महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

खरा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार


( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीतून )

संकलन –
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाचा विचार करून बौद्ध धर्म प्रसाराचे त्यांचे इच्छा व आकांक्षा नुसार कसे साकार करता येईल त्यावर आपले मत व्यक्त केले आहे ते म्हणतात  -

बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या या साऱ्या बाबींचा विचार केल्यावर साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की, बौद्ध धर्म प्रसाराचे स्वप्न कसे साकार करता येईल ? बौद्ध धर्म प्रसार साऱ्या विश्वात करून घ्यायचा असेल तर पुढील तीन गोष्टीचा गंभीरतेने विचार होणे जरुरीचे आहे.

1) पहिली गोष्ट ही की , बौद्ध धर्माचा बायबल सदृश्य प्रमाणात असा एक मात्र ग्रंथ तयार करणे.

2) दुसरी गोष्ट बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत अमुलाग्र बदल घडून आणणे.

3) आणि तिसरी गोष्ट ही की, आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करणे.
संदर्भ – खंड – 20. पृष्ठ. क्रं.383 पैरा – 3 आणि 4

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे धम्म जर साऱ्या विश्वात प्रसार करायचा असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच होऊ शकतो अन्यथा नाही. त्यांची संकल्पना साऱ्या विश्वात प्रसार करण्याची होती परंतु आपल्या देशातच बौद्ध धम्माचा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रसार होऊ शकला नाही. आपल्या देशात जर बौद्ध धम्माची क्रांती करायची असेल तर खालील गोष्टीचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

1) बुद्धाची मूळ शिकवण आणि तत्त्वज्ञान समजून घ्यायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम – क्रांती – प्रतीक्रांती तसेच बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पुस्तकाचे एकाग्रतेने अध्ययन करून त्याचा योग्य निष्कर्ष काढून धम्माचे प्रबोधन करणे.

2) यासाठी स्वतः धम्म समजून त्याचे प्रशिक्षण देऊन नवीन भिक्खू निर्माण करणे.

3) ज्याप्रमाणे ख्रिस्ती पाद्री त्यांचा धर्माचा प्रसार करतात त्याचप्रमाणे धम्म प्रचारक तयार करणे.

4) लोकांना जागृत करून दर रविवारी बौद्ध विहारात जाण्यासाठी ओढ निर्माण करणे.

5) धर्माला कार्यप्रवण करण्यासाठी विज्ञानाशी सुसंगत असलेला बौद्ध धर्म विहारात जमलेल्या लोकांना समजावून सांगणे.

6) बौद्ध विहारा जमलेल्या लोकांचे शंका समाधान करणे.

     ( 2 )

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी -

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र लोकांना सांगणे.

2) जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांनी हिंदू धर्मातील कोणतेही सण , व्रतवैकल्प, उपोषणे वगैरे पासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रबोधन करणे.

3) समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी धम्म हाच माध्यम आहे त्यासाठी लोकांना धम्माच्या बाबतीत आवड निर्माण करणे.

4) सर्वांना सुख- दुःखात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे.

5) आपसात कोणत्याही प्रकारची दुही निर्माण होऊ नये त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याची साक्ष पटवून देणे.

6) बौद्ध उपासक – उपासिका यांना विपश्यना , ध्यान साधना या हिंदू धर्मातील गुरुजीच्या आमिषाला बळी पडू न देणे.

7) समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शक्य तेवढी आर्थिक आणि शैक्षणिक मदत करणे.
वरील प्रत्येक मुद्द्यावर स्वतःच्या माहितीप्रमाणे सविस्तर विश्लेषण करून सांगणे.

लेखक –
आद. माणिक वानखेडे सर
9860761826
नागपूर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!