महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

गुढीपाडवा; समज/गैरसमज – डॉ. श्रीमंत कोकाटे

या विषयावर मि लिहणार नव्हतो,पण दररोज चालू असलेल्या वादानंतर लिहावेसे वाटले….

गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध असा येतो की

संभाजी महाराजाचां मूर्त्यूच्या दूसर्या दिवशी महाराष्ट्रात गुढ्या उभारल्या
माझे तर अगदी स्पष्ट मत आहे,आज जि गुढी उभारली जाते ति

संभाजी महाराजाच्यां मूर्त्यूनंतरच उभारण्यात आली आहे,

‘गुढी’ या शब्दाचा मराठी वांड्मयातील शब्दश अर्थ

“विजयाची भगवी पताका “

. पंढरपुरच्या विठोबाचे निशाणही भगवी पताकाच आहे त्यामुळे हा वरील अर्थ तंतोतंत जुळतो.त्यामुळे बरयाच संतानी गुढी शब्द भगवी पताका या अर्थाने वापरला आहे.

साडी,उलटा तांब्या याचा उलगडा स्वत:स पंडित समजणारयानी समाजापुढे करावा.

‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या,१४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

अभंगाचा अर्थ:-

गुढी उभारून पंढरीस जावे,मराठी महीन्यात गुढी चैञात उभारली जाते,
आणी पंढरीची वारी आषाढ महीन्यात असते,
यात तब्बल 2 महीन्याचा फरक आहे,
घरोघर गुढ्या उभारून लोक पंढरीस जात असतील तर गुढी ही आषाढात उभारली जात असावी….

कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

निट वाचा या तूकाराम महाराजाच्यां अभंगानूसार

गोकूळात गोकूळाष्टमीला गुढ्या उभारल्याचा उल्लेख आहे,गोकूळाष्टामी ही चैञात नसते,

गुढीपाडवा खरच मराठी नववर्ष आहे का ?

सातवाहनाच्या काळात शालिवहन या राजाने शक निर्माण केला त्या शालिवहन शकानूसार चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस ठरवला जातो.गुढीपाडवा सोडता शालिवहन या राजाचां कूठे उल्लेखच आढळत नाही,

छञपती शिवाजी महाराजानीं स्वःताचा शिवशक चालू केला,किती जणानां माहीत आहे ?

त्या शिवशकानूसार येणारा शिवराज्याभिषेक दिन हा मराठी नववर्ष म्हणून का साजरा केला जात नाही

,उन्हाळ्यातील पाडव्याला झाडाला पानही राहत नाही,वादळी वातावरम असते

,राज्याभिषेक दिनी जून महीन्यात माॅन्सून वारे वाहू लागतात,शेतकरी आनंदमयी होतो आणी खर्या अर्थाने वातावरणात बदल होतो,जमिनीत अंकूर फूल लागतो,शेतकर्याच्यां नववर्षाची सुरवात होते,

त्यामूळे शालिवहनाचे नववर्ष मानायचे की छञपती शिवाजी महाराजाच्यां शिवशकानूसार राज्याभिषेक दिनी नववर्ष साजरे करावे,याबद्दल गांभिर्याने विचार करावा

पाडव्याबद्दल अजून ऐक कथा सांगितली जाते,

राम आणि सीता वनवासावरून ते अयोध्यात त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे.

.ध्वज-पताका उभारल्या,म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या,असा होतो.

वरिल परिष्छेद निट वाचा,यामधे गुढी म्हणून फक्त ध्वज पताका लावल्या असा उल्लेख आहे,

आज आपण जी साडी-लोटा अडकवतो असे नाही,

तसेच अयोध्यात त्याच दिवशी पताका उभारल्या,दरवर्षी त्याची पुनरावृत्ती न झाल्यामूळेच

आज अयोध्यात एकही गुढी उभारली जात नाही..

पूर्वी ज्या ज्या वेळी लोकांना आनंद झाला,त्या त्या वेळी त्यानीं ध्वजपताका लाऊन गुढी उभारली,विशीष्ट अशा एका दिवशी नाही,आणी

आज जे गुढीचे स्वरूप आहे साडी-लोटा लावला जातो तो शंभूराजाच्यां मूर्त्यूनंतरच चालू झालेला आहे,

खरं तर या दु:खद घटने नंतर आपण आनंदाने गोडधोड करून खाणे,

हा तर शंभू महाराजाच्यां अंगावर लागलेल्या प्रतेक जखमेवर मिठ चोळण्यातला प्रकार आहे,

या दिवशी घरावर साडी-लोट्याच्या गुढीऐवजी
शंभूप्रतिक म्हणून मराठ्याचें विजयी प्रतिक ध्वजपताका लावावी,
आनंदोत्सव साजरा करू नयेच,आणी तिथि पुरस्कर्त्यां लोकांनी काल दुःख पाळून आज पंचपक्वानाचे अन्न झोडणे म्हणजे दूतोंडी मांडूळासारखे वागणे होय
,पहा..

आणी याही नंतरच काही शिंदळीच्या औलादी आनंदोत्सव साजरा करणार असतील तर करू द्या,मि तर असे समजेल त्या काळात शिवाजी महाराजानां ज्या मराठ्यानीं विरोध केला त्याच्येंच वशंज आज शंभूच्या बलिदानावर आनंदोत्सव साजरा करत आहोत….

( सत्य हे मिरची सारखे असते,झोंबले तरी काही फरक पडणार नाही )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!