दिन विशेषदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वूत्तपत्रीय चळवळ भाग-२

सोनू ईश्वरदासजी कांबळे
वर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वूत्तपत्रे.
१. मूकनायक

  1. बहिष्कूत भारत
  2. समता
  3. जनता
  4. प्रबुद्ध भारत

‘बहिष्कूत भारत’

०३.०४.१९२७ रोजी प्रसिद्ध झालेल्या बहिष्कृत भारताला संघर्षाची पार्श्वभूमी होती. १९-२० मार्च १९२७ ला महाड येथे आयोजित करण्यात आलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेवर स्पूश्यांनी हल्ला चढविला. अस्पूश्य ठरविल्या गेलेल्या लोकांना सार्वजनिक स्थळांचा वापर करता यावा व नागरी हक्क उपभोगता यावे याकरिता महाडला बहिष्कृतांची परिषद झाली. अस्पूश्यतेच्या रुढीचा अंत व्हावा, हिंदू समाजमन अधिक उदार व्हावे, मानीव अस्पूश्य समुदायाने काळानुरूप सुधारणा स्वीकाराव्या, या पलिकडे या परिषदेचे ध्येय नव्हते. परंतु बहिष्कृतांचे सार्वजनिक पाणवठ्याच्या पाण्याला स्पर्श करणे देखील धर्ममार्तंडांना रुचले नाही. महाडची माती बहिष्कृतांच्या रक्तांने भिजलीच शिवाय फक्त बहिष्कृतांचा स्पर्श झाला म्हणून तळ्याच्या पाण्यालाही शुध्द व्हावे लागले.
चोरी वरुन शिरजोरी करीत सनातनी वूत्तत्रांनी या रक्तपाताकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. म्हाडाच्या घटनाक्रमाने घायाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिहल्ल्याकरिता “बहिष्कृत भारता” शिवाय पर्याय सुचला नाही. तलावातील पाणी कुत्र्या मांजरांनी प्याले असता, ते अपवित्र होत नाही पण अस्पूश्यांनी स्पर्श केला असता ते अपवित्र होते. ती अपवित्रता विष्ठा खाणार्या गाईच्या शेन-मूताने दूर होते. याचाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विलक्षण संताप आला.
महाडला वाहीलेले रक्त वाया गेले नाही. चातुर्वण विध्वंसन नको, अस्पृश्यता निर्मूलनापर्यतच लढा ठेवू असे सुरुवातीला म्हणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५.१२.१९२७ ला मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रस्तुत करीत हिंदू धर्म व्यवस्था संस्थापक मनुस्मृतीचेच दहन करण्याची मजल मारली. शासनसंस्था, धर्ममार्तंड, सत्याग्रह प्रवर्तक बेगडी सुधारक यांचा भंपकपणा उघडकीस आणण्यासोबतच, भारतीय समाजरचनेचे शवविच्छेदन ‘बहिष्कूत भारताने’ केले. चातुर्वर्ण्य विध्वंसन, स्त्री व पुरुषांच्या जन्मसिध्द मानवी हक्कांची घोषणा, राजकीय सत्ता प्राप्त करण्याचा निर्धार असा परमोच्च बिंदू ‘बहिष्कूत भारता’ ने गाठला. ‘बहिष्कूत भारता’ तून धर्मातराचा इशारा दिला गेला असता तरी हिंदू समाजात सुधारणेची आशा ‘बहिष्कूत भारताला’ होती. जुन्या चालीरीती, वेठबिगारी, निरक्षरता, शिवाशिव, जातीभेद यांचा भरपूर समाचार बहिष्कृत भारताने घेतला. म. फुल्यांची चळवळ समानतेची व सद्धर्माची चळवळ होय, अशी ग्वाही देत ‘मी सत्यशोधकीय आहे, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्क्रूत भारता’त केले. आंबेडकरी विचारधारेची पायाभूय मांडणी ‘बहिष्कूत भारता’तूनच झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारलेले हेच एकमेव वूत्तपत्र होते. अन्य वर्तमानपत्रे त्यांच्या नेतृत्वाखाली निघाली असली तरी ते स्वतः मात्र त्यांचे संपादक नव्हते. ०३.०२.१९२८ रोजी “बहिष्कृत भारताचे रूण हे लौकिक रुण नव्हे काय” या अग्रलेखात त्यांनी आपले हृदय उघडे केले. बहिष्कृत भारताची शोचनिय आर्थिक अवस्था, २४-२४ रकाने लिहीण्याचे अपार परिश्रम पण तरीही लौकिक रुण फेडण्याच्या कर्तव्यबुध्दीतून ‘बहिष्कूत भारता’ ला जगविण्याचा आटापिटा त्यांनी या लेखातून व्यक्त केला.

संदर्भ :- प्रदिप गायकवाड यांचे जनता चे संपादकीय खंड.

सोनू ईश्वरदासजी कांबळे
वर्धा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!