उमेदवारी मिळाली नाही याची खंत आहे, पण का मिळाली नाही याचे उत्तर ना माझ्याकडे आहे ना माझ्या नेत्याकडे ..! – भावना गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया

वाशीम : लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा खेळ चांगलाच रंगला. काहींना राज्यसभेचे आश्वासन तर दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अशी सोय करण्यात आली तर कांहीं विद्यमान खासदारांना नुसता प्रचार करायला सांगितलं गेलं. त्यांचं तिकीट कापण्यात आलं. स्वतःचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत आलेल्या निष्ठावान (?) खासदारांना आता नाईलाजाने मित्रपक्ष, प्रामुख्याने भाजपा चा प्रचार करावा लागणार आहे.
वाशिम-यवतमाळच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम शहरात शिवसेना सवांद मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नीलम गोऱ्हे, खासदार भावना गवळी, हेमंत पाटील आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाशिम-यवतमाळ मतदार संघाच्या भावना गवळी यांनी अतिशय विश्वासाने शिंदे गटाला साथ दिली, मोदींना राखी बांधली, प्रसंगी रेल्वे स्टेशन प्रकरणात आपल्याच जुन्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या पण एकनाथ शिंदे यांना पूर्ण विश्वासाने साथ दिली. परंतु शिंदेना सुध्दा विश्वासात न घेता भाजपा ने केलेल्या सर्व्हेनुसार जनमत नसल्याने भावना गवळींना येथून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले गेले आणि आता केवळ प्रचार करणे एवढच काम त्यांच्याकडे आलं आहे. यापूर्वी भाजपाने शिंदे यांच्याशी चर्चा केली की नाही याबाबत ही स्पष्टता नाही. याबद्दल भावना गवळींना विचारण्यात आलं. यावेळी भावना गवळी यांनी अतिशय अस्वस्थ अशी प्रतिक्रिया दिली.
माझी उमेदवारी कापवी याची मला खंत आहे. माझी एक झाशी गेली एक किल्ला गेला असेल तरी काही हरकत नाही. इतर किल्ले लढवीन. उमेदवारी का कापली गेली गेली, याबद्दल कार्यकर्ते विचारात होते. त्यावर मी उत्तर दिलं. माझ्या मुख्य नेत्याला याचं उत्तर माहिती नाही तर मी काय सांगू? असं वक्तव्य त्यांनी वाशिम येथील संवाद सभेत केलं. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत