मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

पुढील ३० वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढणार

बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke)च्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा, याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यावर वेळीच उपचार केला नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.  

एका संशोधनानुसार देशभरात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी वयाच्या ५० वर्षांनंतर ब्रेन स्ट्रोकचा धोका होता. आता वयाच्या ३५ व्या वर्षीही ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण आढळत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे, तर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता, हा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!