दिन विशेषदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या पूर्वदिनी त्यांच्या विश्वव्यापी कार्याचा अति संक्षिप्त आढावा.. -उज्वलकुमार भारतीय.

” विश्वव्यापी आंबेडकर “

करोडो भारतीयांच्या जीवनमानात परीवर्तन घडवून आणणार्‍या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोटी-कोटी भारतीयांचे अंधकारमय जीवन लक्ष-लक्ष किरणांनी प्रकाशित केले.

डॉ.आंबेडकर द्वारा लिखित भारतीय राज्यघटनेमुळे आज भारत देश एकात्म,अखंड राहून भारताचा रशिया,सीरिया,पाकिस्तान झाला नाही.तसेच राज्यघटनेतील तरतुदीमुळेच भारतात कधीही हुकूमशाही आली नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांच्या विकासासाठी समान संधी आणि मुलभूत अधिकार देवून देशाला प्रगतीपथावर नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.राज्यघटनेतील मूलभूत हक्क,कर्तव्ये, त्रिस्तरीय पंचायत राज मधून सर्वसामान्यांना सत्तेत सहभागीत्व, वंचितांना संधीची उपलब्धता, राज्य आणि केंद्र यामधील सुयोग्य समन्वय ही राज्यघटनेची उपायुक्तता वाढविणारी आहेत.डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेतील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या कलमांमुळेच देशात शांतता आणि सुरक्षितता आहे,अन्यथा विविध धर्मीय-जातीय-पंथीय मतभिन्नता असलेला देश केंव्हाच सीरिया प्रमाणे अराजक,अफगाणिस्थान प्रमाणे तालिबानी झाला असता.सामाजिक जीवनात २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा ,१९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह ,१९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहातून अस्पृश्यांमध्ये स्वसन्मानाची ज्योत जागवली.८ जुलै १९४५ रोजी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन करून करोडो बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.१५ ऑगस्ट १९३६ रोजी स्वतंत्र मजुर पक्ष ,१९ जुलै १९४२ रोजी शेड्यूल कास्ट फेडरशन आणि १९५५ ला प्रस्तावित रिपब्लिकन पक्षाद्वारे राजकीय क्षेत्रात पायाभरणी केली.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करताना बाबासाहेबांनी समतावादी , मानवतावादी,विज्ञानवादी बौद्ध धम्म भारतात पुर्नस्थापित करून देशातील संभाव्य धार्मिक यादवी टाळली.भारतीय अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरणारे अर्थशास्त्री डॉ. आंबेडकर,स्त्रीयांच्या हक्कासाठी १९५२ साली आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणार आंबेडकर,२४ तासापैकी २०-२० तास अध्ययन करून विद्येची अखंड सेवा करणारे आंबेडकर ,राज्यघटनेच्या ४५ व्या कलमान्वये १४ वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीचा कायदा करणारे शिक्षणतज्ञ म्हणजे डॉ.आंबेडकर,मूकनायक, जनता,बहिष्कृत भारत,प्रबुद्ध भारत सारखी पाक्षिके चालविणारे एक झुंजार पत्रकार म्हणजे आंबेडकर ,जगातील सर्वात मोठ्या संसदीय शासन प्रणालीचे प्रणेते म्हणजे डॉ.आंबेडकर,एक जहाल अभ्यासूवक्ता म्हणजे डॉ.आंबेडकर,बुद्ध अँड हिज धम्म,व्हू वेअर शूद्र,द प्रॉब्लेम ऑफ रुपी,रिहोल्यूशन अँड काउंटर रिहोल्यूशन,व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन फॉर अनटचेबल्स?,रिडल्स इन हिंदुझम,कास्ट इन इंडिया,पाकीस्थान ऑर पार्टीशन ऑफ इंडिया या प्रमुख ग्रंथा शिवाय अनेक विद्वत्ताप्रचुर ग्रंथ लेखन करणारे एक मर्मभेदि जागतिक दर्जाचा लेखक म्हणजे डॉ.आंबेडकर,हिराकुंड-भाक्रा नांगल धरणाचे निर्माते,नदीजोड प्रकल्पाचे समर्थक असे भारतीय जलनीतीचे संकल्पक,कुटुंब नियोजनाचे प्रवर्तक म्हणजे डॉ.आंबेडकर, शेतकरी-शेतमजूर-कामगारांचे नेते म्हणजे डॉ.आंबेडकर, धार्मिक,सामाजिक , आर्थिक,राजकीय, शैक्षणिक,साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्रात अत्युच्च कार्य करणारा यशस्वी नेता म्हणजे डॉ.आंबेडकर,करोडो भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारा आणि जगात सर्वात जास्त पुतुळे असणारा प्राणप्रिय नेता म्हणजे आंबेडकर,भारत देशाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा राष्ट्रनिर्माता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर…….

ही न संपणारी विश्वव्यापी कार्याची यादी आहे.

संपूर्ण भारतीयांसाठी आपले जीवन चंदनासम झिजविणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १३३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

उज्वलकुमार भारतीय.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!