मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पुर्ण करा : रिपाइं ची मागणी

(दलित पॅंथर व बंजारा क्रांती दल यांचा पाठिंबा )


नंदगाव (शाम नागीले) : मागील चारपाच वर्षांपासून नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे रखडलेले काम त्वरित पुर्ण करा असी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शहर शाखा नळदुर्ग ता.तुळजापूरच्या वतीने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्या मध्ये बेशरमाची व कडुलिंबाची झाडे लावून आंदोलन करून शासनाकडे करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर व्रत असे की, रस्ता सुरक्षा सप्ताह आभियानाचे औचित्य साधून नळदुर्ग ते अक्कलकोट या असुरक्षित रस्त्यावर गणेशखिळा गणेश मंदिराच्या जवळच अंतरावर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात बेशरमाची व कडुलिंबाची झाडे लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासन प्रशासनाचा निषेध करत नळदुर्ग ते अक्कलकोट रोडचे प्रलंबित काम त्वरीत पुर्ण करून हा रस्ता पावसाळा सुरु होण्यापूर्वी सुरक्षित करून द्यावा असी मागणी रिपब्लिकन कार्यकर्ते यांनी केली आहे.
या कामी काही शेतकऱ्यांच्या मावेजासाठी न्याय व हक्काची लढाई लढत आहेत. परंतु न्यायपविष्ठ विषय असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास होत आहे. अक्कलकोटला व तुळजापुरला जाणारे भाविकांसाठी व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी नळदुर्ग ते अक्कलकोट रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरती दैनंदिन व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरती शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी पिकवलेला धान्य वेळेवर घेऊन जाता येत नाही. शेतातलं ऊस या रस्त्यावरून घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळेस उसाचे वाहन पलटी झाले आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शाळकरी विद्यार्थी वेळेवर महाविद्यालय शाळेमध्ये कधीच पोहोचत नाही. गर्भवती महिला शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
याप्रसंगी रिपाई (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाई सोलापूर जिल्हा संघटन सचिव सोपान गायकवाड,रिपाई नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी, दलित पँथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले,तालुका संघटक सुरेश लोंढे,मेडिया सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड,रिपाईचे दत्ता बनसोडे,मारूती लोंढे, संतोष झेंडारे, भटक्या विमुक्त संघनेचे संस्थापक पंडित भोसले,सह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दलित पँथर धाराशीव जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागीले यांनी व बंजारा क्रांती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विद्यानंद राठोड व जिल्हा अध्यक्ष निरंजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा क्रांती दलाचे महेंद्र चव्हाण, अकाश आडे,मिथुन राठोड,संदीप राठोड आदीनी या रिपाईच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!