विरोधकांना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र! केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 31 मार्चला ‘इंडिया’ची मेगा रॅली


लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांना ईडीने अटक केली. त्याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली. ऐन निवडणुकीमध्ये हे अटकसत्र सुरू झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. या अटकेविरोधात ‘इंडिया’ आघाडीने 31 मार्च रोजी राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर मेगा रॅली आयोजित केली आहे. रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आप नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय म्हणाले की, “घटनेवर प्रेम करणाऱ्या आणि घटनेचा सन्मान करणाऱ्या देशभरातील लोकांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेनंतर संतपाची लाट उसळली आहे. ही कारवाई फक्त केजरीवाल यांच्याविरोधातच नसून एक-एक करून विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. आमदारांची खरेदी केली जात आहे. आमदारांना पैसे देऊन खरेदी जात असून दुसरीकडे तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. जे लोक झुकले नाहीत, विकले नाहीत त्यांच्याविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आले.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत