मुख्यपानविचारपीठसंपादकीय

संविधान दिवस व अमृत महोत्सव.

दि २६ नोव्हेंबर २०२३ या दिवसापासून म्हणजे आजपासून संविधान दिवसाचे अमृत महोत्सव वर्ष सुरू होत आहे. तर पुढच्या वर्षापासून म्हणजे २६ जानेवारी २०२४ पासून प्रजासत्ताक दिनाचे अमृत महोत्सव सुरू होत आहे. म्हणजेच दि. २६ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत या दोन्ही भारतीय ऐतिहासिक दिवसाचे अमृत महोत्सव साजरे होणार आहे. तेव्हा हे दोन्ही दिवस भारतीय लोकशाहीसाठी व भारतीयांचे राष्ट्रीय उत्सव दिवस असून द्विवर्षीय अमृत महोत्सव आहेत. हे द्विवर्षीय अमृत महोत्सव भारतीयांसाठी अमृत पर्वणी घेऊन आले आहेत. आम्ही सर्व भारतीय मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करणार आहोत. ज्यांच्याकडे अजूनही संविधानाची प्रत नसेल त्यांनी या अमृत महोत्सव संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाची प्रत घरी आणून त्याचे वाचन करून घरोघरी संविधान हे अभियान चालवावे व यशस्वी करावे. तसेच २६ जानेवारी २०२४ ला प्रजासत्ताक अमृत महोत्सव वर्षाच्या पहिल्या दिवसापासून घराघरांवर राष्ट्रध्वज फडकवून अमृत महोत्सव वर्षाची सुरवात मोठ्या थाटामाटात करावी. स्वातंत्र्याला वर्ष २०२२ मध्ये ७५ वर्षे झाली म्हणून अमृत महोत्सव केंद्र सरकारच्या पातळीवर मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. ‘घर घर तिरंगा’ हे अभियान चालवण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. त्याचा आनंद सर्वात जास्त आर एस एस ब्राह्मणांना झाला. कारण ते ब्रिटिश गुलामीतून मुक्त झाले. भारताची सत्ता आता आपल्या हातात येईल म्हणून आनंदीत झाले, परंतु स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे किती योगदान होते हा संशोधनाचा विषय ठरेल. उलट ज्ञात अज्ञात भारतीय मूलनिवासी बहुजनांनी आपल्या प्राणाची आहुती देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या रूपाने स्वातंत्र्याचा मलिदा आर एस एस ब्राह्मणांनी खाल्ला/खात आहेत. म्हणून आर एस एस च्या अंकित असलेल्या केंद्र सरकारने स्वातंत्र्य अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात केला होता. मूलनिवासी बहुजन अजूनही त्यांच्या लोकखंकेनुसार सत्ता प्रमुख नाहीत की बहू प्रमाणात सत्तेच्या भागीदारीत नाहीत. म्हणजेच आपण अजूनही आर एस एस ब्राह्मणांच्या गुलामीतच आहोत. स्वातंत्र्याचा लाभ फक्त ब्राह्मणांना मिळाला याचा विचार करण्याची गरज आहे. ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. व संविधान रूपी राष्ट्रीय ग्रंथ मूलनिवासी भारतीयांना दिला. संविधानाद्वारे भारतीय मूलनिवासी बहुजनांनी आपली राजकीय सत्ता हस्तगत करून आपले मूलभूत हक्क अधिकार प्राप्त केले पाहिजे. हे ज्या दिवशी आपण प्राप्त करून घेवू तो दिवस खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिवस असेल. म्हणून भारतीय संविधान दिवस व प्रजासत्ताक दिवस या दोन्ही दिवसाचे द्विवर्षीय अमृत महोत्सव आपण भारतीय मूलनिवासी बहुजनांनी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरे करून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होवू या. इथे एक गोष्ट बहुजनांच्या लक्षात आणून देवू इच्छितो की २०२५ प्रजासत्ताक अमृत महोत्सव वर्ष तर आर एस एस चे स्थापना शताब्दी वर्ष आहे. म्हणजे बहुजनांची समतेची विचार धारा व आर एस एस ची विषमतेची विचार धारा या दोन्ही विचार धारा आमने सामने उभ्या ठाकणार आहेत. तेव्हा सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकजूट होवून आपल्याला विषमतेच्या विचारधारेचा शेवटचा पराभव करून ती विचारधारा कायम स्वरूपी मातीत गाडण्यासाठी पदर खोचून मजबूतीनं उभं राहवं लागेल. संविधान दिवसाच्या अमृत महोत्सवी पहिल्या दिवशी हा आपला संकल्प असायला पाहिजे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला भारतीय लोकांनी स्विकृत केले म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळला जातो. आज हा दिवस देशभरात ठिकठिकाणी साजरा करण्यात येतो. तसा तो साजरा व्हायलाच पाहिजे. कारण संविधान आहे म्हणून मूलनिवासी बहुजनांचे मानवी मुल्य, हक्क अधिकार, स्वातंत्र्य, लोकशाही, अबाधित आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते बाधित होणार नाहीत फक्त ते आपल्या पदरात पाडून घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या पिढीला लोकशाही व स्वातंत्र्य्याचे महत्त्व समजले पाहिजे तसेच त्यांच्यामध्ये चेतना जागृत व्हायला पाहिजे यासाठी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणे भारतीयांचे कर्तव्य ठरते. या संविधान सभेतील पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली होती. व शेवटची सभा २५ नोव्हेंबर १९४९ रोजी झाली. दरम्यान १२ संविधान सभा झाल्या. व संविधान पूर्ण व्हायला २ वर्ष ११ महिने व १८ दिवसाचा कालावधी लागला. दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान लिहून पूर्ण झाले होते. परंतु ते २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. म्हणजे त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्याला कारण असे की, दि. २६ जानेवारी १९३० ला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लाहोर मध्ये तिरंगा फडकावला होता. तेव्हा भारत पाकिस्तान अशी विभागणी झाली नव्हती. भारत अखंड देश होता. त्या अखंड देशात लाहोर शहर होते जे आता पाकिस्तानत आहे. तेव्हा तिरंजी झेंड्याच्या मधोमध आजच्या सारखे अशोक चक्र नव्हते तर गांधीजींचा चरखा होता. स्वातंत्र्य सैनिकांनी लाहोर मध्ये तिरंगा झेंडा फडकवला त्या घटनेला दि. २६ जानेवारी १९५० ला २० वर्षे पूर्ण होणार होते त्या दिवसाचे औचित्य साधण्यासाठी व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी दि. २६ जानेवारी १९५० ला राष्ट्रध्वज फडकावून संविधान अमलात आणले गेले. दि. २५ नोव्हेंबर १९४९ च्या शेवटच्या सभेत रवींद्र नाथ टागोर द्वारे लिहलेल्या राष्ट्रगीताला (जन… गण… मन) संमती देण्यात आली होती. तसेच आपल्या राष्ट्रगीताची धून म्हणजे संगीत हिमाचल प्रदेशाचे महान स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन रामसिंग ठाकूर यांनी बनवले होते. अशा रीतीने गणराज्य कींवा गणतंत्र दिवस सुरू झाला. जेव्हा संविधानाची शेवटची सभा झाली त्याच सभेत संविधानाचे सर्वेसर्वा, निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा देवून ठेवला होता. ‘अगर इस संविधान पर अंमल करने वाले लोग अच्छे और इमानदार होंगे तो इसके परिणाम अच्छे आयेंगे मगर संविधान कितना भी इच्छा हो और उस पर गलत लोग काम करेंगे तो परिणाम अच्छे नही निकलेंगे’। हा धोक्याचा इशारा त्यांनी आजपासून ७४ वर्षापूर्वीच देवून ठेवला होता. आज संविधान कोणाच्या हातात आहे हे तुम्ही आम्ही जाणतोच आहोत. आणि त्याचे परिणाम सुध्दा. बहुजन महापुरुषांचे विचार हे काळाच्या शंभर वर्षे पुढे असतात हे काही खोटे नाही. बीबीसी ला मुलाखत देताना बाबासाहेब संविधान व लोकशाही बद्दल काय म्हणाले होते. त्या मुलाखतीचा व्हिडिओ खाली शेअर करत आहे. सर्व भारतीय संविधान प्रेमींना भारतीय संविधान दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधान चिरायू होवो.

जयभीम से जय संविधान है, जय संविधान से जय भारत है और जय भारत से हम सब भारतीय की जय है।

  • अशोक सवाई.
    संपर्क क्र. 91 5617 0699

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!