विचारपीठ

भारतीयांनो आता बदल घडवावाच लागेल!

डी एस सावंत

ऐसा कहा जाता है की,” गद्दी पर अगर, धृतराष्ट्र बैठा है! तो, द्रोपती का नग्न होना तय है! फिर, चाहे वो हस्तीनापुर हो, या मणिपुर”!
मणिपूर मधील महिलांच्या नग्न धिंडीने, संपूर्ण देशवाशीयांचीच जणू नग्न काढली आहे असे प्रत्येक देशवासीयांना वाटत आहे! माणुसकीला काळीमा फसणाऱ्या दुष्क्रत्यामुळे संपूर्ण मानवी समाज हादरला आहे आणि माणुसकीसुद्धा अनाथ होऊन आक्रोश करते आहे. ज्यांना मते दिली ते आमचे संरक्षण करतील, अशी माफक अपेक्षा असणाऱ्यांनीच आगीत पेट्रोल टाकून परिस्थिती आणखीच स्फोटक केली आहे. त्यामध्ये माणुसकी जळून खाक होत असताना स्वतः मात्र काळ्या पैशाच्या कमाईचे इमले उभे करत स्वतःच्याच गल्लाभरू आणि नीतीभ्रष्ट राजकारणामध्ये मशगुल आहेत. कित्येक महिने इतक्या संवेदनशील विषयावर राज्यकर्ते बोलायला सुद्धा तयार नाहीत अशांना देशवासीयांनी धडा शिकवला पाहिजे! असे जनतेला वाटते.

तशी भारतामध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे,या अगोदरही भारतात अनेक ठिकाणी दलित, आदिवासी महिलांची धिंड काढली गेलेली आहे.खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबातील मुलगी आणि आई यांना नग्न करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, त्यांच्या गुप्तांगांमध्ये लाट्या काट्या खुपसल्या होत्या आणि छळ छळ करून मारले होते तेव्हाही दलितांचे हत्याकांड म्हणून त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले गेले नव्हतेच, तसेच दोषींना आजही शिक्षा झाली नाही. तरीही विशेष म्हणजे नंतर त्या गावाला तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार देऊन इथल्या राज्यकर्त्यांनी दांभिकतेच्या सर्व हद्दी पार केल्या. या देशातला दलित आदिवासी आणि मूळ रहिवाशी देशाच्या मालक असणाऱ्या बरोबर हा व्यवहार केला जातो आहे. या सर्वांना जबाबदार इथली जातीय मानसिकता, नवसरंजामशाही आणि भांडवलदारी व्यवस्था आहे त्याला संघटितपणे सुरुंग लावण्याचे काम करण्याची आता वेळ आली आहे.

मणिपूरमध्ये साधारणपणे मैतेइ, कुकी, झोमी आणि नागा या चार प्रमुख जमाती आहेत, त्यापैकी मैतेइ जमातीकडे 90% नोकऱ्या आणि 95 टक्के सुपीक जमीन आहे. बिरेन सिंग म्हणजे तेथील सध्याचे मुख्यमंत्री मैतेइ जातीतून येतात, हा समाज शेती करतो, उद्योग-व्यवसाय करतो, संपन्न अशा समाजाला ‘आदिवासी’ घोषित करण्यासाठी वेगवेगळे सर्वे घडवून आणले गेले. हे होत असताना तेथील हायकोर्टाने मैतेइ जमातीला आदिवासींचा दर्जा देण्याचा निर्णय दिला. ते देण्यामागचे कारण असे की, मणिपूर मध्ये 371 एक ते सात पर्यंत कलमे लागू असल्यामुळे. तसेच तिथे नॉर्थ ईस्ट हिल कौन्सिल असल्यामुळे तेथील जमीन आदिवासी व्यतिरिक्त लोकांना हस्तांतरित करता येत नाहीत. जर मैतेइंना आदिवासीचा दर्जा दिला तर तेथील जमिनींचे आणि त्यामध्ये असणाऱ्या मौल्यवान खनिज संपत्ती चे वाटप येथील भांडवलदारांना करता येईल? असा एक हेतू आहे. तसेच लोकांमध्ये अशी चर्चा आहे.

मणिपूरमध्ये असणाऱ्या मॅंगनीज आणि कॉपर तसेच इतर महत्त्वपूर्ण खनिजाचे प्रचंड साठे आहेत २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली अमूल्य खनिजे असल्याचा सर्वे समोर आला आहे. २०१७ मध्ये मणिपूरमध्ये भाजपचे बीरेन सिंगचे सरकार आले आणि लगेचच अडाणी आणि कंपनीने तिकडचे खनिज पट्टे बोली लावत आपल्या नावे करून घेतले. त्याचा ऍक्च्युली ताबा घेण्यामध्ये कुकी आदिवासींचा मोठा अडथळा आहे आणि म्हणून या लोकांना एकमेकांमध्ये भडकावून प्रचंड प्रमाणात विध्वंस चालू आहे असे तेथील जनतेचे म्हणणे आहे.

लोकांमध्ये चर्चा आहे की, तेथे राष्ट्रीय स्वयं संघाचे 2000 पेक्षा अधिक पूर्ण वेळ कार्यकर्ते वीस वर्ष काम करत आहेत व तेथील मूळ वैष्णव धर्माच्या लोकांना भेहकावून ते हिंदू आहेत असे त्यांच्यावर बिंबवले जात आहे आणि त्यासाठीच हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन आणि हिंदू विरुद्ध आदिवासी अशा प्रकारचे झगडे चालू करण्यात आले आहेत असे तेथील जनतेचे म्हणणे आहे.

खरे पाहिले तर, कुकी लोकांचा प्रश्न हा काही नवीन नाही. त्यांच्यावरती आत्याचार गेले अनेक वर्ष होत आहेत. ते लहान मुले आणि स्त्रियांना अतिशय मौल्यवान समजतात, सन्मान देतात, म्हणून त्यांना टार्गेट करण्यासाठी विरोधक त्यांच्या स्त्रियांचे असे धिंडवडे काढलेले आपल्याला दिसून येतात. कुकी अत्याचाराच्या प्रश्नावर शर्मिला इरोह यांनी अनेक वर्ष उपोषण केले होते. लष्कराने स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले होते, म्हणून बारा मणिपुरी स्त्रियांनी मीरा पायबी संघटनेद्वारे नग्न आंदोलन केले होते. किती विदारकता असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुकी आदिवासी वरती मोठा हल्ला होण्याचे दुसरे कारण असे की, मार्च महिन्याच्या सुमारास सरकारने एक आदेश काढून सर्व कुकी जमातींना त्यांच्याकडील लायसन्स आर्म शासनाकडे जमा करण्यास भाग पाडले. त्यामुळे निशस्त्र लोकांवरती प्रचंड हल्ले झाले.

कुकी जमातीने त्याला विरोध केला, 3 मे रोजी आंदोलन आयोजित केले, मैतेइ पूर्ण तयारीत होते. आंदोलन संपवून परत जाणाऱ्या कुकिंवर शसस्त्र हल्ले केले गेले, त्यांचे स्मारक ध्वस्त केले गेले, दिल्लीतला एक जुना व्हिडिओ मोर्फ करून ‘कुकींनी मैतेइ मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल करून आग भडकविण्यात आली असे जनतेचे मत आहे.

जवळजवळ दीडशे ते 200 चर्चना आगींच्या हवाले केले. शेकडो लोक मारले गेले. अनेक स्त्रियांवरती अत्याचार केले. कुकी घरांवर गुलाबी रंगाने मार्किंग करून त्यांच्यावर स्पेसिफिक हल्ले केले गेले हे स्वतः तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच कबूल केले आहे. तरीही हे महाशय आपल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत याला काय म्हणावे? केंद्रातून पॅरामिल्ट्री मागवली त्यांनी कुकी आदिवासींचे संरक्षण करण्याऐवजी मैतेइ वस्त्यांवर संरक्षणार्थ लावून स्थानीक पोलिसांना आदिवासी कुकी वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी पाठविले. नुसत्या बंदुका नाही तर रासायनिक विस्फोटकांचे साठे सुद्धा पाठवले गेल्याची चर्चा तेथील लोकल नागरिकांमध्ये आहे. इंटरनेट बंद करून तेथील काहीही सत्य बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली.

हे लोक निर्ढावलेपणे खुलेआम कत्तली करत सुटले. १2 वर्षाची मुलगी असो वा ६० वर्षाची म्हातारी त्यांना सामूहिक बलात्कार करून खून केले, मणिपूर मध्ये सध्या महिला गव्हर्नर आहेत तसेच देशाच्या राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहेत आणि त्या सुद्धा आदिवासी समाजातून आल्या असताना हे व्हावे याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही मणिपूरमध्ये असे सांगितले जाते की माणसांची मुंडकी कापून वस्त्यांच्या मध्यभागी खुंटीवर टांगून ठेवली आणि गावं-वस्त्या जाळून राख केल्या. रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येनं प्रेते सडत पडली आहेत. तसेच बोलले जात आहे की, जेसीबीने मोठाले खड्डे खोदून शेकडो कुकी गाडून टाकले गेले आहेत आणि बरीच गावं आता मैतेईंच्या ताब्यात आहेत उद्या ही गावे ते डोंगराचे पट्टे खाणी इत्यादी त्यांच्या नावे पण केली जातील. त्यानंतर सरकारी सोपस्कार पार पाडून हे सर्व डोंगर पट्टे अडाणीला दिले जातील सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या मित्राला फायदा पोचवण्यासाठी हे सत्ताधारी काय करतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर आहे. खरोखर मनिपुर आणि पूर्वेतर राज्य सांभाळण्याची गरज आहे तेथील लोकशाही आबादीत ठेवण्याची गरज आहे.

गेल्या 28 दिवसानंतर सुप्रीम कोर्टाने सुमोटू कॉग्निजन्स घेतल्यामुळे मणिपूर घटनेतील दोषीवर प्रधानमंत्री कठोर कारवाईचे संकेत देत आहेत. या देशातील दलित, आदिवासी, महिला इथल्या बेलगाम आणि बेफाम जातीवाद्यांचे नवसरंजामदारांचे आणि भांडवलशाहीचे नेहमीच शिकार होत आहेत. एकविसाव्या शतकामध्येही भारतात आदिवासी समाजातील मुलाच्या अंगावर सरेआम मुतण्याचे काम मनुवादी लांडग्यांकडून केले जात आहे आणि इथले राज्यकर्ते भारत हा जगामधल्या तिसरी मोठी अर्थव्यवस्थ होईल अशा गप्पा मारत आहेत याला काय म्हणावे? सरकार कोणाचेही असो मात्र हा देश विचारत आहे अजून किती सुरेखा भौतमांगे,पूजा चव्हाण इ.इ… बळी घेतल्या जाणार आहेत. बिलकिस बानू इ.इ…वर होणारे अत्याचार थांबले जाणार आहेत की नाहीत? आणि महिला कुस्तीपटूंना आणि अशा अनेकांना आणि अनेकींना न्याय केव्हा मिळणार आहे? भारतीय संविधान वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकसंघ ठेवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी भारतीयांना आता बदल घडवण्याची वेळ आली आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!