तरुण उद्योजक देशाबाहेर जाणे थांबवण्यासाठी कौशल्य विकास व अंतर्गत समस्या सोडविण्यावर भर देण्याची गरज – डॉ. रघुराम राजन.

जगप्रसिद्ध अर्थशास्त्री RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी (१७ एप्रिल) दावा केला की देशात अनेक भारतीय तरुण आनंदी नाहीत, भारतात आनंदी नसल्यामुळे मोठ्या संख्येने तरुण भारतीय आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी परदेशात जात आहेत.
रघुराम राजन यांना विचारण्यात आले की, बरेच भारतीय उद्योजक आता सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये का जात आहेत. तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘त्यांना खरोखरच जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मला वाटतं की असा एक तरुण भारत आहे ज्याची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे. मी जगात कोणाच्याही मागे नाही.’
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये ‘मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी 2047: व्हॉट विल इट टेक’ या विषयावर आयोजित परिषदेत राजन म्हणाले की, भारताला योग्य जीडीपी आकडे कळवण्याची गरज आहे. चीन आणि दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारत आपल्या तरुणांचा पूर्ण क्षमतेने पुरेपूर वापर करू शकत नाही, असं राजन म्हणतात. त्यांनी म्हटले की, भारताने आपल्या लोकांची कौशल्ये सुधारण्यावर भर दिला पाहिजे. भारतात प्रत्येक क्षेत्रात समस्या आहे आणि त्यामुळेच अनेक नवोदित कंपन्या स्थापन करत आहेत. देशात प्रचंड बेरोजगारी आहे आणि परिस्थिती अशी आहे की पीएचडी असलेले लोकही रेल्वेत शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत