देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सामाजिक लोकशाही ” बंधुता” शिवाय ची लोकशाही”स्वातंत्र्य, समता”सदाकाळ “धोक्याची घंटा”!

प्रा.मुकुंद दखणे,

            डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, स्वातंत्र्य ही अगदी आनंदाची बाब आहे.आपण
इंग्रजां विरूद्ध बंड करून, स्वातंत्र्य अर्थात राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले असून, या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदार्या टाकलेल्या आहेत. याचा आपण (भारतीय) विसर पडू देता कामा नये.तसेच, या प्राप्त राजकीय स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टी साठी आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही.कारण 26 जानेवारी 1950 पासून आपले भारतीय संविधान सुरू होत आहे. [सुरू होऊन 74 वर्ष पूर्ण होऊन 75वर्षात पदार्पण]राजकीय दृष्टिकोनातून आपण स्वातंत्र्य देशाचे नागरिक आहोत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, यापुढे जर काही वाईट घडले,देश देशोतळाला लागण्याची वेळ आली, तर त्यासाठी आपल्या शिवाय (भारतीय)दुसर्या कुणालाही दोषी धरता येणार नाही.
            आज स्वातंत्र्याच्या सुवर्ण वर्षानंतर संविधानाला धोका असल्याचे, हुकुमशाही येण्याचे, भारतभर पडघम वाजत आहे.सत्य तपासून पाहणे आणि देशाच्या नागरिकांना सतर्क करीत राहणे, आवश्यक म्हणूनच,सदर लेखाचा उद्देश आहे.
                डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात जे ईशारे दिलेले आहेत, ते आजुनही जीवंत आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, काळ*वेगाने बदलतो आहे. आपले लोक, भारतीय सुद्धा नवनवीन विचार प्रणालीचा मागोवा घेत आहे.भविष्यात अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका, लक्षात घेऊन, ज्या भारतीय संविधानात आपण लोकांचे लोकांकरीता निवडेले भारत शासन या तत्त्वाचे जतन केले, ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल ,तर आपल्या मार्गात अडथडे येणार आहेत ते आपण वेळीच ओळखले पाहिजेत की, जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकार च्या तुलनेत लोकांसाठीच असलेल्या सरकारला प्राध्यान्य देण्याकडे वळतील.यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्लब ठरता कामा नये.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, " *देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग होय. "

            अर्थात, भारतीय जनतेने सुज्ञ, बुद्धीवंत, प्रज्ञावंत, प्रामाणिक, न्यायीक बनुन असे सरकार निवडून द्यायचे आहेत की, "मुहॅ मे राम और बगलमे शुरी " ठेवणारे, बोल घेवडे,खोटारडे, जनतेच्या विरूद्ध कायदे करणारे, भ्रष्टाचाराला चालना देणारे, निकामी ,दैववाद फैलावून राष्ट्रवाद खत्म करू इच्छिणारे, राष्ट्रवादाचा खरा शत्रु जातीयवाद उर्फ ब्राह्मणवाद यासं प्रोत्साहन देऊन, राष्ट्रीय मने निव्वळ मतासाठी विभाजन करून, धर्म मार्तंडता, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार्यांना सत्तेतुन हद्दपार करून, देशातील महागाई, बेकारी, गरीबी,असहिष्णुत वातावरण, जातीभेद, अस्पृश्यता,धर्मभेद, दैववाद, अंधश्रद्धा, लोकसंख्येतील वाढ, शेतमजूर, शेतकर्यांच्या समस्या, रोजगार उपलब्धता, शिक्षण, आरोग्यासह अनेक समस्यांचे पर्मनंट निर्मुलन करणारे स्वच्छ मनाचे, स्वच्छ सरकार निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे.समजदारी, बुद्धीप्रगल्भता, आणि शीलवैभव्यता बाळगून च भारतीयाने येत्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आपले मतदान, कोणत्याही आमिषाला बळी 

न पडता स्वच्छ,इमानदार उमेदवारालाच निवडून दिले, तरच आपले भवितव्य उज्ज्वल आहे असे समजावे.

        डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट ईशारा दिला होता की, जाॅन स्टुअर्स मिल*यांनी दिलेला इशारा लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणुस असला (म.गांधी, पंडीत नेहरु,वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, शहा वगैरे) तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्यांचेवर *इतका विश्वास ठेवूनये की जेणे करून, त्याला प्राप्त अधिकाराचा>[,ईडी,,सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग वैगरे]तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. आज आपण पाहतो आहे की, ईडी_भारत सरकार, सारख्या सरकारी संस्था हुकुमशाही पद्धतीने सरकारमधील संस्था, आमदार, खासदार यांना मुक्त सोडून,देऊन फक्त आणि फक्त विरूद्ध सरकार पक्षातील आमदार, खासदार यांना वेटीस धरून, सरकार विरोधातील पक्षातील भ्रष्टाचार खत्म करायला निघालेल्या आहेत. सर्वसामान्य जनता जानतात की, *राजकिय पक्षातील कोणताही नेता आपली आमदार की, खासदार की भ्रष्ट आचारना शिवाय टिकऊन ठेवूच 

शकत नाही, “भ्रष्टाचार मुक्त राजकीय नेता दाखवा आणि करोडो _हजारो रूपये मिळवा “अशी जाहिरात सरकार ने दिली तरी असा संभव्य राजकीय पुढारी मिळणे जवळपास अशक्यप्रायः आहे.असे असतांना ईडी ने भारत सरकार म्हणून, कमीत कमी,नाही काही तर 2 ला 1 या प्रमाणात तरी विरूद्ध व सरकार पक्षातील नेत्यांची आमदार, खासदारांची भ्रष्टाचारातील सहभाग किती? याचा आराखडा तयार करून, सुप्रीम कोर्टात नित्यनियमित सादर करावा. किंवा सुप्रीम कोर्टाने तसे आदेश द्यावेत. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा ही सर्वसामान्य जनतेची
ईच्छा असली तरी सरकार मधील सत्ताधीशांचीच ईच्छा तशी नसल्यानेच आजपर्यंत भ्रष्टाचार देशात तरत आहे.पण सर्व सामान्य* जनतेचे हाल होत आहे. आणि असेच
भ्रष्टाचारी लोकनेते स्वच्छ मनाने निवडणूकीत समोरा होऊन, बॅलेट पेपरवर निवडून येण्यास घाबरत असल्याने, बहुतांश जनतेची बॅलेट पेपरवर निवडूक व्हावी, अशी मनोमन इच्छा असतांना,मोदी सरकार,निवडूक आयोग, सुप्रीम कोर्ट सुद्धा ईव्हीएम मशीन द्वारा निवडूक व्हावी असा अनावश्यक आग्रह धरून आहे. बहुसंख्य जनतेला जर ईव्हीएम मशीन बद्दल शंका कुशंका आहे तर सरकार चा किंवा निवडूक आयोगाचा ईव्हीएम मशीन नेच निवडूक घेण्याचा
आग्रह कां? याचे स्पष्ट उत्तर आहे की, *दाल मे कुच्छ काला है

  • जनतेचा आग्रह लक्षात येऊन, *बॅलेट पेपरवर निवडूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने देणे ही भवितव्यातील हुकुमशाही ला रोखण्याची,संविधानात्म गरज होय. नाहीतर उद्या,ऐन निवडणुक मतदानाच्या वेळात, लोकशाहीच्या जीवंतपणा करीता,लोकांनी ईव्हीएम मशीन च फोडण्याची क्रांतिकारक प्रयोगशाळा सुरू केली, तर?राष्ट्रीय
  • सुसंस्कृती करीता सुसंस्कृत मार्गाचाच अवलंब व्हावा असी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती आणि जनतेच्या* शंकाकुशंका समाप्ती साठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर येत्या लोकसभेची निवडणूक घेऊन, खरोखरच 400पार चा मा.नरेंद्र मोदी सरकार ने दिलेला नारा यशस्वी करून दाखवता तर च तो नैतिक नारा ठरेल. आणि त्यांचेवर जो आक्षेप आहे की नरेंद्र मोदी सरकार ईव्हीएम मशीन च्या भरोशावर च, दुरुपयोग करून च निवडून येत आहेत. असा आरोपाचे सुद्धा, दुध की पाणी
  • सत्य बाहेर यायला मदत होईल. आणि तसे करण्यास,बॅलेट पेपरवर निवडूक घेण्यास मोदी सरकार कचरत असेल, घाबरत असेल तर समजावे की, मोदी सरकार ची वाटचाल ही लोकशाही पायदळी तुडवून हुकुमशाही कडे निश्चित आहे. मोदी सरकार किंवा आजून कोणतेही सरकार भविष्यात हुकुमशाही कडे वळू नये, म्हणूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, आयरीश देशभक्त, डॅनियल ओ काॅनल यांनी म्हटल्या प्रमाणे,” *कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृत्य ज्ञता व्यक्त करू शकत नाही.कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन, कृत्यज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन, कृत्यज्ञता व्यक्त करुच शकत नाही “
    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, इतर देशाच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा ईशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणतात अशी विभूती पूजा,(अंधळेपणा )ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, “धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु,राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती पुजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाही कडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. ” हे व्यक्तीपुजा करणार्या भारतीयाने वेळीच ओळखून, खोट्या, दृष्ट गाॅरटीच्या मागे लागुन, लोकशाही
    धोक्यात आणण्यास मदत करू नये.कारण लोकशाहीत व्यक्ती महत्वाची नसून, जनता व देश महत्वाचा आहे.
    गेल्या 10 वर्षांपासून चालू असलेली व्यक्तीपुजा “मोदी मोदी….ते मोदी की गाॅरंटी…”हे दुसरे तिसरे काहीही नसून, व्यक्तीपुजा, अराजकतेचा मार्गक्रम होय. आणि अशी व्यक्तीपुजा किंवा रामकृष्ण व्यक्तीपुजा म्हणजेच रामायण, महाभारता प्रमाणे युद्धात नाशा च्या पलिकडे काहीच नसते.अशी व्यक्तीपुजा ही नेहमिच महाभयानक असते. त्या प्रमाणेच मोदी भक्तीपुजा किंवा तत्सम भक्तीपुजा ही भारताचे व भारतीय लोकशाहीचे अधःपतन केल्या शिवाय राहणार नाही.हे ओळखून च मतदाराने आपल्या मताचा आदर, मत हक्काची अमलबजावणी करतांना विचार पूर्वक मतदान करणे, काळाची गरज तर आहे त्याच बरोबर,जेणे करून उद्या पश्चाताप करण्याची वेळ,भारतीयांवर, सुप्रीम कोर्टावर[ ईव्हीएम मशीन ने मतदान न रोखणे, ]कारण भारतीयांचे व संविधानाचे संरक्षण करण्याची अंतिम जबाबदारी ही सुप्रीम कोर्टा प्रमाणे भारतीयांची आहे. (गेल्या मागल्या पुढे होऊनये म्हणूनच ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या स्वातंत्र्याबद्दल हर्षोल्लासा पेक्षा, देशाच्या भवितव्याबद्दल अधिक चिंतातूर होते की, भारत आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की,स्वातंत्र्य पुन्हा गमवून बसेल ?कारण भूतकाळात (इतिहासात)भारताने केवल आपले स्वतःचे स्वातंत्र्य गमावले असे नव्हे, तर देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघाती स्वभावामुळे गमावले गेले ही वास्तविकता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र प्रेम्याला अधिक चिंतातूर करणारी होती. इतिहास साक्ष आहे की, (1)महम्मद बीन काशीमच्या हस्तकाकडून लाचा (भ्रष्टाचार)स्विकारुन आपल्याच राज्याच्या,[सैनिक अधिकार्यांनी]बाजुने लढण्याचे नाकारले.(2)महम्मद घोरीला भारतावर निमंत्रण देणारा हा जयचंद(भारतीय) होता आणि त्याने त्याला पृथ्वीराज (भारतीय) विरूद्ध लढण्यासाठी स्वतःच्या आणि सोळंकी राज्याच्या मदतीचे आश्वासन दिले.(3)जेव्हा शिवाजी भोसले (शिवाजी महाराज) हिंदुुच्या मुक्तीसाठी लढत होता त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपुत राजे (तसेच जातीब्राह्मण सद्धा , हिंदुु)मोगल साम्राज्याच्या बाजुने युद्ध </code></pre>लढत होते.(4) जेव्हा शीख
    राज्यकर्त्याचा नि: पात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते तेव्हा त्याचा प्रमुख सेनापती गुलाबसिंग शांत बसला आणि शिखाचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखाला मदत केली नाही. 1857 ला भारतातील बहुतांश भागानी इंग्रजांच्या विरूद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली तेव्हा, शीख बघ्याच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले.(5)पेशव्यांनी,[जाती ब्राह्मण ]तर अतिसंहार केला.आपल्याच भारतीयांना,हिंदुंना शुद्र _अस्पृश्य बनवुन आपली ताकत खंडित केली, विभाजीत केली आणि ईश्वरभक्ती, जातीयवाद, अस्पृश्य स्पृयता तसेच विभूतीपुजेत इतके मग्न झाले की, 1818च्या युद्धात इंग्रज सैनिक व महार बटालियन सैनिक (500ते 700 )पेशव्याचे 27हजार सैनिक कापले गेले. तेव्हा इंग्रजांनी महार अस्पृश्यांची शक्ती ओळखली, राज्य जिंकले पण पेशवे जातीयवादात व भक्तीत मनुस्मृतीत आतंक बुडाल्यानेच पेशवाई संपविण्यात इंग्रजांना यश प्राप्त होऊन, देशावर 150पेक्षा अधिक काळ राज्य केले. अशा इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होऊन, देश पुन्हा गुलामगिरीत जाईल का?
    स्वातंत्र्य पुन्हा देश गमावून बसेल का?अशी चिंता बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेच्या शेवटच्या भाषणाच्या वेळी सतावत होती. ती आता गहरी होऊ पाहत आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना असेही वाटत होते की, स्वातंत्र्यानंतर सत्तेसाठी जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रुसोबत च भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणार्या बर्याच राजकिय पक्षाची ही भर पडणार असल्याने गद्दारीचे प्रकरणे समोर येऊन, शासन विक्रीला
    निघतिल कि काय? देशावरील वाढते 105लाख कोटी पेक्षा अधिक कर्ज, बाबासाहेब आंबेडकर यांचे शंकेला दाद देत आहे.आज राजकारणी म्हटला की, नीतीभ्रष्ठ, भ्रष्टाचारी, जातीयवाद्यांची,गद्दारांची राजकारणीयात रेलचेल झाली आहे. "जिधर दम (सत्ता)उधर हम " दिवसा एका पक्षात तर रात्री दुसर्या पक्षात दावनीला बांधलेले, पहाटेचा शपथ विधी, पक्ष फोडाफोडीतून सत्ता विस्तार, होताच कालपर्यंत भ्रष्टाचारी म्हणून नावाजलेले, स्वच्छ व प्रामाणिक राजकारणीय म्हणून काॅलर टाईट करून, उजळमात्याने फिरत आहे कारण सत्तेत आहे.वास्तविकतः अशांची जागा कारागृहात असायला हवी पण सत्तेत सत्ताधिश म्हणून वावरत आहे आणि सर्व सामान्य जनता भरडून निघत आहे .
    महागाई, बेकारीने,बिमारीने, शिक्षणाच्या अभावाने ,नापिकीने शेतकरी भरडून निघत आहे. सर्वसामान्यांना न्याय दुरापास्त झालेला आहे. आणि नेमकी हिच चिंता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अशीही चिंता होती की, जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला, अजेंडाला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसर्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविल्या जाईल. आजचे भाजपा, संघाला,धर्माला राष्ट्रापेक्षा मोठे मानत आहे.भारतीय संविधान संपविण्याची भाषा उच्चारत आहे. सामाजिक आरक्षण संपविण्यात मग्न आहे.पण सामाजिक समता प्रस्थापित करण्यात विसरून ,हिंदुुमुस्लीम दुही पसरवून देशात असहिष्णुत वातावरण निर्माण करण्यात मग्न आहे. भारतीयत्वा पेक्षा हिंदुत्व श्रेष्ठ हीच त्यांची राजकीय व राष्ट्रीय पाॅलीशी असल्याने ही राष्ट्रासाठी, भारतीयांसाठी, लोकशाहीसाठी आणि भारतीय संविधानासाठी धोक्याची घंटानाद आहे, जी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 26नोव्हेंबर1950 रोजी सतावत होती, ती स्वातंत्र्याच्या 75वर्षात सुवर्ण वर्षात कायम असल्याने, भारता सारख्या अखंडप्रायः देशाला
    हार्ट अ‍ॅटॅक येऊन, केव्हा स्वातंत्र्य गमावून बसेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषेत "आपण भारतीयांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. " आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मंदीर _मज्जीद च्या दैववादी मानसिकतेतून, जातीभेदाच्या जाळ्यातून, जाती ब्राह्मणी सापळ्यातून, भ्रष्टाचारातून, अनितीतुन, अवैज्ञानिकतेतून, अंधश्रद्धेतून, आणि व्यक्ती सापेक्ष राजभक्तीतून,भ्रमी राजकारणातून बाहेर येऊन भारतीयांच्या मनामनात राष्ट्रीयत्व भावना जागृत करण्यात आपण सर्व यशस्वी होऊन ,राष्ट्रहितासाठी बंधुभावाने जमीनीवर वर्तनाने जगण्यास समर्थवान बनु! डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे राष्ट्र प्रेम,राष्ट्र भक्ती भारतीयांना समजल्या शिवाय,भारतीय सृजनशील, राष्ट्र स्वातंत्र्य संरक्षक बनु यातं शंका आहे. ती शंका दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर,आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात काय म्हणतात ते पाहू! भारताला लोकशाही म्हणजे काय?हे माहीत नव्हते असे नाही.एक काळ असा होता की, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सिमित होती. या प्रणाली कधीही अनिर्बंधीत नव्हत्या. भारतात संसद किंवा संसदीय प्रणाली माहित नव्हते, असेही नाही.बौद्ध भिक्खु संघ, हे दुसरे काही नसून, संसदच होय. तसेच आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम (उदा.बसण्याची व्यवस्था, विधयक मांडणे, ठराव कामकाजासाठी आवश्यक किमान संख्या, पक्षप्रतोदानेआदेश काढणे,मतमोजणी,मतपत्रिकेद्वारे मतदान करणे,कपात, सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था इत्यादी त्याचे नियम होते. ) बुद्धाने संघाच्या सभेसाठी नियम अमलात आणले तरी त्याकाळात ते देशात कार्यरत राजकीय विधिमंडळ पालन करीत होते.पण ही लोकसत्ताक पद्धती भारतीयाने गमावली.आज पुन्हा गमावण्याच्या मार्गात असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आजकाल पक्ष माहात्मे,लिडरकी वाढलित, त्यामुळे विधिमंडळाचे अध्यक्ष, संसदेत विरोधी पक्षांना अधिक संधी देण्यापेक्षा, त्यांना संसदेबाहेर करण्यातच धन्य मानत आहेत.त्यामुळेच जनतेच्या समस्यांना एकतर वाचाफुटत नाही. उलट,समस्यांचा निपटारा होणे ऐवजी
    ते अधिक जटील बनत असतांना पाहावयास मिळत आहे,की त्याचा परिपाक जनताजनार्धन अधिकत्तम अधिक काळ रस्त्यावर आपल्या समस्या,प्रश्न घेऊन दिसत आहे.वास्तविकतः संसद असतांना जनतेला रस्त्यावर येण्याची वेळच
    यायला नको आहे.पण राजकीय योद्धे, खासदार, आमदार सत्ताधिश वगैरे भ्रष्टाचारात मग्न असल्याने, प्रशासकीय अधिकारी सर्व सामान्य जनतेला जुमानत नाही,तेही बहुतांश भ्रष्ट असल्याने लोकशाहीत जनतेचा
    वाली दिसत नाही. आणि सर्व सामान्यांकरिता न्यायालयातील भरगच्च केसेस मुळे, न्यायाची अपेक्षा
    धुसर होत आहे. राजकिय पक्षाच्या फोडाफोडीच्या आणि पक्ष चिन्हाच्या न्याय प्रकिया विलंबातुन, बंडखोर लोक सत्ताधिश असल्याने,हक्कान्यायासाठी,जनता तहानलेल्या अवस्थेत बिमारी मार्गात आहेत. अशा परिस्थितीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित हुमशाहीकडे भारताची वाटचालीचा संभाव्य धोका दिवसेंदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत ईव्हीएम मशीन चे भूत भारतीयांच्या मनगटावर नाचु पाहत आहे. देशात घरोघरी, व्हाट्सअप, बातम्यात, चर्चेत एकच नारा आहे, "ईव्हीएम हटाव, देश बचाव" ना राज्यकर्ते, ना निवडूक आयोग, ना सुप्रीम कोर्ट जनतेच्या या मनके बात ची तसदी घ्यायला तयार नाही.
    जर मोदी सरकार चे कार्य चांगले आहे, राष्ट्र प्रगतीपथावर आहे तर त्यांनी ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडूक घेण्यास काय हरकत आहे. वेळ लागेल कदाचित पण भारतीय सर्व सामान्य जनतेच्या मनातील ईव्हीएम बद्दल ची शंकाकुशंका दूर होणे क्रमप्राप्त असतांना सुप्रीम कोर्ट सुद्धा, बॅलेट पेपरवर मतदानाला दाद द्यायला, निवडूक आयोगास आदेश देण्यास सक्षम आहे किंवा कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण भारतातील जनता आशागुणी आहे की, कमीत कमी, ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार यतकिंचित ही होणार नाही.लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी
    भारतात ईव्हीएम वर बंदी आणून बौद्ध संघा प्रमाणे मतपत्रीकाद्वारे, भविष्यातील लोकसभा, राज्यसभा व
    इतर सर्व निवडूका घ्याव्यात अशी भारतीयांची, जनतेची मागणी आहे.तरच प्रत्यक्षात लोकशाही जीवंत व्हायला मदत होईल. कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, क्रांतीच्या रक्त रंजीत मार्गापेक्षा सामाजिक आणि आर्थिक उद्दीष्टाच्या पुर्ततेसाठी आपण संविधानात्म मार्गाचीच कास धरली पाहिजे. नैतिक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे.संविधानाला धोका संभव असणार्या विरूद्ध सर्वोत्तोपरी संविधानात्म मार्ग उपलब्ध आहेत, तो पर्यंत असंविधानात्म मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही. रक्तरंजित क्रांती हा उपाय नाही.आणि संविधान संपुष्टात आल्या नंतरचा तो पर्याय आहे.तरीही शक्यतो, अराजकता ही संविधानात्म मार्गानेच, वेळोवेळी भारतीय जनतेने संपविली पाहिजे. संविधानात्मक दृष्य मतदानाचा अधिकार व माहितीचा अधिकाराचा मोठा वापर करून, देशातील अराजकता ,असहिष्णुता, हुकुमशाही प्रवृत्तीचे वर्तन, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीयवाद, ब्राह्मणवाद प्रवृतिया तसेच गरीबी, बेकारी, बिमार्या, महामार्या, वगैरे संपुष्टात आणता येतील.
    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, "देशातील अराजकता नष्ट करण्यासाठी केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करायला हवे. कारण राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाही नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. "
    दुर्देव भारतीय लोकशाहीचे की, भारताच्या 75 वर्षाच्या सुवर्ण वर्षात सुद्धा, सामाजिक लोकशाहीत आजून ही राजकीय लोकशाहीचा प्रवेश नाही. याचे मुख्य कारण, धर्म मनु मानसिकता सामाजिक समतेच्या जीवन पद्धतीस मान्यता देत नाही आणि सत्ता ही अशाच प्रवृत्तीच्या हातात, (मग पक्ष कोणताही असो,)असल्याने सामाजिक स्वातंत्र्य फार दूर ची बाब होऊन, बसलेली असल्याचे दिसते.आणि सामाजिक स्वातंत्र्या शिवाय राजकीय स्वातंत्र्य टिकाऊ नसते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, सामाजिक लोकशाही एक जीवन मार्ग(सुसंस्कृत धर्माचा मार्ग) आहे.लोकशाही म्हणजे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतौ. अन्न, पाणी,व ऑक्सिजन हे जसे जीवन तत्वे त्या शिवाय मनुष्य व प्राण्यास जगता येत नाही,त्या प्रमाणेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिवाय लोकशाहीत जगणे शक्य नाही. म्हणून च लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्वीचा स्वतंत्र अंगे म्हणून विचार न करता एकसंघ विचार आवश्यक आहे. म्हणजे, एकाची दुसर्यापासून अर्थात समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत
    नाही, तसेच स्वातंत्र्य व समता ही बंधुभावा पासून वेगळी करता येत नाही.समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे [अल्पसंख्यांक ब्राह्मणवादाचे]बहुतांश लोकांवर [ओबीसीं,एससी, एसटी समाजावर]प्रभुत्व निर्माण करणे होय.तर स्वातंत्र्या शिवाय समता म्हणजे, वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरणारी बाब होय. अर्थात कमजोर व्यक्तीने केलेले चांगले काम, मोबदल्याशिवाय दुसर्याने बलवानाने हिसकावून घेण्याचा प्रकार होय. आणि बंधुभावा शिवाय स्वातंत्र्य व समता स्वाभाविक रित्या अस्तित्वाच राहणे अशक्यप्रायः आहे. कारण त्याच्या अंमलबजावणी साठी पोलीस यंत्रणेची आणि पाठोपाठ न्याय व्यवस्थेची गरज भासणार आहे. ….आपल्या भारतात, राजकीय दृष्टिकोनातून समानता, स्वातंत्र्य असले तरी, राजकीय बंधुभाव नाही कारण सामाजिक दृष्ट्या श्रेणीबंध विषमतेचे तत्व जातीय व्यवस्थेवर आधारित आहे. त्यामुळेच आर्थिक विषमताही देशात भरमसाठ प्रमाणात आहे. भारतीय संविधाने दोन्ही क्षेत्रात
    समानतेचे तत्व वापरेले असतांना, आपण जेवढ्या लवकरात लवकर जमीनीवरील विषमता, जातीयवाद, अस्पृश्यता, ब्राह्मण शुद्र व्यवस्था संपुष्टात आणून, समता(बंधुभाव) प्रस्थापित केली तरच राजकीय लोकशाही अधिक काळ टिकू शकेल. आणि लोकशाहीतील विषमतेचे दुष्परिणाम स्पष्ट आहे की, सामाजिक स्वातंत्र्य, समता ,बंधुता शिवाय राजकीय लोकशाही धोक्यात वावरत राहणार आहे. (कारण हुमशाही प्रवृत्त गिधाडे, राजकीय लोकशाहीवर गिरट्या मारत सदैव असतात).
    समाज जीवनातील विभागणी, जातीव्यवस्था ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, राष्ट्र विरोधी होय.कारण जाती _जातीमधील भेद, मत्सर व तिरस्काराची भावना राष्ट्रनिर्माणतेत फार मोठा अडथळा ठरत असतो. असा जातीय, राष्ट्र विरूद्ध अडथळ्यांवर मात करण्यासाठी,75 वर्षात फार मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नसले तरी आजुन ही वेळ गेली नाही.भारतीय जनतेने समता, स्वातंत्र्य च्या बरोबर च बंधुभावाचा वेग धरला. राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत केली, तर आजकाल भारतीयांच्या मनात जे संविधान संपविण्याचे पसरवलेले भूत आणि हुकुमशाहा ची धोतरबाजी,धोक्याची घंटानाद व्हाट्सअप वर चर्चेत आहे,तीही संपेल आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सामाजिक लोकशाही भारतात राजकीय लोकशाहीतून परावर्तित होऊन,(सुप्रीम कोर्टात असाच जीवंतपणा कायम राहीला तर,न डगमगता जनतेसाठी इतर शासकीय संस्था,पत्रकार अव्हायतपणे ,जागृत राहून काम करीत राहीला तर) कोणाचाही बाप, बापाचा बाप लोकशाहीला संपविण्याची भाषा करणार नाही.आणि भारतीय संविधान सुरक्षित राहून. राष्ट्र बल निर्माण करीत राहील.
    अशी स्वार्थअपेक्षा,मी भारतीय म्हणून, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 14एप्रील 2024 दिनी,134 व्या जयंती निमित्ताने करतो.

    संदर्भित ग्रंथ: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लेखण आणि भाषणे,
    Vol.18, भाग 3 प्रकरण262,पान.क्र.156_176.

    प्रा.मुकुंद दखणे,
    यवतमाळ 9373011954.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!