लोकशाहीचा आधारस्तंभ “लोकनिष्ठा”!

भारताचे संविधान आणि भारतीय लोकशाहीचा आत्मा ‘ समता, स्वातंत्र्य व बंधुत्व असून, बंधुत्व ही संकल्पना भगवान बुद्धाने सांगितलेल्या ‘ब्रह्मविहार ‘या विश्वमैत्रीच्या संकल्पनेचा एक पैलू आहे. बुद्धाचा धर्म/धम्म शांती,अहिंसा बरोबर च समता, स्वातंत्र्य व बंधुत्व ही शिकवितो हे बहुतांश लोकांना माहित नाही. नव्हे, तो बुद्ध तत्वज्ञानाचा गाभा आहे. पण असे तत्वज्ञान तेव्हाच जीवंत राहते जेव्हा न्यायाची सोबत पार्श्वभूमी असते.बुद्ध तत्वज्ञान बारकाईने अभ्यासले, तर अन्यायमुक्त जीवन पद्धतीस धर्म असे म्हणतात. मानवी मनात “मार”नावाच्या तृष्णा(स्वभाव) असतात.त्या स्वतःवर च अन्याय करीत असतात, तो अन्याय दूर करण्याची मननिष्ठा,जो पर्यंत तृष्णेला, माराला समुळ नष्ट करीत नाही,तो पर्यंत मनात धर्म उत्पन्न होत नाही. अर्थात,जो पर्यंत मनुष्याच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद,क्षमता निर्माण होत नाही, तो पर्यंत मनात धर्म जीवंत होत नाही आणि मनात मैत्रिभाव तेव्हाच जीवंत होतो जेव्हा अन्यायमुक्त मनुष्य होतो. बुद्ध तत्वज्ञानाचा एकंदरीत पाया हा, हा मैत्रिभावावर अर्थात अन्यायाविरुद्ध लढणार्यावर, अन्यायमुक्त जीवन पद्धतीवर अवलंबून आहे.,जीवंत आहे.ज्या दिवसापर्यंत, भारतीय मनामनात अन्यायाविरुद्ध, मारस्वभावाविरुद्ध लढणारी बंधुत्वाची भावना दृढनिश्चयी आहे, तो पर्यंत आपली लोकशाही,सुरक्षित आहे,जीवंत आहे असे समजावे.
मात्र;डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952च्या एका भाषणात, भारतीय संविधान आणि लोकशाही बाबत सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे, तो अभ्यासनीय आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,भारतीयाने आपल्या भवितव्याबाबत आपण फारच सावध आणि फारच समजुतदाराने (प्रज्ञाने) राहिले पाहिजे.ते पुढे म्हणतात, आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे व शिला दूर करण्याच्या कामी,आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहो किंवा नाही,याचा आपण भारतीयाने गंभीरपणे विचार करावा लागेल. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली पण आपण आजुनही लोकशाही बाबत विशेष गंभीर नाही.ही वेगळी गोष्ट. त्यामुळेच आज 2024मध्ये जी भारतापुढे, भारतीय लोकशाहीपुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.त्याचे मुख्य कारण भगवान बुद्ध, महात्मा फुले,शाहू महाराज, शिवाजी राजे भोसले, संत तुकाराम, संत कबीर, संत गाडगेबाबा, गो.ग.आगरकर, प्रबोधनकार ठाकरे व तत्सम समाज सुधारक, सामाजिक परिवर्तनवादी तद्वतच भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे महान विचार,भारतीयाने नीट न वाचल्या कारणांस्तव स्वातंत्र्याच्या सुवर्ण वर्षात सुद्धा सामाजिक जागृती पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याकारणास्तव आणि भारतीय मने विशेषतः बहुसंख्य धर्म वेडे भारतीय मने दैववादावर,अंधश्रद्धेतून सजक परंतु भारतीय संविधान आणि लोकशाही प्रती गाफील असल्या कारणास्त, भारतीय संविधान आणि लोकशाहीला धोका संभव आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या त्याच अभ्यासनीय भाषणात लोकशाहीला धोका पोहचलेल्या देशाची उदाहरणे दिलेली आहे.1) सिरीयामध्ये लोकशाही शासन होते. फारच थोड्या वर्षात तेथे लष्कराची क्रांति झाली. सिरियाचा प्रमुख कमांडर तेथील राजा झाला आणि लोकशाही लोप पावली. 2)इजिप्त मध्ये सुद्धा 1922पासून सतत 30वर्ष लोकशाही शासन व्यवस्था होती, परंतु, एकाच रात्रीत फरूकला राज्यसत्ता सोडावी लागली व नजीब इजिप्तचा हुमुशहा झाला.त्याने लगेच तेथील संविधान नष्ट केले.आज3)रशियामध्येही हुकुमशाहाचा जन्म होऊन युक्रेनला चूर करायला निघाला.4)उत्तर कोरीयाचा राजा,हुकुमशहा आज अन्याय करायला जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच भारतीयाने भारतात पुन्हा हुकुमशहा जन्मणार नाही,यासाठी सावध भूमीका घेतली पाहिजे.मतदान करतांना प्रज्ञा जागृत ठेवून च मतदान करायला, पाहिजे व भारतीय संविधानाने दिलेला हक्क बजावला पाहिजे.थोडक्यात; डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “लोकशाहीला, “लोकनिष्ठेची” जी आवश्यकता आहे, ती निष्ठा कमीत कमी राष्ट्रासाठी तरी जपली पाहिजे.तरच, लोकशाही अनंत काळासाठी जीवंत राहू शकते.
अन्याय, अत्याचार, प्राणी समान वर्तने,ही मानवी अधर्म मानवी स्वाभाविकतः होय आणि याच कारणांस्तव मानवास धर्मसापेक्ष लोकशाही प्रजासत्ताकीय संविधानाची आवश्यकता आहे.अर्थात सुसांस्कृतिक वर्तनीय दर्शनाची आवश्यकता आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते,”सर्वच देशामध्ये अन्याय असतो या बद्दल शंका नाही.परंतु,त्याची तीव्रता सर्व ठिकाणी सारखीच नसते.काही देशात अन्यायाची तीव्रता फारच कमी असते आणि दुसर्या काही ठीकाणी लोक अक्षरशः अन्यायाच्या ओझ्याखाली चिरडले आहेत.जसे की,इंग्लंड मधील ज्यू, ज्यांना ख्रिश्चनांनी अक्षरशः चिरडून टाकलेले आहे व त्यांना ख्रिश्चनांपासून सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागला.त्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी केवळ ज्यू लोकांनाच संघर्ष करावा लागला. कोणत्याही ज्यूना मदत केली नाही.अशा परिस्थितीत ज्यूनी त्यांचा संघर्ष चालू ठेवला. अशा संघर्षमय निष्ठलाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर “लोकनिष्ठा” असे म्हणतात.
” लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायाच्या विरोधात आंदोलनासाठी उभी राहणारी कर्तव्यनिष्ठा होय!”कोणावर अन्याय होतोय ही गोष्ट गौण आहे (सर्वसाधारणतः जो अन्याय सहन करतो, त्याचेवरच अन्याय होत राहतो) परंतु, प्रत्येकाने, मग तो त्या विशिष्ट अन्यायाखाली भरडलेला असो अगर नसो. अन्यायाखाली भरडल्या जाणार्या माणसाच्या मुक्तीसाठी मदत करण्याची तयारी ठेवली पाहिजे.[अन्याय करण्यार्याची प्रवृती वाढत जाऊन, उद्या तुमचाही नंबर लागू शकतो, म म्हणूनच निस्वार्थ मदतकरणे उत्तमकार्यहोय.] अशा मदतगाराला, निस्वार्थ भावाने लढणार्यांलाच *लोकनिष्ठावान* असे म्हणतात.
भारतात जर कशाची, कमतरता असेल?,तर धर्म(यक्चुयल अधर्म)निष्ठावांच्या रांगा आहेत पण लोकनिष्ठावनाच्या कमतरतेमुळेच भारतीय संविधान आणि लोकशाहीला भविष्यात धोका संभव आहे.
साऊथ आफ्रिकेत महात्मा गांधी गेले होते. त्यांनी प्रत्येकक्षात तेथील अन्याय प्रवृत्तीचा अनुभव घेतला होता. पण,महात्मा गांधी त्या अन्यायाविरुद्ध लढणात रमले नाही.सांगायचे तात्पर्य,तेथे अन्यायाबाबत भरडली जाणारी जनता अर्थात, भारतीय होती.तेथील गोर्या लोकांवर अन्याय होत नसतांना, एक गोरा माणूस म्हणजे, रेव्हरंड स्काॅड यांने अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.गोर्या वंशातील मुले मुली साऊथ आफ्रिकेत भारतीय लोकांच्या मुक्तीसाठी आंदोलनात सहभागी होत होती.आपल्यावर, आपल्या वंशपरंपरेवर कोणताही प्रकार चा अन्याय, अत्याचार होत नसतांना सुद्धा, दुसर्यांना अन्यायमुक्त करण्यासाठी स्वतःला झोकून देणे, आंदोलनात सहभागी होण्याच्या मानवीय प्रवृत्तीलाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, ” लोकनिष्ठा” असे म्हणतात. ते पुढे म्हणतात की, आपल्या भारतीय खेड्यात साऊथ आफ्रीका आहे.असे असून देखील, एखादा सवर्ण जातीतील माणूस वर्गिकृत वर्गाची [sc,st,obc,अस्पृश्य शुद्र वर्ग] वर्गाची समस्या घेऊन लढतांना क्वचित च दिसतो.(नाहीच्या बरोबरीने _महात्मा गांधीने सुद्धा सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यास काढता पाय घेऊन, राजकीय अन्यायाविरुद्ध लढावर भर दिलेला इतिहास सांगतो. ] भारतात असे कां घडते? कारण भारत भूमीत लोकनिष्ठेची कमतरता आहे.अन्याय, अत्याचार, बलात्कार होतांना येथील, भारतीय, विषेतः मनुवादी मानसिकतेचा मनुष्य उघड्या डोळ्यांनी अन्याय, अत्याचार होतांना पाहतील, नव्हे,अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्याऐवजी त्यास प्रोत्साहन देतील. परंतु,अन्यायाखाली चिरडल्या जाणार्या अल्पसंख्याकांना, अन्यायग्रस्ताला मदत करणार नाही. किंवा त्याचे निवारण करण्यासाठी किंवा त्याच्या हेतूकरिता सुद्धा, इतरांपासून मदत मिळणे दुरापास्त होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणार्यांना इतरांपासून मदत मिळणार नसेल,तर अन्याय करणार्याची प्रवृत्ती बळकावेल कि ज्याचा परिपाक, स्पष्ट आहे की,लोकशाही धोक्यात आणणारी बंडाची मनोवृत्ती बळावेल व लोकशाही संपायला वेळ लागणार नाही.
भारतात अलिकडे संविधान बदण्याची भाषा बोलली जाते.तीच लोकशाही धोक्यात आणू पहाणारी बंडाची मनोवृत्ती होय. अशा प्रवृत्तीचा बिमोड,म्हणजेच अन्याय अत्याचारास सहकार्य करणार्या प्रवृत्तीचा बिमोड करणे राष्ट्रीय काळाची गरज होय. त्या गरजेपूर्तीसाठी भारतात घरोघरी लोकनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा,राष्ट्रनिष्ठा बाळगणारे निर्माण होणे आवश्यक आहे.परंतु जर असे लोकनिष्ठावानांची भारतात कमतरता निर्माण झाली तर
मात्र भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून च प्रज्ञा जागृत ठेवून शीलगुण संपन्नांनाच संसदेत पाठविण्यात,भारतीय धैर्यशीलता होय.
लोकशाहीत कोणत्याही भेद भावा शिवाय सर्वांनाच स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा उपभोग घेता येतो.आणि उशीरा कां होईना,?न्याय तुमच्या पर्यंत पोहचतोच. परंतु,भारतीयांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,एकदाची लोकशाही संपली तर मात्र, भावी हुकुमशाहा व त्याचे मोजके चले चपाटे (चमचे) ह्यांना वगळून,कधी कधी चमच्यांना सुद्धा, स्वातंत्र्या बरोबर च, समता न्याय व बंधुत्वाच्या प्राप्ती करीता, तडफडत राहावे लागणार आहे.ठाई ठाई रडत बसावे लागणार आहे. अशी वेळ, परिस्थिती कोणत्याही भारतीयावर, अखिल भारतीयांवर येऊ नये म्हणूनच अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्या करीता, आवश्यक ” *लोकनिष्ठा* जागृती करीता संघर्षाची पार्श्वभूमी 21व्या शतकात मोलाची राष्ट्रीय कामगिरी होय.ती सवर्ण/अस्पृश्य,जात धर्म, सामाजिक भेद भाव विसरून, *लोकनिष्ठा* रक्ता रक्तात भिनली पाहिजे.तरच लोकशाही धोक्याचे धुके विरळ होणे संभव आहे.
सर्वसाधारणपणे,भारतीयांची अशी समजूत आहे की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक शब्दात, “आपणास स्वातंत्र्य मिळालेले आहे.ब्रिटिश निघुन गेलेले आहे. लोकशाहीला पोषक असे भारतीय संविधान मिळालेले आहे.आणि अर्थातच आपणास (भारतीयांना)या पेक्षा जास्त काय हवे आहे? भारतीय सामाजिक गुलामगिरीच्या परंपरेदृष्ट्या यापेक्षाजास्त काही न करता, आपला कार्यभाग संपलेला आहे, असे समजून आता विश्रांती घेतली पाहिजे.संविधान संरक्षण करण्यास सक्षम आहे.असे असले तरी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भारतीयांना ताकीद देऊ इच्छितात की, भारतीयांचे लोकशाही प्रति कर्तव्य संपलेले नाही.त्याला आता कुठे सुरुवात झालेली आहे.इतिहास साक्ष आहे,जो तो वाचेल तोच ठिकु शकणार आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की,तुम्हाला याचे स्मरण आजन्म ठेवावे लागेल की, लोकशाहीचे रोपटे, सर्वच ठिकाणी वाढत नाही. ते अमेरिकेत वाढले, इंग्लंड मध्ये वाढले,काही प्रमाणात फ्रांस मध्येही वाढले.भारतात फारपुर्वीच बुद्ध काळापुर्वीय, सिंधु नागवंशिय संस्कृतीत लोकशाहीचे रोपटे होते,परंतु इतिहास साक्ष आहे की, ते लोकशाहीचे रोपटे सुद्धा _लोकनिष्ठेच्या अभावी* संपलेली,सुकलेले असुन, कित्येक शतकानंतर लोकशाहीचे रोपटे पुन्हा भारतात रुजुन, हिरवेगार होऊ पाहत आहे, वाढू पाहत आहे. परंतू, (भारतीय कलंकीत मनुविचारधारे मुळे) भारतासारख्या बुद्ध भूमीतून एकदा कां “लोकनिष्ठा “संपली किंवा दुर्मिळ झाली, तर लोकशाहीचे रूजलेले रोपटे सुकल्या शिवाय राहणार नाही. ते मुळासकट वाळुन गेले तर पुन्हा या भूमीत लोकशाहीची लागवड करता येईल किंवा कसे?या बाबत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा साशंका आहे. म्हणूनच भारतीयांनो *व्यक्तीभक्त* होण्यापेक्षा *लोकनिष्ठ* बनले पाहिजे. कारण राजकीय लबाडांची गॅग आकाशात सत्तेसाठी गिधाडाप्रमाणे घिरट्या घालत आहेत. निवडणूक काळात त्यांचा वेग वाढलेला आहे. म्हणूनच, भारतीयांनो,केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी किंवा राजकीय लोकशाही साठीच नव्हे, तर *सामाजिक लोकशाही* करीता जागोजागी, जळी,स्थळी, काष्ठी, मनो मनी,संघर्ष उभे करीत राहून, जाती, धर्म,देव नामे भारतीयांची लोकनिष्ठा,राष्ट्रनिष्ठा खत्म करु पाहणार्या शक्तींना [डोमकावळ्यांना] ओळखून त्याची राखरांगोळी केली पाहिजे.तरच, लोकशाहीचे आणि भारतीय संविधाना बरोबर च भारतीयांचे भवितव्य उज्ज्वल व चिरंतरीय राहणार!
- प्रा.मुकुंद दखणे,
यवतमाळ 9373011954.
जयभीम जयभारत!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत