21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे झालेली अस्पृशांची ऐतिहासिक परिषद..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर येथील माणगाव येथे अस्पृशांची परिषद झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या दोन महामानावांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते ते आपल्याला इतिहासात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.
माणगाव येथील परिषदेत पहिल्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात बोलत असतांना, इथल्या अस्पृशांच्या राजकीय, सामाजिक, गुलामगिरीला,त्यांच्या दुःखाला इथल्या मनुवादी व्यवस्था जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी मिळून त्या विरोधात बंड पुकारून आवाज उठवण्याचे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
तर त्याच परिषेदेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या भाषणात, कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, महार वतन आणि ब्राह्मणी कुलकर्णी वतनाची जुलुमी प्रथा नष्ट करणे, सर्वच जातींतील लोकांना, तलाठी, वकील म्हणून काम करण्याची संधी मिळने, असे अनेक महत्वपूर्ण निर्णय शाहू महाराजांनी घेऊन एका प्रकारे अस्पृशांना न्याय देण्याचे काम केले.
राजषी शाहू महाराज परिषदेतील लोकांना संबोधित असतांना म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपात, तुमचा खरा पुढारी तुम्ही हिरा निवडला आहे, त्या बद्दल अभिनंदन.”
पुढे म्हणाले माझी खात्री आहे की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नाही तर एक वेळ अशी येईल की ते सर्व हिंदुस्तानाचे पुढारी होतील.”
मानगाव परिषदेमुळे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नवी जोडी महाराष्ट्राच्या सामाजिक शिक्षितजावर निर्माण झाली आणि यानिमित्ताने स्पृश्य जातीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळायला लागले. त्यांना मानसन्माची वागणूक मिळायला लागली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच यापुढे देशातील अस्पृश्य दलित वर्गाचे नेतृत्व करतील अशी ऐतिहासिक घोषणा याच माणगावच्या परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजानिक आयुष्याच्या प्रारंभ 21 व 22 मार्च 1920 साली आयोजित केलेल्या मानगावच्या परिषेदेतेच झाला. आणि संपूर्ण देशभर अस्पृश्योद्धाराच्या नव्या पर्वाला सुरुवात करणारी हिच पहिली अस्पृश्य परिषद ठरली..!
आजच्या या ऐतिहासिक दिनानिमित्त, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत