नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधाच्या विळख्यात..!

परभणी : बहुचर्चित नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा अडथळा आला आहे. 800 किलोमीटर लांबी च्या या महामार्गाला शेतकऱ्यांपाठोपाठ आता राजकीय विरोध ही होत आहे. नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे. यामुळे नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित असलेला शक्ती पीठ महामार्ग परभणी जिल्ह्यतुन जात आहे. हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या महामार्गामुळे अनेक गावे उधवस्त होणार असून या महामार्गामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतीच्या मधोमधून गेल्यास दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेली शेती कसायाची कशी असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे.
या महामार्गामुळे बरेच पाण्याचे स्त्रोत ही अडवले जातील. परभणी जिल्ह्यात बागायती शेती असल्याने सदर शेती महामार्गत गेल्यास शेतकरी देशोधडीला लागतील. परभणी जिल्ह्यात कोणतेच उद्योग धंदे नसल्याने शेती हाच प्रमुख ऊद्योग आहे. जिल्ह्यातून शक्ती पिठास जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे वेगळा महामार्ग निर्माण करून शेतकऱ्यांची थडगे बांधूनच हा महामार्ग बांधायचं शासनाचा अट्टहास का आहे,असा सवाल ही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटने सरकारला केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत