवडून येऊ शकतात, आणि बाकीचे उमेदवार इतरांच्या मदतीने निवडून येऊ शकतात.
शेतकर्‍यांने जसे शेतातील माजलेले गवत काढून बांधावर फेकण्याची ताकद आपल्या आहे. तसेच इथल्या व्यवस्थेतले भ्रष्टाचारी आणि माजलेले लोक सुध्दा बाजुल काढून टाकण्याची ताकद सुध्दा आपल्यातच आहे. आता मटनावर ध्यान न देता वंचितच्या उमेदवाराच्या चिन्हा समोरील बटनावर ध्यान द्या आणि त्यांनाच मतदान करा हीच नम्र विनंती.

आपला विश्वासू

व्ही.एन. निसर्गन
माजी राष्ट्रीय संघटक, भारतीय बौध्द महासभा
मो. 9890907014

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!