माझ्यासाठी चारित्र्य महत्त्वाचं आहे, मला एकनाथ शिंदे म्हणाल तर चपलेने मारीन – हरीश राव, तेलंगणा

हैदराबाद: आपापल्या कार्य कर्तृत्वाने प्रत्येक व्यक्ती आपली छाप समाजात सोडत असतो. आपली तुलना नेहमी चांगल्या प्रतिभावान व्यक्तीशी व्हावी असे सर्वांना वाटते पण जर आपली तुलना विचाराने आणि कृतीने आपल्यापेक्षा अगदी विरूध्द टोकाच्या व्यक्तीशी झाली तर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.
असाच कांहीसा प्रकार तेलंगणा मध्ये पाहायला मिळाला. मला एकनाथ शिंदे म्हणालात तर चपलेनं मारेन अशा शब्दांत तेलंगणाचे माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे आमदार हरिश राव यांनी संताप व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला राव यांनी मुलाखत दिली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी केलेल्या बंडाचा विषय निघाला. शिंदेंशी तुलना होताच राव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लाईव्ह मुलाखतीत शिवी हासडली.
पुरोगामी परंपरा असलेल्या महाराष्ट्राची छबी या स्वार्थी आणि फोडा फोडीचे राजकारण करणाऱ्या नेते मंडळीनी पार रसातळाला नेऊन ठेवली आहे, फोडाफोडी वगेरे करून पद मिळवता येते पण प्रतिष्ठा मिळवणे ही खूप वेगळी गोष्ट आहे, हेच यावरून लक्षात येते.
आमचा पक्ष राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू देईल, असं राव यांनी मुलाखतीत म्हटलं. राज्यातील तुमच्या पक्षाची अवस्था खराब आहे. त्यामुळे तुम्ही माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख केसीआर यांना सोडून जाल आणि एकनाथ शिंदे व्हाल अशी चर्चा होतेय. तसं खरंच होईल का, असा प्रश्न एका पत्रकारानं राव यांना विचारला. पत्रकाराचा प्रश्न ऐकताच राव भडकले. त्यांनी रागाच्या भरात शिवी हासडली. ‘माझ्यासाठी माझं चारित्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. निष्ठेला माझ्या लेखी महत्त्व आहे. निष्ठा माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी २४ वर्षांपासून पक्षात आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी रेवंत रेड्डींनी पक्ष बदलला. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले. मी तसा नाही,’ असं राव म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत