निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाविकास आघाडीने वंचितचा केला मोठा गेम प्लान.

आंबेडकरी जनतेची पद्धतशीरपणे
केली फसवणूक.

महाराष्ट्रात आता लोकांसभेच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. आंबेडकरी समाज संभ्रमात आहे. तळ्यात की मळ्यात अशी अवस्था झालेली आहे. नव्हे आंबेडकरी समाज देशाची राज्यघटना बदलली जाते की काय या दहशतीत आहे.वंचित आणि महाविकास आघाडीची युती फिस्कटल्यामुळे आंबेडकरी समाज मा. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करून वंचित कडे जावे की, महाविकास युतीकडे जावे अशा विवनचनेत आहे. काहींना वाटते की, प्रकाश आंबेडकरांचा नेता म्हणून स्वीकार केला तर कांग्रेस व घटक पक्षातील उमेदवार निवडून येणार नाहीत. पर्यायाने भाजप उमेदवार निवडून येतील व कांग्रेस उमेदवार पडतील. जर असे झाले तर भारतीय संविधान भाजपा बदलेल. ही झाली दहशत. दुसरीकडे माध्यमामध्ये असा प्रचार आणि प्रसार केला की, कांग्रेस व घटक पक्षांनी बाळासाहेब आंबेडकर यांना कांग्रेस घटक पक्ष ३,५,७ आशा वाढीव जागा देणार होते परंतु प्रकाश आंबेडकरांनी त्या नाकारल्या व युती तोडली असा आरोप म्हणा की, आपप्रचार म्हणा माध्यमाद्वारा करण्यात आला व बौद्ध समाज, आंबेडकरी समाजात संभ्रमाचे व कटुतेचे वातावरण निर्माण झाले व समाजाची दोन शकले पडली. एक बाळासाहेब आंबेडकर समर्थक व दुसरा कांग्रेस समर्थक आणि या दोन गटामध्ये घमासान वैचारिक राजकीय युद्ध सुरु झाले आहे.
वास्तव असे की, मागील एक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे “असा गाजावाजा सातत्याने करण्यात आला. व आंबेडकरी समाजामध्ये दहशत पसरविण्यात आली. अशा प्रकारे भावनिकतेच्या आधारावर आंबेडकरी समाजाचे मेंदू हॅक करून मते मिळवीन्याकारिता बौद्धिक मानस शास्त्रीय प्रयोग महाराष्ट्रामध्ये करण्यात आले व ते यशस्वी झाले.खरे तर 3 किंवा 4 किंवा 5 अशा वंचितला जागा वाटप करण्यात आलेल्या नव्हत्या., तर मिडीयामध्ये तश्या अफवा पसाराविण्याचे सातत्याने प्रयत्न केले गेले.महाविकास आघाडीचे नेते सातत्याने वंचित बहुजन आघाडीला आम्ही 5 ते 7 जागा देत आहोत म्हणून आकडेवारी माध्यमामध्ये प्रसारित करीत होते मात्र नेमक्या कुठल्या जागा निश्चितपणे देणार आहेत ते मात्र काहीही सांगत नव्हते. खरे तर महाविकास आघाडीने शिवसेना 22,कँग्रेस 16,व राष्ट्रवादी 10 अशाप्रकारे एकूण 48 जागांचे वाटप परस्पर आपआपसात केले व प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचे तारखे पर्यंत झुलवत ठेवले.तेव्हा दि. 26 मार्च 2024 रोजी बाळासाहेब आंबेडकरांनी माध्यमासमोर येऊन वरील वस्तुस्थिती बाबत स्पष्ट भूमिका मांडली. व वंचितचे उमेदवार निवडणुकीचे रिंगणात उभे केले. आता यात बाळासाहेबांचे काय चुकले? त्यांनी निवडणूक लढवीनेपासून अलिप्त राहायला पाहिजे होते काय? की,स्वतःचे पक्षाचे स्वतंत्र्य अस्तित्व गहाण ठेऊन महायुतीकडे जोहार माय बाप म्हणून शरण जायला पाहिजे होते ? बाळाहेबांनी वंचितचे उमेदवार निवडणुकीचे रिंगणात उभे केल्याबरोबर प्रस्थापित पक्षानी विशेषताहा कांग्रेस पक्षाचे नेत्यांनी तमाम महाराष्ट्रात एकच कल्लोळ माजवीला की, आता देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. यास संपूर्णतः बाळासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत. “आता भाजपा निवडून येणार व देशातील लोकशाही व संविधान धोक्यात येणार ” यास बाळासाहेब आंबेडकर संपूर्णतः जबाबदार आहेत. बाळासाहेब प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपने भाजपालाच मदत करीत आहेत. असा कांगावा कांग्रेसवाल्याकडून करण्यात आला.आंबेडकरवादी विद्वानांनी देखील बाळासाहेबांच्या विरुद्ध गरळ ओकली आणि लोकशाही व संविधानाबद्दल अती सवेंदनशील असलेली आंबेडकरी जनता बाळासाहेबांच्या विरोधात उभी राहिली. आणि कांग्रेस व त्यांचे घटक पक्ष इथेच जिकंले.जिंकले नव्हे तर ते त्यांचे काटकरस्थानात यशस्वी झाले.वंचित बहुजन आघाडी विरुद्धचा गेम प्लान यशस्वी झाला.
आपण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा सारासार विचार केला तर बाळासाहेब आंबेडकरांमुळेच देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे काय? थोडं मनन- चिंतन करा. व आपले विवेकाला विचारा.
१)शिवसेना फुटली व शिवसेनेतील बहुतांशी आमदार भाजपात गेले व शिवसेना युतीचं सरकार पाडले तेव्हा लोकशाही आणि संविधान धोक्यात आले नाही.
२)राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहेबापासून अजितदादा फुटले व भाजपात गेले तेव्हा देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले नाही.
३)ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यामंत्री असलेले कांग्रेसचे वरिष्ठ नेते श्री अशोक चव्हाण साहेब कँग्रेस सोडून भाजपात गेले तेव्हा देखील देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले नाही.
४)मात्र बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीचे रिंगणात उभे केल्याबरोबर देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले हे तार्कीक दृष्टया कितपत योग्य आहे.या व्यवस्थेला वंचितानी राजसत्तेत यावे हेच मुळात मान्य नाही. मात्र हाच श्रीमंत, जमीनदार, कारखानदार, भांडवलदार वर्गा राजसत्तेत मिळावीन्यकारिता वंचिताची मते कसे मिळतील यासाठो मनी, माईंड, मसल या त्री सूत्रीचा वापर नियोजनबद्दरीत्या करतात व ते आपल्याल्या तसूभर देखील कळू वा समजू देत नाही.नेमके तेच प्रयत्न वा प्रयोग ( मा. बाळासाहेब आंबेडकर याचेशी युती न होऊ देण्याचे )महाराष्ट्राच्या राजकारणात केले गेले व ते यशस्वी झाले.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कधी न भरून येणारे नुकसान झाले.
१) आंबेडकारी समाजाला वंचित बहुजन आघाडीपासून तोडण्याचे काम कांग्रेसने पद्धतशीरपणे केले.
२)आंबेडकरी समाजाला त्यांचे नेत्यापासून(बाळासाहेबापासून तोडण्यात यशस्वी झाली.
३)आंबेडकरी समाजात लोकशाही व संविधान धोक्यात असल्याच भूत पसरविण्यात कांग्रेस यशस्वी झाली.
याचा फायदा कांग्रेसने स्वतःसाठी सत्तेवर बसण्यासाठी करून घेतला.
४)असे करण्यामागचे महाराष्ट्रातील कांग्रेसिंचे छुपे एजेंडे खालीलप्रमाणे
अ )जर महाविकास आघाडी सोबत बाळासाहेब आंबेडकर यांची युती झाली असती तर “कमीत कमी महाराष्ट्रातून किमान 2 उमेदवार निवडून आले असते व वंचित बहुजन आघाडी या आंबेडकवादी पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली असती. आणि नेमकं हेच महाराष्ट्रातील कांग्रेस नेत्यांना नको होते.
ब )युती झाली नसती परंतु आंबेडकरी समाज बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत असता तर आजची महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती बघता बाळासाहेब आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडीला किमान 8% मते पडली असती तरी देखील वंचित बहुजन आघाडी या आंबेडकरवादी राजकीय पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय मान्यता मिळाली असती. आणि आंबेडकरवादी पक्षांना राष्ट्रीय मान्यता मिळणे हे महाराष्ट्रातील राजधुरंदर कांग्रेसी नेत्यांना परवडण्यासारखे नव्हते. कारण पुढील 4,6 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येणार होत्या. आणि वंचीत बहुजन आघाडीला राष्ट्रीय मान्यता मिळाली तर वंचित बहुजन आघाडी पुढील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका स्वातंत्रपणे लढेल व ते कांग्रेस वा घटक पक्षाला परवडण्यासारखे नव्हते. याचे कारण असे की, १)महाराष्ट्रामध्ये कांग्रेसी नेत्या मध्ये अणेक गट तट, अपसी समज गैरसमज आहेत.२)राष्ट्रवादी कांग्रेस चे दोन तुकडयात विभाजन झाले आहे. तसेच शिवसेना पक्षात देखील फुटला असून त्यांचे देखील 2 तुकड्यात विभाजन झालेले आहे.
५)वरील तीनही पक्षातील वरिष्ट दिग्गज नेते फुटून भाजपामध्ये गेल्यामुळे कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (महाविकास आघाडीतील घटक पक्ष ) यांचेकडे भाजप ला सक्षमपने टक्कर देऊन निवडून येण्या इतपत जनमत नव्हते. महाविकास आघाडीला निवडणुका जिंकायच्या असतील तर आंबेडकरी समाजाचे मतांची कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांना गरज होती.(यात कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी असा अर्थ घ्यावा )त्याशिवाय ते लोकसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये जिकू शकत नव्हते. जिंकन्यांएवढे लोकमत त्यांचेकडे नव्हते.
म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला लक्ष करणे व आंबेडकारी समाजाच्या मताचे विभाजन करणे हे कांग्रेस व घटक पक्षांना नितांत गरजेचे होते व तशी राजकीय पटलावर खेळी खेळल्या गेली.
A)मागील एक वर्षांपासून “लोकशाही व संविधान धोक्यात ” या विषयावर अणेक सामाजिक व राजकीय विचारवंतांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्याद्वारा भाजप सत्तेत आल्यास लोकाशाही जाऊन हुकूमशाही येईल व डाँ. आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानच बदलले जाईल असे समीकरण आंबेडकरी समाजाचे डोक्यात सेट करण्यात आले.
B)व्याख्यान देणारी काही मंडळी 2014 पूर्वी कांग्रेस विरोधी भ्रष्टाचार बाबत गरळ ओकणारी होती. अण्णा सोबत काम केलेली होती. .”लोकपाल ची निर्मिती व भ्रष्टाचार मुक्त भारत” हे त्यावेळचे ब्रीद वाक्य होते.तेव्हा कांग्रेस विरोधी भूमिका होती.
C) लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ६ महिने अगोदर पासून “महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकंरांनी युती करावी म्हणजे भाजपाला पराभूत करता येईल व संविधान वाचावीता येईल “असा माध्यमाद्वारा कँग्रेसने प्रचार व प्रसार केला. मात्र इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना सामावून घेण्याकरिता पाचारण केल्याचे दिसून येत नाही.
D)वरील युती बाबतच्या वृत्त पत्रातील व दूरदर्शन वरील कांग्रेसी राजकीय नेत्याच्या मुलाखती व विधानावरून लोकशाही व संविधान कोणत्याही परिस्थितीत वाचले पाहिजे असे आंबेडकरी जण समूहाला वाटायला लागले व तशी मते त्यांची तयार करण्यात आली.
E)कांग्रेस व घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख म्हणजे 27 मार्च 2024 येईपर्यंत महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकारांना टोलवीत ठेवले व आंबेडकरी समाजात युतीची आशा पल्लवीत करण्याचे मानसशास्त्रीय प्रयोग केले. कांग्रेस ने वंचित बहुजन आघाडीला 5 ते 7 जागा देऊ केल्या मात्र प्रकाश आंबेडकरच युती करायला तयार नाही असे माध्यमातून चित्र उभे केले.
वास्तविका पाहता महाविकास आघाडीतील कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी अनुक्रमे 16,22 व 10 अशाप्रकारे एकूण महाराष्ट्रातील 48 जागाचे वाटप आप आपसात केलेले होते. ते आंबेडकरी जनतेला शेवटचे क्षणा पर्यंत समजूच दिले नाही.
F) व ऐन वेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबतची युती तोडली. प्रकाश आंबेडकर B टीम आहे. संविधान बदलवीणाऱ्याचा बाजूने आहेत असा खोटा प्रचार माध्यमातून पद्धतशीरपणे केला व त्यासाठी आंबेडकरी समाजातील विचारवंताचा देखील वापर केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी खरोखरच युती तोडली व भाजपच्या बाजूने गेले,असा समज आंबेडकरी जनतेचा झाला. व बहुतेक आंबेडकरी जनता कांग्रेस घटक पक्षांकडे वळली.व इथेच कांग्रेस व घटक पक्षाच्या बाजूने फासे पडले व वंचित आणि आंबेडकरी जनता फसली.शकुनी मामाने आपल्या गोटया (फासे )अलगद अतिशय चालक व धूर्तपणे फेकले. मात्र हे सारं लोकशाही व संविधान वाचावीण्याच्या धुंदीत असल्याने आंबेडकरी समाजाला काही कळलंच नाही.
आंबेडकरी जनता व वंचित समूहाणे एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी, ” देशातील सर्व अमीर उमरावं , श्रीमंत व भांडवलदार वर्गाला येन केन प्रकारे सातत्याने सत्तेत राहायचे आहे. कांग्रेस आणि भाजपा ही त्यांची सत्ता केंद्रात पोहचण्याची शिडी (माध्यम )आहेत. देशातील गरिबांचे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामकारी, आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे म्हणजेच वंचिताचे कुणीही वाली नाही किंवा दुर्बल घटकाला सत्तेत येऊच द्यायचे नाही याचे पद्धतशीरपणे नियोजन उच्चंअब्रू समजल्या जाणाऱ्या व्यवस्थेकडून केले जाते व तुम्हा आम्हाला गरीब मध्यमवर्गीय लोकांना भ्रमित करून जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवल्या जाते. तेव्हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व गरीब कष्टकरी , शेतकरी, शेतमजूर,सर्व सामाजिक व आर्थिक दुर्बल घाटकांनी एक झाले पाहिजे. एकजुटीची मशाल हाती घेऊन सत्ता प्राप्त केली पाहिजे . गरीब मंजूर वर्ग हे करू शकतो.तेव्हाच खरी खुरी लोकशाही वाचेल – संविधान वाचेल आणि ते तुमच्या हातात आहे. एक मत एक मूल्य. यातून तुम्ही तुमचे राज्य प्रस्थापित करू शकता.

शालिक माऊलीकर
सेवानिवृत्त अधिकारी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!