नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त आणि पदाला अशोभनीय असे वक्तव्य – म्हणाले,”काँग्रेस सत्तेत आल्यास सगळी संपत्ती मुसलमानांना, जास्त मुलं असणाऱ्यांना, घुसपेठीयांना देऊन टाकेल.”

बन्सवाडा : रविवारी राजस्थानमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदींनी देशाच्या सांविधानिक धर्म निरपेक्षता या तत्वाला मुठ माती देणारे वक्तव्य केले. देशाच नेतृत्व करणाऱ्या आणि स्वतः ला विश्व गुरु संबोधनाऱ्या इतक्या मोठ्या नेत्याने इतके गलिच्छ विधान करणे यावर अनेकांना अजूनही विश्वास बसत नाहीये.
“काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असं द्वेष पूर्वक व जातीसुचक विधान त्यांनी केलं आहे.
राजस्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी मोदींची प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला. “काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. या शहरी नक्षल वादातून आपल्या महिलांचे मंगळसूत्र देखील वाचणार नाही” अस भयानक वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत