महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

राज – शहा भेटीवर “सामना अग्रलेखातून” घणाघात..

नवी दिल्ली येथे राज ठाकरे आणि अमि त शहा यांच्या भेटीगाठी दरम्यान महाराष्ट्रात मनसे बिजेपी युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. Lराज ठाकरेंनी काही काळापूर्वी उपस्थित केलेल्या पुलवामासंदर्भातील शंका अमित शाहांनी दूर केल्या असतील असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

“पुलवामा हल्ल्याआधी बँकॉकमध्ये अजित डोवाल आणि पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची गुप्त बैठक का झाली? असा प्रश्न राज ठाकरे यांना बराच काळ पडला होता. त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ होते. पुलवामात 40 जवानांचे हत्याकांड झाले त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे व 2019 च्या निवडणुकीआधीच हे हत्याकांड कसे घडले, याविषयी त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांची घालमेल सुरूच होती. परवाच्या मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटल्यावर पुलवामातील हत्याकांडाबाबत राज ठाकरे यांच्या मनात वादळ निर्माण करणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील व हर्षवर्धन पाटलांप्रमाणे त्यांनाही शांत झोप लागली असेल, याविषयी कुणाच्या मनात शंका नसावी,” असा टोला ठाकरे गटाने राज ठाकरेंना लगावला आहे.

“पुलवामात 40 जवानांचे हत्याकांड झाले. त्या हत्याकांडासाठी लोकसभा निवडणुकांचा मोसम निवडला गेला. जम्मू-कश्मीरमध्ये तेव्हा सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. केंद्र सरकारच्या बेफिकिरीमुळेच 40 जवानांना प्राण गमवावे लागले. याबाबत अनेक स्फोटक खुलासे मलिक यांनी केले. अत्यंत धोकादायक व संवेदनशील रस्त्यावरून जवानांची वाहतूक करू नये, त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे जवानांना प्रवासासाठी केंद्राने विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्यपालांनी केली. ही मागणी धुडकावण्यात आली व पुढच्या प्रवासात आपल्या 40 जवानांचे हत्याकांड आरडीएक्स स्फोटात झाले. 400 किलो आरडीएक्स लादलेली गाडी इतक्या चौक्या-पहारे पार करून जवानांच्या बसवर आदळतेच कशी? हा पहिला प्रश्न व आरडीएक्स भरलेल्या गाडीचे रजिस्ट्रेशन कोणत्या राज्याचे होते? हा दुसरा प्रश्न. गाडीचे रजिस्ट्रेशन गुजरात राज्याचे होते हे समोर आले. मग ही गाडी पुलवामापर्यंत सहज पोहोचलीच कशी? हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न. पुलवामा हल्ल्याच्या बाबतीत सखोल संशोधन करू पाहणारे देशाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांचाही नंतर संशयास्पदरीत्या अपघाती मृत्यू झाला. अत्यंत सुरक्षित अशा लष्करी हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करीत होते व त्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. पुलवामा हत्याकांडातील अनेक रहस्ये रावत यांच्याबरोबरच संपविण्यात आली काय? असा प्रश्न तेव्हा देशवासीयांना पडला, तसा राज ठाकरे यांनाही पडला असावा,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!