पार्सल उमेदवार आणि मागासवर्गीयां तील अल्पसंख्यांक यांच्या बोज्या खालील मागासवर्गीय बहुसंख्याक ,,,!

ऍड अविनाश टी काले अकलूज
मो न 9960178213
आजच दलीत महासंघाचे संस्थपक अध्यक्ष मच्छिंद्र जी सकटे सर यांनी लिहिलेला लेख माझ्याकडे पाठवला ,
पद्मश्री पेक्षा चांभार भारी ,,, असा शेवट असलेला लेख आणि आ राम सातपुते यांचा पूर्व इतिहास मांडून त्यांनी , महाराष्ट्रातील लोकसभा सीट वर प्रस्थापित पक्षातील एका ही पक्षाने मातंग समाजाला उमेदवारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली
चर्मकार हा मागासवर्गीय समाजाचाच एक भाग आहे आणि “पुणे कराराची” ही देणं आहे की संयुक्त मतदार संघातील राखीव जागा वरील उमेदवार ही दलीत आणि सवर्ण समाजाच्या मता आधारेच निवडला जाणार आहे ,
जिथे बहुसंख्य सवर्ण मतदार आहेत व त्यांच्या भावना काय आहेत यावरच कोणता उमेदवार जिंकणार हे ही एक सत्य आहे
“मी सनातनी दलीत हिंदू आहे “आणि त्याचा मला अभिमानच नाही तर गर्व आहे” अशी गर्जना विधानसभेत करणारे आ रामभाऊ सातपुते हे भाजपच्या गळ्यातील ताईत बनणार हे उघड सत्य आहे
ते संघ परिवारातून येतात , ते महामंत्री ही होते , आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे आक्रमक नेते ही होते .
जो पर्यंत भाजपा व भाजपाच्या हिंदुत्वाची नशा समाजावर हावी आहे तो पर्यंत राम भाऊ सातपुते यांचे राजकीय भवितव्य अग्रेसर राहणार हे वास्तव आपण स्वीकारले च पाहिजे .
प्रश्न आंबेडकरी चळवळी चां आणि अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारला मानणाऱ्या नवबौध्द आणि मातंग समाजाचा आहे ,
संसदीय राजकारणात आपल्या समस्या मांडण्या साठी , त्यांच्या हक्क आणि संरक्षणाचे कायदे बनवता ना त्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी या समाजातून जाणार की नाही ? हा खरोखर चिंतन आणि मनन करण्याचा विषय आहे
सूक्ष्म रीतीने अभ्यास केला तर असे दिसून येते की जिथे जिथे राखीव जागा निर्माण झाल्या तिथे तिथे त्या त्या भागातील प्रस्थापित नेतृत्वाने ( ज्यांच्या हातात निवडून देण्याची शक्ती आहे ) स्थानिक दलीत समाजातील नवबौध्द आणि मातंग या मागास वर्गीय समाजातील बहुसंख्य असलेल्या समाजाला उमेदवारी श्यक्य तो दिलेली नाही , जिथे ती दिली गेली तिथे त्यांना बाहेरून पाठवले गेलेले आहे .
मोहोळ तालुक्यात या पूर्वी विधान सभेला आ रमेश कदम यांची वर्णी लागली याचे कारण त्यांची अजित दादा समवेत असलेली जवळीक हे होते .
प्रा लक्ष्मण राव ढोबळे सर काँग्रेस , एस काँग्रेस , आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेते म्हणून वावरत असताना त्यांनी मातंग समाजातील किंवा नवबौध्द समाजातील दुसरी फळी पक्षासाठी कधीच तयार केली नाही .
स्मृती शेष एकनाथ जी आव्हाड साहेब माझ्या कडे अकलूज ला आले होते व त्यांना घेऊन मी “शिव रत्न “वर गेलो होतो ,
त्यांचे म्हणणे होते की प्रा लक्ष्मण राव ढोबळे हे मातंग समाजातून नाही तर
“होलार”या समाजातून येतात , महाराष्ट्रात मातंग समाज हा बौद्ध समाजा नंतर लोकसंख्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने याचा राजकीय लाभ ऊठवण्या साठी ते मातंग बनले .
रमेश कदम हे मुंबई येथील असल्याने ते इकडे कशाला येतील ? असा विचार करून त्यांना प्रा लक्षण राव ढोबळे यांनी राजकारणात आणले आणि गुरूची विद्या गुरूला फळवित त्यांनी सरांनाच बाजूला सारले आणि ते पार्सल शेवटी मोहोळ वर लादले गेले .
त्या नंतर यशवंत तात्या माने यांची वर्णी लावली गेली , ते
” कैकाडी” समाजातील असून इंदापूर येथील रहिवाशी असताना ही त्यांनी यवतमाळ येथून एस सी चां दाखला आणला होता , आणि ते ही उमेदवार अजित दादा यांचे मर्जी तील होते व आहेत .
पुढे महा विकास आघाडीचे सरकार असताना एन टी मधून “कैकाडी” समाजाला एस सी वर्गात घेण्यात आले .
हा बदल उगाच झालेला नाही ,
माळशिरस तालुक्याचां ही सरांनी उल्लेख केला आहे , त्या प्रमाणे माळशिरस तालुक्यातील मूळ असलेल्या “दसुर”गावचे स्मृती शेष आ हनुमंत राव डोळस यांची वर्णी इथे 2009पासून 2014पर्यंत लागली आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने रिक्त जागेवर मोहिते पाटील यांनी पक्षांतर केल्याने देवेंद्र जी फडणवीस यांचे मर्जी तील उमेदवार म्हणून आ रामभाऊ सातपुते यांची वर्णी लागली
फलटण चां विचार केला तर तिथे ही आ दीपक चव्हाण यांचे रूपाने चर्मकार समाजाचे च लोकप्रतिनिधी आहेत ,
आणि श्रीमंत रामराजे यांचे प्रतिस्पर्धी असणारे खा रणजितसिंह निंबाळकर यांनी ही ज्यांना उमेदवारी दिली होती ते दिंगबर आगवणे हे ही चर्मकार च होते .
या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक झाले आहे .
नवबौध्द समाजाच्या पक्षीय दुकान दाऱ्या स्वंतत्र असल्याने कांहीं ठोक तर कांहीं किरकोळ अश्या पातळीवर प्रस्थपित पक्ष त्यांना सत्तेचे फायदे देत राहतात आणि त्या बदल्यात गाव खेड्यातील शेवटचा माणूस नेत्यांच्या आदेशा प्रमाणे काम करतो , त्या मुळे या समाजातील इतर स्थानिक नेते , कार्यकर्ते स्वतंत्र रित्या प्रस्थापित पक्षा समवेत राहिले तरी ते अदखलपात्र च राहतात व या पुढे ही राहणार .
मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे यांच्या ऐवजी लहुजी वस्ताद यांना पुढे आणून हिंदुत्व शक्तिशाली बनवण्याचे प्रयोग झाले
पण इतिहास नव्याने निर्माण करता येत नाही , अण्णाभाऊ साठे थेट “लाल बावटा”शी संबंधित
तर लहुजी वस्ताद यांची नाळ पुढे सत्यशोधक महात्मा फुले यांचेशी जोडलेली ,
त्यामुळे हा ही सामान अलीकडे झालेल्या प्रबोधन आणि शिक्षण या मुळे चळवळी चे दिशेने जाऊन बंडखोर ठरलेला असल्याने
या ही समाजाला लोक प्रतिनिधित्वा पासून रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे मला वाटते .
आरक्षित जागा रोटेशन प्रमाणे बदलतील , पण त्या मतदार संघाचा इतिहास राहणार आहे
प्रस्थापित घराण्यातील नव्या पिढ्या राजकारणात सक्रिय होतील व जेंव्हा त्यांना लोक समूहाची मदत लागेल तेंव्हा सत्ता वंचित ठेवलेले नवबौध्द आणि मातंग समाज हे त्यांना प्रश्न विचारतील 25वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात आम्ही तुम्हास आठवलो नाही काय?
ज्यांना लोकशक्ती आपल्या समवेत असावी असे वाटते त्यांनी दीर्घ दृष्टीचे राजकारण करायचे की लघु याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे .
पक्षाच्या सोईचे म्हणून, तर कधी पैसेवाले म्हणून बाहेर ची पार्सल येत राहतील ,
मागास वर्गीयातील वरच्या पायरी वरचे म्हणून चर्मकार स्वीकारले जातील पण या बोजा खाली स्थानिक नवबौध्द आणि मातंग दबून गेले आहेत हे मात्र तितकेच खरे आहे ,,,,
तूर्त इतकेच
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत