महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानशैक्षणिक

आंबेडकरी समाजाची प्रगती अडवू पाहणाऱ्या सुमित भांगे याची अखेर “सामाजिक न्याय विभागातून” हकालपट्टी..

आंबेडकरी विद्यार्थ्यां कडून जल्लोष..

मुंबई: सामाजिक न्याय या जबाबदार विभागात काम करत असताना द्वेषपूर्ण बुध्दीने निर्णय घेणाऱ्या सुमित भांगे सारख्या जातीयवादी व्यक्तीला सामाजिक न्याय विभागातून हाकालण्याची मागणी बऱ्याच सामाजिक संघटना व आंबेडकरी विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत होती.

आंबेडकरी विद्यार्थ्यांबद्दल आक्षेपार्ह विधाने करून भांगे यांनी समाजाचा रोष ओढवून घेतला होता. शासनाला चुकीची माहिती देणे, समस्या जाणून न घेता निर्णय घेऊन विद्यार्थी हिताच्या योजना बंद करणे, ” पी एच डी. करून काय दिवे लावणार? असे आक्षेपार्ह विधान वारंवार उच्चारून राज्यकर्त्यां च्या तोंडी ही अशीच भाषा बसवणे, या व इतर अनेक जातीवादी कृत्यामुळे शासनालाअखेर त्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी पी. वेलारासू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भांगे यानी नियुक्ती नंतर शासनाच्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला होता, बार्टी या संस्थेच्या अंतर्गत आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम बंद करण्याची निर्लज्ज कृती केली ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

पदाची, सत्तेची हवा डोक्यात घुसलेल्या भांगेच्या बऱ्याच वेळेस तक्रारी करण्यात आल्या, बार्टीच्या विद्यार्थ्यांचा, पूज्य भंतेचा अनादर करणाऱ्या आणि आंबेडकरी समाजाची प्रगती अडवू पाहणाऱ्या मनुवादी भांगेंना हटवण्याची मागणी सातत्याने आंबेडकरी समाजाकडून होत होती त्याला यश आल्यामुळे आंबेडकरी विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!