दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

चैत्र पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा..

चैत्र पौर्णिमेला पाली भाषेत चित्तमासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनात या पौर्णिमेला काही घटना घडल्यात. जसे…_

१. सुजाताचे खिरदान
२. भृगु ऋषीच्या आश्रमात अभ्यास
३. रामपुत्र ऋषीच्या आश्रमात अभ्यास
४. कपिलमुनींकडे संख्यदर्शनाचा अभ्यास.
५. धनगराकडून दान

•१. सुजाताचे खिरदान
सुजाताच्या गावी अशी धारणा होती की जो कोणी वटवृक्षाजवळ अंतःकरणातुन आपली मनोकामना व्यक्त करेल त्याची मनोकामना पूर्ण होणार. सुजाताला मुलबाळ नसल्याने तिने या वटवृक्षाजवळ आपली मनोकामना व्यक्त केली की मला पुत्ररत्न प्राप्त झाल्यास दरवर्षी निर्जल दुधाच्या मधुपायासाचा (खीर) नैवेद्य चढवून तुझी पूजा करेल. योगायोगाने तिची मनोकामना पूर्ण झाली. ती चैत्र पौर्णिमेला खीर घेऊन दासींसोबत वटवृक्षाजवळ आली आणि साक्षात वटवृक्ष मानवी रूप धारण करून बसलेला आहे असे समजून तिने नैवैद्याची खीर अर्पण केली व विनंती केली की आपला हा प्रसाद स्वीकारण्यास दरवर्षी येथें यावे. तथागतांनी हे ऐकून तिला उत्तर दिले हे कन्ये! मी कोणी वृक्षदेवता नाहीं तर मी तुझ्यासारखाच मानव आहे. दुःखाच्या कारणांचा शोध करून दुःख मुक्ती व शांतीचा मार्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. या नंतर सुजाताने दिलेली खीर तथागताने स्वीकारली आणि एकूण एकोणपन्नास घासात ती ग्रहण केली. यावर प्रसन्न होऊन सुजाताने तथागतास नमन केले आणि विनंती केली हे पूज्य श्रमण! दुखमुक्तीचा साक्षात्कार झाल्यास मला येथे येऊन भेटणार. असे अभिवचन कृपाकरून द्यावे तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा इ.स.पू. ५३८. नंतर तथागताने प्रसन्न मनाने बुद्धगया येथे बोधिवृक्षाखाली सतत चार आठवडे ध्यानसाधना केली तेव्हा त्यास ज्ञान प्राप्ती झाली. सुजाताची खीर गौतमाच्या जीवनाला वेगळेच वळण देऊन गेली.

•२.भृगु ऋषीच्या आश्रमात अभ्यास
भृगु ऋषीच्या आश्रमात तपश्चर्येचे अनेक निरनिराळे प्रकार गौतमाने प्रथमच बघितले होतें. येथे काही लोक पाण्यात राहून तपश्चर्या करीत असत. या प्रमाणे कष्ट सहन करून स्वर्गलाभ होतो आणि कष्ट सहन केल्यानेच, देहदंडाने पुण्यलाभ होतो अशी त्यांची धारणा होती. सिद्धार्थाने सुद्धा अशी तपश्चर्या करून दुःख निवारण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. दुःखमार्ग अनुसरल्याने सुखप्राप्ती होते किंवा दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे तत्व सिद्धार्थाला पटले नाही. भृगु ऋषीचे आभार मानून अलारकालामच्या आश्रमात जाण्यास निघाले तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता.

•३. रामपुत्र ऋषीच्या आश्रमात अभ्यास
सिद्धार्थाने अलारकालामच्या आश्रमात सात सिद्धी शिकून घेतल्या होत्या. त्यापुढची सिद्धी शिकण्यास उद्दक रामपुत्र यांच्या आश्रमात आले. रामपुत्रा कडेही सिद्धार्थाला पाहिजे तो अभ्यास नसल्याने मगध देशातही असे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीने शिक्षण मिळावे असा गौतमाने विचार केला, व उद्दक रामपुत्रा चा निरोप घेतला तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा.

•४.कपिलमुनींकडे संख्यदर्शनाचा अभ्यास.
सिद्धार्थाने मगध देशात श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याची कष्टदायी साधना आत्मसात केली. त्यानंतर कपिलमुनीच्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यात सिद्धार्थाने तीन गोष्टी ग्रहण केल्या..
अ. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाला आधार असला पाहिजे.
ब. ईश्वराच्या आस्तित्वास तर्कावर आधारित असे कोणतेच कारण विद्यमान नाही.
क. जगात दुःख आहे.
सिद्धार्थाने सांख्य आणि समाधी मार्ग याची कसोटी घेतली होती मात्र भृगु ऋषीच्या आश्रम वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय सोडला होता. म्हणून उरुवेल येथे गयेचे राजश्री नेगरी याच्या आश्रमात त्यांना वैराग्य मार्गाचा अभ्यास करावा लागला तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता.

•५. धनगराकडून दान
उर्वेला नगरातील एक धनगराने तथागतास बरेचसे दान दिले तो दिवस होता चैत्र पौर्णिमा.

???? नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य। ????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!