महापुरुषांना जात नसते,डॉ बाबासाहेब आता देशाचे राहिले नसून ते जगाचे झाले आहेत-डॉ भीमराव य आंबेडकर

डॉ बाबासाहेब यांच्याप्रमाणे सर्व जातीतील लोकांचे सोशल इंजिनिअरिंग करून काम करावे
-एस के भंडारे
माणगांव ऐतिहासिक परिषदेशाचा 104 वा महोत्सव संपन्न
माणगांव,कोल्हापूर (दि 22/3/2024) महापुरुष हा महापुरुषांस ओळखतो ती शृंखाला चालू ठेवली ती आजपर्यंत सुरु आहे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब यांनी विचाराची क्रांती केली ती देशात आंबेडकरवादी पुढे घेऊन जात आहेत. महापुरुषांना जात नाही, महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जायला पाहिजे नाही तर पुन्हा प्रतिक्रांती होईल. महात्मा फुले विचाराचे सत्यशोधक समाज संघटन 150 वर्षे झाली तरी महात्मा फुले समाजात पोहचवू शकलो नाही मात्र 100 वर्ष होत असलेल्या आर एस एस मात्र सर्वत्र पोहचले आहे.डॉ बाबासाहेब आता देशाचे राहिले नसून ते जगाचे झाले आहेत, त्यांची प्रतिमा ग्लोबल झाली आहे.मलेशिया पुतळा लावणार असून त्यासाठी मी जाणार आहे. चीनमधील शाळेत डॉ बाबासाहेब शिकावीला जाणार आहे.विरोधक सत्तेत आलेत तरी डॉ बाबासाहेबांना कोणी डावलू शकत नाहीत, आता त्यांच्या विरोधात सुद्धा जाऊ शकत नाहीत, माणगाव येथे आता दरवर्षी सोहळा भव्य स्वरूपात होणे आवश्यक असून,104 वर्षांपूर्वी जी ऐतिहासिक परिषद घेतली त्या स्मृती प्रित्यर्थ येथे स्मारक होणार आहे ते छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आणि आप्पासाहेब पाटील यांचे व्हावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोल्हापूर उत्तर दक्षिण जिल्हा शाखा आणि बार्टी च्या संयुक्त विद्यमाने माणगांव येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित केलेल्या ऐतिहासिक माणगांव परिषदेचा 104 वा वर्धापन दिन सोहळ्यात केले.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष / समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी असे आवाहन केले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजियनीरिंग करून सर्व जातीचे लोक एकत्र करून आपल्या गळ्यातील मडके आणि पाठीचा खराटा काढून संविधानाच्या माध्यमातून स्वाभिमानाचे जीने दिले परंतु त्याचा फायदा घेऊन सुटा बुटात आलो परंतु ते सत्ताधाऱ्यांनी आता खाजगीकरण, कंत्राटीकरण,पूर्वी चेकामगार कायदे -फायदे रद्द केले , सरकारी नोकरीतील व नवीन शिक्षणात आरक्षण संपविले आहे. त्यामुळे पुढे संविधान बदलून पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येऊ शकतो. जसे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड,संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकर ठाकरे,आप्पासाहेब पाटील, सहस्रबुद्धे इत्यादी सर्व जातीतील लोकांचे सोशल इंजिनिअरिंग करून आपल्या सोबत घेऊन क्रांती केली मात्र त्याप्रमाणे आपण करत नाही. आता तसे करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक व धार्मिक क्रांती गतिमान करावी नाही तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही.
तसेच बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्र चव्हाण यांनी महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड,संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादीनीचे सोशल इंजिनियरिंग कसे होते याची माहिती सांगून त्यांनी भीमराव ते बाबासाहेब ही संकल्पित केलेल्या वेब सिरीज सुरु करण्यासाठी डॉ भीमराव आंबेडकर यांनी प्रयत्न करावेत अशी जाहीर विनंती केली.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी, यापुढे दरवर्षी 22 मार्चला मोठ्ठा कार्यक्रम करावा त्यासाठी संस्थेच्या 24 प्रकारची शिबीरे रबावावीत असे सांगितले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उत्तर जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले होते.
प्रथम डॉ भीमराव य आंबेडकर, डॉ सत्येंद्र चव्हाण, एस के भंडारे, भिकाजी कांबळे इत्यादीनी भगवान बुद्ध,छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण केले.त्रीसरण -पंचशील झाल्यावर समता सैनिक दलाच्या वतीने मेजर एस पी दीक्षित यांनी सर्व सैनिकासह मानवंदना दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले होते.प्रास्ताविक दक्षिण जिल्हा अध्यक्ष एस व्ही येणीकर यांनी केले.
सूत्रसंचालन उत्तर जिल्हा सरचिटणीस भुयेकर यांनी केले.तर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष दिपक मांजरेकर यांनी आभार मानले. या प्रसंगी सांगली पूर्व जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगांवकर, कोल्हापूर उत्तर जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष रेखाताई बनगे, दक्षिणच्या अध्यक्ष वंदना दीक्षित, एस आर कांबळे,ए के कांबळे,बबिता घोलप, अशोक मोहिते,सांगली जिल्ह्याचे जितेंद्र कोलप, विशाल कांबळे,माणगांव बौद्ध समाजाचे पवन गवळी, अमर कांबळे जिल्ह्यातील हातकणंगले,
कागल,गडहिंग्लज,पन्हाळा,
आजरा,चंदगड,शाहूवाडी,
करवीर, शिरोळ,गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, इत्यादी तालुक्यातून कार्यकर्ते, समाज बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत