दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक मंगल कामना

दैनिक जागृत भारत टीम च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ..!

११ एप्रिल१८२७ साली पुण्यात ज्योतिबा फुले यांचा जन्म जन्म झाला . ज्योतिबा यांचा पुर्ण कुटुंब फुलांचे गजरे बनवण्याचा काम करित होते यामुळे त्यांच्या कुटुंबाला फुले या नावाने ओळखले जात असे.ज्योतिबा केवळ एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे देहांत झाले होते.ज्योतिबा फुले यांनी काही काळ मराठीत अभ्यास केला. नंतर शिक्षण सुटलं, आणि नंतर वयाच्या २१ वर्षात त्यांनी इंग्रजीत सातवी या वर्गाचा अभ्यास सुरू केला. महात्मा फुले यांचा विवाह १८४० साली सावित्रीबाई यांच्या सोबत संपन्न झाला होता.

स्त्रीयांची अवस्था सुधारण्यासाठी आणि त्यांना समाजात ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी १८५४ मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती.मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षिका नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला या योग्य बनवले. काही लोकांना सुरूवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे घातले. लोकांनी त्यांच्या वडिलांवर दबाव टाकून पत्नीसह बाहेर हाकवले , तरी ज्योतिबांनी हिंमत सोडली नाही . आणि मुलींसाठी तीन तीन शाळा उघडल्या.गरिब आणि निर्बंळ वर्गाला न्याय देण्यासाठी ज्योतिबाने ‘ सत्यशोधक समाज ‘ स्थापित केले, त्यांच्या समाज सेवेने प्रभावित होऊन १८८८ मध्ये मुंबईच्या सभेत त्यांना ‘महात्मा ‘ या उपाधिने अलंकृत करण्यात आले.ज्योतिबा यांनी ब्राह्मण -पुरोहित यांच्या मदतीविना विवाह- संस्कार आरंभ करवले आणि मुंबई हायकोर्टाकडून मान्यता मिळावली. ते बाल-विवाह विरोधी आणि विधवा विवाहाचे समर्थक होते.त्यांनी दलितांच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केले.त्यांनी दलित मुलांचे घरात पालन -पोषण केले. परिणामस्वरूप ते जातीतुन बहिष्कृत केले गेले. ज्योतिबा फुले आणि त्यांच संघटन सत्यशोधक समाजाच्या संघर्षामुळे सरकारने एग्रीक्लचर एक्ट पास केले.महात्मा ज्योतिबा फुले यांनी ६३ व्या वर्षी २८ नोव्हेंबर १८९० ला पुण्यात आपले प्राण त्यागले.

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवनअर्पण करण्या-या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता- सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उध्दारक,समाजाचे सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत ख-या खु-या स्वतंत्र भारताचे स्वप्न बघितले.भारतीय समाज रचनेचा कायापालट केले.शोषित ,वंचित व महिलांच्या उत्कर्षासाठी आणि शिक्षणासाठी नेहमी संघर्षरत असणारे बहुजन चळवळीचे स्तंभ , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

*विद्येविना मती गेली!* *मतिविना नीती गेली !*
*नितीविना गती गेली!* *गतिविना वित्त गेले!*
*वित्तविना शुद्र खचले!* *इतके अनर्थ*
*एका अविद्येने केले!!*

ऋतुजा आहिरे
११ एप्रिल २४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!