दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

“सामाजीक क्रांतीचे बंड: महाडचा मुक्ती संग्राम”


= चवदार तळ्याचा सत्याग्रह =
९७ वा वर्धापन दिन
(२० मार्च १९२७)

राव बहादूर सी.के.बोले यांनी मंबई लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, पाणवटे अस्पृश्यांना खुली करण्याचा ठराव १९२४ मध्ये मांडून मंजूर करून घेतला होता.

दक्षीण भारतात मद्रास मलबार त्रावणकोर-कोचीनकडे अस्पृश्यांच्या मंदीर प्रवेशाची चळवळ सूरु झाली होती.

या चळवळी मुख्यत्वे स्पृश्य सुधारकांनी अस्पृश्यासाठी चालविलेल्या होत्या.

  • त्यामूळे सहाजीकच त्याला मर्यादा पडल्या होत्या.
  • या मर्यादा झूगारून अस्पृश्यांनीच आपले प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली पाहीजे आणि सामाजीक क्रांतीचे निशाण उभारले पाहीजे.असे डाँ.आंबेडकरांना वाटू लागले.

बोले ठराव बंडाची सुरवात म्हणून उपयोगी होता.

सामाजीक क्रांतीच्या बंडासाठी महाडच का ?

महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी आपल्या धार्मीक,सामाजीक, आर्थीक आणि राजकीय गुलामगीरीविरूध्द बंड उभारणे जरुर आहे हे विचारांती डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी ठरविले होते. त्या बंडाचा झेंडा केव्हा व कोठे उभारावा याबद्दल ते सहकाऱ्यांबरोबर विचारविनीमय १९२६ पासून करु लागले होते.

प्रथम त्यांना वाटले की,चोखोबांचे भक्तिपीठ जे पंढरपूर तेथे अस्पृश्यांच्या बंडाचा झेंडा प्रथम उभारावा.
पंढरपूरात अस्प्रृश्यांनी विठोबाच्या मंदिरात शिरावे व मानवतेच्या क्रांतीचा पहिला झेंडा तेथे उभारावा.
परंतु विचारांती पंढरपूरात अस्पृश्यांनी स्वारी केली तर ती चढाई व लढाई पूढे अनेक वर्षे टिकविता येईल की नाही. कारण त्यात सरकारदरबार, कोर्टकचेऱ्या, तुरूंगवास, पैशाचा अमाप व्यय या बाबी ठरलेल्या होत्या. त्यांनी पंढरपूरचा विचार सोडून दिला.

मला कोकणात रायगडाच्या आसपासची जागा हवी, असे डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी सूचविले.

सहकाऱ्यांनी कारण विचारले तेव्हा डाँ.आंबेडकर म्हणाले की, रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. त्याच्या अगोदर व नंतर महाराजांना शुद्र म्हणून विरोध केला.
हा राज्याभिषेक लाखो रूपयाची दक्षणा घेऊन केला गेला. महाराजांचे क्षत्रीयत्व मान्य करुन राज्याभिषेकविधी वेदोक्तत पद्धतीने केला.

शास्त्री निश्चलपूरी या ब्राह्मणाने, “तुम्ही शुद्र आणि क्षेत्रीयाची जागा घेऊन भ्रष्टाचार केला” म्हणून महाराजांना दहशत घातली. त्यामूळे महाराजांनी पून्हा पुराणोक्त पध्दतीने निश्चलपूरीच्या हस्ते पुन्हा राज्याभिषेक करुन घेतला.

हा इतिहास निवेदन करून बाबासाहेबांनी लोकांना सांगितले की, छत्रपतींची ब्राह्मणांनी इतकी दूर्दशा केली तरी मराठे मूग गिळून का बसले ? तर ते हिंदू धर्मातील ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम होऊन बसलेले होते. ही गुलामगीरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रयत्न केले. पण ती नष्ट झाली नाही. त्या गुलामगीरीला चांगला धक्का बसावा व तोही अस्पृश्यांच्या क्रांतीकारक समतेच्या चळवळीतून,म्हणजे मराठे व तत्सम जातींचे डोळे उघडतील.

तेव्हा अनंतराव चित्रे म्हणाले की, अशी जागा महाडला आहे व ती बोले ठरावाच्या कक्षेत येते.

महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनी दि. ०५.०१.१९२४ रोजी नगरपालीकेच्या ठरावान्वये महाड शहरातील सर्व सार्वजनीक पाणवठे अस्पृश्यांना खुले केली.

स्प्रृश्य व अस्प्रृश्य समाजात धार्मिक व सामाजीक प्रव्रुतीत क्रांती घडवून आणण्यासाठी महाड हे ऐतिहासीक स्थळ बाबासाहेबांनी मुक्रर केले.

१९ मार्च १९२७ रोजी डाँ बाबासाहेब आंबेकरांनी भाषण केले ते म्हणाले की,(सारांशरूपाने)

जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये.

सार्वजनीक कार्यात पडलेल्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की,काही “नामके वास्ते” तर काही “कामके वास्ते” म्हणून सार्वजनीक कार्यात पडतात,आणि जे पडतात त्यात “नामके वास्ते” अशांचाच भरणा जास्त असतो.

अस्पृश्यांच्या जीवनाची उन्नती व्हायची असेल तर या वर्गाने करण्यासारखे दोन धंदे आहेत.
एक,पांढरपेशा(नोकरी)
दोन,शेती

पांढरपेशा

आचार,विचार आणि उच्चार यांची शुध्दी जोपर्यंत झाली नाही, तोपर्यंत अस्प्रृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रूजणार नाही. समाजातील थोडे तरूण तरी उच्चशिक्षीत करुन सरकारी नोकरीत उच्च स्थानावर नेऊन पोहचविल्यास समाजोन्नती सुलभ होईल, असे डाँक्टर साहेबांना वाटत होते. एक मुलगा बी.ए. झाल्याने आपल्या अस्पृश्य समाजास तो जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी शिकून पास झाली तरी होणार नाही.

शेती

दुसरा धंदा मी जो आपणास सुचविला आहे तो शेती होय. हा धंदा सुचविण्यात माझा हेतू असा आहे की,आपल्या अस्प्रृश्य वर्गांनी आर्थीकदृष्ट्या स्वतंत्र रीतीने जीवित घालविण्याची व्यवस्था करावी.

महाड परिषदेतील ठराव

परिषेदेत ३३ ठराव मंजूर करण्यात आले.
सारांशरूपाने काही ठराव असे…

वरीष्ट वर्गातील लोकांनी बहिष्कृतास घरगूती नोकर म्हणून नोकरीस ठेवावे.

जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्र विवाह पद्धतीचा प्रघात सुरू करावा.

मेलेली जनावरे ओढण्याच्या बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी.

सी.के.बोले ठरावाची सरकारने अंमलबजावनी करावी.

शिक्षण व दारूबंदी या बाबतीत सक्ती करण्यात यावी.

२० वर्षाच्या आतील मुलांची व १५ वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यात यावी.

संदर्भ
१, डाँ.भीमराव रामजी आंबेडकर.खंड-३ , चां.भ. खैरमोडे
२,महाडचा मुक्तीसंग्राम, प्रा.राम बिवलकर,प्रा.झुंबरलाल कांबळे.
३,बहिष्कृत भारत व मुकनायक, महाराष्ट्र शासन,मुंबई

        ☎ प्रा.डी.डी.मस्के,बार्शी ☎
             9881426933
             9423609218

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!